पोखरकर साहेब आपल्या सडेतोड विश्लेषणाला पुन्हा एकदा कडक सलाम. आपल्या धर्मातील चुकीच्या प्रथा प्रथम सुधारा नंतर इतर धर्मांतील प्रथा बद्दल बोला. बंगला देशात जे चालले आहे ते वाईटच आहे. पण त्याचा त्रास इथल्या अल्पसंख्याकांना का. हे ठिक नाही. निवडणूक आयोग सरकारची बटीक झाली आहे. नाही तर शिवसेना कुणी स्थापन केली हे माहीत असतानाही चुकीचा निर्णय दिला नसता. असो जनता सुज्ञ आहे योग्य वेळी योग्य निर्णय घेईल.
सर, देशाची इतकी वाईट अवस्था या 10 वर्षात झाली आहे. केवळ धर्म अणि धार्मिकता या पलीकडे लोकांना सांगितलेच जात नाही. त्यामुळे देश एवढा अशांत झाला आहे की प्रत्येकाला दुसरा संशयास्पद वाटत आहे.परंतु धार्मिकता शेवटी माणसाला आनि देशाला अराजकते कडे घेऊन जाते एवढे नक्की .आजचे विश्लेषण एकदम डोळे उघडणारे आहे. सुरवात स्वतः पासुन केली पाहिजे एवढे मात्र निश्चित. धन्यवाद.
पत्रकार साहेब तुम्हाला मानाचा मुजरा महाराष्ट्र मध्ये तुम्ही आणि निखिल वागळे साहेब आणि आणखी त्यांचे एक दोन मित्र यांनी तुमची महाराष्ट्रातील सर्व मीडियांनी मराठी मीडियाने आणि सर्व लहान मोठ्या पत्रकारांनी तुमच्याकडे बघावे आणि पत्रकारिता काय असते ती शिकावी खरं आहे मनातलं जे आहे आमच्या ते तुम्ही बोलून दाखवतात साहेब तुमच्या व्हिडिओची युट्युब वर मी सारखी वाट बघत असतो असे पत्रकार महाराष्ट्राला लाभले महाराष्ट्राचे हे भाग्य आहे निखिल वागळे साहेब आणि तुम्ही तुम्हाला सॅल्यूट
आद. रविंद्र पोखरकर साहेब खुपच छान माहिती सांगितली कोणाचीही भिडभाडं ठेवली नाही. सनातनी लोकांना ऐकून मिरच्या झोंबल्या असतील. ह्यालाच म्हणतात पत्रकार जय जिजाऊ जय शिवराय जय भिम जय संविधान नमोबुध्दाय. 🙏🙏🙏
खरंच सर तुमचे विचार सर्व धर्म समभाव आहेत,वाईट वक्त्याव करणारा व्यक्ती कोणत्याही धर्मचा असो त्याला शिक्षा हीं झालीच पाहिजे, धन्यवाद पोखरकर सर तुमच्या स्पष्ट विचारला 🙏
साहेब एकदम मस्त आहे आपले विवेचन.सर्व सामान्य जनतेच्या मनातले विचार आपल्या कडून व्यक्त होतात. बरं वाटलं माझ्या सारखे विचार करणारे पण या महाराष्ट्रात बरेच जण आहेत.येत्या निवडणुकीत यांना धडा शिकवायला आपण तयार आहोत
सर, अतिशय नीच विचारांचे लोकं मुद्दाम जातीय तणाव निर्माण करण्याचा राजकीय डाव खेळत आहे, यांना आता येणाऱ्या निवडणुकीत जमीनदोस्त करायलाच हवं नाहीतर महाराष्ट्र पिछाडीवर जाईल. तुम्ही अतिशय परखड व खरं मत व्यक्त केलं म्हणून तुम्हाला सलाम.
धन्यवाद पोखरकरजी,सर्वसामान्य जनता आपल मत सार्वजनिक करत नाहित,ते विषय आपण आपल्या व्हिडीऔ द्वारे अचुक हेरुन मांडत आहात.म्हणूनच मला म्हणावेसे वाटते मनकवडा पत्रकार.विधानसभेला आपले व्हिडीओ गावागावात विरोधीपक्षानी प्रसारित करुन प्रचार करावा.धन्यवाद.
सर वास्तविक अशावेळी सर्व धर्मातील सामान्य लौकांनी एकत्र येऊन यांच्याकडे सोयीस्कर पणे दुर्लक्ष करुन या घाणेरड्या लोकांना ऊघडं पाडुन यांच्या विरोधात मतदान करावे हि कळकळीची विनंती.
