गीतकार : कवी कृ. ब. निकुम्ब संगीतकार : कमलाकर भागवत गायिका : सुमन कल्याणपूर .. ही कविता आम्हाला पाठयपुस्तकात अभ्यासाला होती. नंतर ती आकाशवाणीवरूनही ऐकायला यायची .. खूप जुन्या आठवणीत घेऊन जाते ही शब्दरचना आणि त्याची चाल सुद्धा..! अतिशय हळुवार .. संयमित वाद्यमेळ ... आणि सुमनबाईंचा गोड स्वर... लतादीदींशी या आवाजाची तुलना करण्याचा मोह कितीतरी लोकांना होतोच होतो. पण त्या देवी सरस्वती आहेत ..आणि सुमनबाईंचा आवाज आपल्या जसा की आपल्या आईचा आवाज ..की जी आपलं लहानपणापासून ते मोठं होईपर्यंत सगळं करते .. आणि रात्री नीज येत नसेल तर हळुवार थोपटत आपल्यासाठी अंगाई सुद्धा गाते .. अशा वेळी ती लता मंगेशकर असावीच लागते असं काही नसतं .. बस्स ती त्या क्षणी आपल्या लेकरासाठीची आई असते आणि तोच फील सुमनबाईंच्या आवाजात असतो.. !
अत्यंत भावस्पर्शी गीत,निकुंभ ह्यांचे सुंदर काव्य,कमलाकर भागवत ह्यांचे नेहेमीप्रमाणे अप्रतिम संगीत व कळस म्हणजे सुमन कल्याणपूर ह्यांचा भावपूर्ण हृदय स्पर्शी आवाज.केवळ सुमनताई च ह्या अत्यंत कमी वाद्य असलेल्या अशा गाण्यांना न्याय देऊ शकतात.ह्या त्रिकुटाला त्रिवार वंदन.सुमनताई भागवतजींच्या अत्यंत आवडत्या गायिका.अनेक भक्ती आणि भावगीते जी सदा स्मरणीय आहे ह्या जोडीने आपल्याला दिली
अश्रू ढाळल्याशिवाय हे गाणे ऐकता येणार नाही. मातांबद्दल अश्रू ढाळणारी अनेक गाणी आहेत, पण हे ज्या प्रकारे विवाहित झालेल्या आणि तिच्या आईच्या कूससाठी पिनिंग केलेल्या एका प्रौढ मुलीचे व्यक्तिमत्त्व निर्माण करते -- ते खरोखरच खूप दुःखद आणि त्याच वेळी सुंदर आहे.
व पु काळे यांचं एक वाक्य आहे ,बाई कितीही मोठी झाली ,लग्नाला कितीही वर्षा झाली तरी माहेरचं नाव काढलं कि बाईचं मन कातरतं सुमन कल्याणपूर यांनी या गाण्यात आपला जीव ओतला आहे
Rushi Golande kharai ... samajat badal zala pahije, ka maher ani Sasar ek watu naye ? maheri jitka prem apli mansa kartat Titka prem sasri Milan Kathin... kiti chhan hoil jar Sri la maheri milnari vagnuk sasrihi milali tar ??
1980/1981साली दुपारी शाळेत 12 वाजता शाळेत जायची घाई असायची. रेडिओ औरंगाबाद - परभणी केंद्रावर ही गाणी चालू असायची... आजही ही गाणी ऐकली की ते दिवस आठवतात... ज्यांनी बनवली त्यांना कोटी प्रणाम 🙏🙏🙏
हे गाणं ऐकताना मन भरून येतं आणि डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. उत्तम शब्दरचना, अप्रतिम चाल, भावपूर्ण आणि मनाचा ठाव घेणारे गायन.. सगळं जुळून आलं की एखाद्या गाण्याची काय ताकद असते, ते हे गाणं ऐकून कळते... कवी, संगीतकार आणि गायिका, सगळ्यांना प्रणाम..
माझी आई हे गाणं गायची...पहिल्या वेळी माहेरी सारखं जायला भेटत नसे...तर त्या वेळी माहेरचा पाखरू जरी दिसला तरी आनंद होतो असा म्हणत असे...माझी आई हे गाणं गाताना तिच्या माहेरच्या आठवणीने रडत असे...२ वर्षा पूर्वी माझी आई मला सोडून गेली....तिच्या आठवणीने रोज मन रडत असतं...आणि आता २ महिन्यापूर्वी बाबा ही गेले....माहेरच्या आठवणींनी डोळे नेहमीच पाणावतात😭
अगदी आत आत ...खूप खोल... पोचणारी आर्त कविता... एक प्रकारची शब्यात व्यक्त न करता न येणारी फिलिंग देते... नॉस्टॅल्जिया.. लॉस्ट गुड ओल्ड टाइम ऑफ पीस अँड त्रँक्विलिटी... असे काहीसे... अप्रतिम रचना....आणि आवाज....
मी पाचवीत असताना मला ही कविता होती, शिक्षक खूप समरसून शिकवायचे त्यावेळचे. त्यामुळे ही कविता अजूनही पाठ आहे माझ्या. सुमनताई ni खूप छान गायली आहे, मन bhutkalat गेले, धन्यवाद सुमनताई!!!
