मॅम मी केदारनाथचे व्हिडिओ बघतांना तुमचा आई, बहिण आणि तुम्ही गेलेले तो व्हिडिओ बघीतला.त्यानंतर मागचेही बघीतले.सर्वकाही छान आहे, तुम्ही वर्तमानात रहातात, खूपच छान.प्रशांतसरांनी दवाखान्यात स्वतःशी दिलेली झुंज,तुमची तळमळ, अस्वस्थता, त्यांच्यावर असलेले प्रेम, पूर्ण रात्र तुमची तडफड चालू होती.ते त्यातून सुखरूप बाहेर निघाले.तुमची मुले पण खूप प्रेमळ, समंजस आहेत.सर्वकाही छान आहे.मला एक सांगावेसे वाटते, तुम्ही बऱ्याचदा सरांना बिच्चारे प्रशांतजी म्हणतात,ते बिच्चारे नाहीत तर ग्रेट आहेत.दवाखान्यातून आल्यावर लगेच कामाला लागले, प्रवास केला.कुटूंबाप्रती समर्पणाची भावना, आणि तुम्हा सर्वांचे एकमेकांप्रती प्रेम,आदर छान वाटते. शेतकऱ्याची मुलगी पण स्वतःला कोणाला न घाबरता ठामपणे आवडेल असे आनंदी जीवन जगू शकते, अभिमान वाटतो.मी सुध्दा अतिशय लहान खेड्यातील शेतकऱ्याची मुलगी, वयाच्या चाळीसीत प्राध्यापिका झाले, आणि कुटुंबाला हातभार लावला. तुमच्या चॅनलचे सबस्क्राईबर वाढून तुमचे विचार, छान छान रेसिपींची सर्वांना माहीती होऊ देत.तुम्हाला शुभेच्छा 🎉🎉 प्रा.जीजा पाटील.
हो सोनाली ताई अगदी बरोबर बोललात, मलापण थोडा रागच आला ,कारण तो बिनडोक राक्षस तिच्या जीवनात फक्त 4महिने होता ,मला या साठी वाईट वाटत आहे की तो कधी प्रेमाने तिच्याबरोबर राहिलाच नसेल तर कोणत्या बेसवर ,गोष्टीमुळे ती एवढं प्रेम करत होती ?4महिने एखाद्यावर प्रेम,किंवा ओळखायला खुपच कमी दिवस आहेत. त्यापेक्षा वेगळ राहुन,आईवडिलांकडे राहुन,सासु सासर चे लोकांशी बोलुन थोड बघायला पाहिजे की वागणुकीत काही फरक पडतो का? पुर्ण आयुष्य एकीकडे आणि 4महिने एकीकडे ,असंही नाही आहेकी पहिले त्याने खुप प्रेम केले आणि नंतर त्याला संशयाचा रोग लागला.आईवडीलांना ओझं नसतं झालं ,स्वतः कमवत होती ना.उलट त्याच्या नाकावर टिच्चून दुसर्याशी लग्न करायला पाहिजे होतं.संशय हा खुपच भयानक रोग आहे.तो माणूस कधीच सुधरत नाही.अशी लोकं कुणाचा नी कुणाचा जीवच घेतात. असं नको व्हायला पाहिजे.😢😢
माझे ही मत तेच आहे आई वडिलांनी जन्माला घालायचे, शिक्षण द्यायचे इतके सक्षम बनवायचे,खर्च करून लग्न करून द्यायचे आणी मुलींनी अशा आत्महत्या करायच्या.काय वाटले असेल आई वडिलांना इतके स्वस्त असते का जीवन? का नाही तीने घटस्फोट घेतला नवीन जीवन चालू करायचे.
तुझ्या विचारांना मी सहमत आहे. अगदी बरोबर. Divorce घेऊन ही जगता आले असते. आई, वडलांचा थोडा तरी तिने विचार करायला पाहिजे होता. एवढे education घेऊन काय फायदा?
त्या मुलीने तिचे जीवन अशा माणसासाठी आणि अशा पद्धतीने संपविले हे चुकीचेच आहे😢 पण या मागे अनेक रिजनस असू शकतात. आपल्या समाजात दिलं तिथं मेलं अशी संकलपणा मनात रुजलेली आहे. वरवर पाहता सगळ आलबेल वाटत पण खोलवर विचार केल्यावर आपल्यामुळे आपल्या माहेरच्या लोकांना वयक्तिक किंवा सामाजीक पातलीवर त्रास होऊ नये म्हणूनही मुली अस पाऊल उचलतात 😢माझ्या सख्या बहिणीचा डिव्होर्स झाला आहे.ती जॉब करून वेगळी राहते,मुलाला पण सांभाळते .शेजारी अण् नातेवाईक काय म्हणतील म्हणून आईने तिला घरात नाही घेतल ,आम्हाला भाऊ नाही आम्ही सगळ्या बहिणी मिळून आईला समजावलं तरी ऐकत नाही अशी पण लोक आहेत सोनाली जगात आणि हे तर माझ्या घरातलं उदाहरण अशा किती मुली असतील ज्यांना सपोर्ट नाही मिळत म्हणून त्या अस पाऊल उचलताना दिसतात😢
माझे पण 61 kg वजन झालं तेव्हा लोकं सारखे विचारून कंटाळून टाकत होते. आता मी 66 ची आहे. तर मला चांगले नाही वाटत. म्हणून मी आता 63 करणार आहे कारण माझी height 5"3 आहे. 👍🏼