सर तुमच्यासारखे सुज्ञ व्यक्ती या देशात आहेत म्हणून तर हा देश आजवर तरला आहे. धर्मांध व्यक्ती सर्व धर्मात आहेत. हा मूर्ख रामगिरी नावाचा व्यक्ती याने स्व धर्माकडे पाहावं..त्यावर भाष्य करावं...दुसऱ्या धर्मीय व्यक्तीने जर या रामगिरी ला त्याच्या धर्मातील दोष दाखवले की मग यांच्या भावना दुखवतात. मुळात असे होताच कामा नये...सर्व धर्म लोकांनी एकमेकांना हिनवण्यापेक्षा सामंजस्याने राहावे त्यातच मानवजातीचे हित आहे.
पोखरकर सरांन सारखे सच्चे आणी ईमानदार अजुन कांही लोकं असले ना कुठलाच व्यक्ति वर तोंड काढुण बोलनार नाही मग तो डेड फुटया नितेश राणया जरी असला तरी काय करु शकत नाही
पोखरकर साहेब, कुणाला कुठं किती आग होत असेल ती होऊ द्या पण आपण अगदी स्पष्टपणे आणि जे जसं आहे तसं सत्यकथन करता. देशाला आपल्या सारख्या धाडसी पञकारांची खुप गरज आहे.
हि भाड खाऊ मराठी टीव्ही चेनल चमचेगिरी करायला यांच्या कडून काही तरी मिळत आहे मी तर हे चेनल पाहत नाही त्या पेक्षा आपल्या सारखे यूट्यूब विश्लेषण खूप चांगले जय शिवराय जय महाराष्ट्र
परखड, सुस्पष्ट आणि सडेतोड विचार. निष्पक्ष, पारदर्शक, अचूक आणि वस्तुनिष्ठ विश्लेषण. राज्यातील जनभावनाच आपल्या शब्दांतून व्यक्त होत आहे. प्रबोधन आणि जनजागृतीच्या अविरत कार्यासाठी धन्यवाद सर 🙏🙏
आपले विचार योग्यच आहेत...कोणत्याही धर्माचा अनादर करणे ही निदान हिंदू धर्माची तरी परंपरा नाही...त्याचा जाहीर निषेधच आहे... जुन्या काळी सती, बालविधवा प्रथा तसेच आपल्या पेक्षा लहान मुलींशी विवाह करणे अश्या अनेक चुकीच्या प्रथा आपल्या धर्मातही सर्रास होत्या...फक्त पेशवेच नाही तर अन्य व्यक्ती, अन्य सरदार, अन्य घराण्यातही वरील चुकीच्या प्रथा होत्या....हे ही लक्षात घेतले पाहिजे.... महिला शिक्षण, बाल विधवा, अनाथ स्त्रिया, रंजल्या गांजल्या महिलांना आधार देणे अश्या अनेक अनेक समाज प्रबोधन कार्यात महात्मा ज्योतिराव फुले आणि या कार्यात त्यांना साथ देणाऱ्या त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांचे महत्त्वपूर्ण व ऐतिहासिक योगदान आहे....त्यांना आदरपूर्वक प्रणाम... तसेच महर्षी कर्वे यांचेही महिला संदर्भातील बहुमोल कार्य व योगदान आपल्याला विसरून चालणार नाही... त्यांनाही आदरपूर्वक प्रणाम.... (बांगला देशातील हजारो हिंदू व हिंदू स्त्रिया यांचेवरील अत्याचार,त्यांची कत्तल, त्यांच्या मालमत्तेची जाळपोळ यावर अभिव्यक्ती चा एक परखड एपिसोड अपेक्षित होता)
ग्रेट सर आपल्या अभ्यासू व्यक्तीमत्वाला माझा सलाम. आपल्या धाडसाला माझा सलाम. आपण असेच कार्य करत राहवो हिच माझी मनापासून इच्छा आहे. पुन्हा एकदा you are great sir
सर, नेहमीप्रमाणेच हा व्हिडीओ सुद्धा खरच खूप मार्मिक, आणि सद्यस्थितीवर अतिशय बोलका आहे..राजकारणातील काही बड्या महाभागांनी जसे गुंड पाळले आहेत त्याची पुढची पायरी म्हणजे हे स्वयंघोषित भोंदू महाराज..यांना सामाजिक ऐक्याशी काहीही देणे घेणे नाही..सुजाण नागरिक वेळीच सावध व्हावेत..
आपल्या पिढीच जाऊ द्या, ती गेलीच. परंतु येणाऱ्या पिढीचे भविष्य काय असेल हा खरा चिंतेचा विषय आहे. अगदी शाळकरी मुलां मध्ये सुद्धा धर्मांधते चे विष पेरले जात आहे. येणारा काळ मोठा कठीण असणार आहे एवढं मात्र निश्चित.