किल्ले रायगडाची गाईड कडुन संपूर्ण माहिति| Information of Raigad Fort | स्वराज्यातील महत्वाचा किल्ला
किल्ले रायगड इतिहास
रायगड किल्ला हा भारताचा महाराष्ट्र राज्यातील एक डोंगरी किल्ला आहे.
रायगड किल्ल्याचे पूर्वीचे नाव जम्बुदीप असे होते.
किल्ले रायगड हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांत असून समुद्रसपाटीपासून सुमारे ८२० मीटर (२७०० फूट) उंचीवर आहे. मराठी साम्राज्याच्या इतिहासामध्ये त्याची एक खास ओळख आहे. छत्रपती शिवाजीराजांनी रायगडचे स्थान आणि महत्त्व पाहून १६ व्या शतकात याला आपल्या राज्याची राजधानी बनविली. शिवराज्याभिषेक याच ठिकाणी झाला. इंग्रजांनी गड कब्जात घेतल्यानंतर लुटून त्याची नासधूस केली. सदर किल्ला हा महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व विभागाचे संरक्षित स्मारक आहे.
सभासद बखर म्हणते -
“ राजा खासा जाऊन पाहता गड बहुत चखोटा.
चौतर्फा गडाचे कडे तासिल्याप्रमाणे दिड गांव उंच.
पर्जन्यकाळी कडियावर गवत उगवत नाही आणि धोंडा तासीव एकच आहे.
दौलताबाद पृथ्वीवर चखोट गड खरा,
परंतु तो उंचीने थोडका.
दौलताबादचे दशगुणी गड उंच असे देखोन बहुत संतुष्ट झाले आणि बोलिले,
तक्तास जागा हाच गड करावा.
#raigad_killa
#raigadfort
#shivajimaharajstatus
#historyofindia
#maharashtraforts
#trecking
#रायगड
#रायगडकिल्लामाहिती
#history
#raigadfortguide
15 сен 2024