मी पाचवीला होते तेव्हा होती ही कविता मी माझी मैत्रीण दोघी बरोबर म्हणायचो ही कविता खूप खूप छान वाटायच घाल घाल पिंगा वार्या तेव्हा कवितेचा अर्थ कळत नव्हता आता कळला आई गेली😢😢भाऊ आहे मैत्रीणी ची पण खूप खूप आठवण येते गाण्या बरोबर माहेरची पण❤🙏🙏
मी नेहमी गाणं ऐकतांना माझ्या डोळ्यासमोर त्याच चित्र पाहतो, हे गाणं ऐकतांना सुद्धा मला माझ्या आईचं आणि पत्नीचं बालपण आणि त्यांचं माहेर आठवते,त्याचं खेळणं ,भावासोबत भांडण,आई,बाबाकडे हट्ट,हे सर्व माझ्या डोळ्यासमोर येते,माझं मनच सासुरवाशीण होते मग माझ्या पत्नीपेक्षाही माझे डोळे भरून येतात,या गाण्यातील प्रत्येकालाच नमन
हे गाणं माझे खुप म्हणजे खुपच आवडीचे आहे ,माझ्या उदास व खिन्न झालेल्या मनातील दुःख हे गाणं ऐकताना माझ्या डोळ्यांतील वाहुन गेलेल्या अश्रुंमुळे खुप हलके झाले ,
मी इयत्ता पाचवीत असताना ही कविता आम्हाला होती. त्या वेळचे शिक्षक जीव ओतून शिकवायचे त्यामुळे ही कविता स्म्रुती पटलावर कायम कोरली गेली. आज मधूर आवाजात ऐकायला मिळाली. आठवणी ताज्या झाल्या. कविता अर्थपूर्ण आहे आजही त्यातील गोडवा तसूभरही कमी झालेला नाही.
स्त्री काय पण पुरुषालाही रडवेल असे हे गाणं आहे. झी मराठी वरील एका मालिकेमध्ये हे गाणं ऐकायला मिळाल. खूप थोडा ऐकायला मिळाल. मात्र जेव्हा पूर्ण गाणं ऐकलं, तेव्हा मन भरून आल. सासुराला गेलेल्या बहिणीची खूप आठवण यायला लागली. कवी कृ.ब.निकुंब यांचे आभार मानावे तितके थोडेच आहेत. आणि गायिका सुमन कल्याणपूर यांच्या गोड गळ्याची ह्या गाण्याला साथ मिळाली. कितीही वेळा ऐकल तरी पॉट भारत नाही.
माहेर हा प्रतेक मुली साठी एक हळवा कोपरा आहे!वय कितीही होऊ द्या माहेर हे माये चे घर असते.तेव्हा हे गाणं प्रत्येकी साठी खास आहे एवढं मात्र खरं आहे. धन्यवाद. सुमनताई चे खूप खुप आभार!
आमच्या मातोश्रींचे आवडते गाणे आहे. तिचे आजोळ कोंकणात दाभोळ येथे होते. तिथल्या आठवणींनी तिचे डोळे भरून येतात. आपण शहरात आल्यावर हे सर्व काही मागे ठेवून आलो आहोत
माझ्या लहानपणीची कविता आहे, मला खुप खूप आवडते. सुमनजिंचा आवाज इतका गोड आहे की अजूनही हीं कविता सतत ऐकत रहावी वाटते ऐकताना खरंच आईची, माहेरची आठवण खुप येते. जेंव्हाजेंव्हा हीं कविता ऐकते तेंव्हा डोळे भरून येतात. पूर्वीचे दिवशी आठवतात. गेले ते दिवशी राहिल्या फक्त आठवणी
आई , तिची माया , आपलं माहेर मनांत सतत हिरवं ठेवणारं हे गाणं. मनाला बळ देणारं , मनाला जिवंत ठेवणारं गाणं . ज्यांना माहेर नसेल त्यां नाहीं माहेर असल्याचं सुंदर सुख या आवाजाने या गाण्याने मिळालं असेल. खु......प आभार मानतो आम्ही सगळे .
माझी आई सुद्धा कोरोना काळात आम्हाला सोडून. या गीतातुन खुप आठवण येते.आणि टचकन डोळ्यात पाणी येतं........भावाची सुद्धा काळजी वाटते तिच्या जाण्याने......त्याच्या आठवणीतही जीव कासावीस होतो 😭😭😭
अतिशय सुंदर कविता आम्हाला होती. आज पुन्हा बालपणाची आठवण झाली. दुपारच्या सुट्टीत आम्ही सर्व विद्यार्थी ही कविता गायक. सुंदर आसं माहेरवासीनीच माहेरा विषयी असलेली अत्यंतिक ओढ कविने मांडली आहे.
आजच्या या क्षणात संपर्क होणा-या काळात सुद्धा या गीताची भावार्थता तिळभरही कमी झालेली नाहीये.... ऐकणारा असो की ऐकणारी पोटात उमाळा अन् उकळी आल्याशिवाय राहत नाही...
सुमन ताईंचे आवाजातच ही कविता लहानपणा पासून ऐकतो. त्यांचेच आवाजात जास्त मनाला स्पर्श करते. ❤️ माहेर ते माहेर, माहेरची झोपडी जरी असेल तरी तिथे गेल्यावर जे समाधान आहे ते इतर कोणत्या ही कोट्यवधी रुपयांनी बांधलेल्या महालांना नाही येणार. कारण तिथे आपली आई, बाबा, भाऊ, बहीण निःस्वार्थ माणसे असतात. ❤️
I am a Guy 50 years. My Mother passed two years ago. For some strange reason, when I listen to this song, I feel what my Mother must have felt coming to Mumbai from Karwar, her native place.... I am getting emotional.
मी जेव्हा इयत्ता चौथीत शिकत होतो तेव्हा आमचे गुरुजी काकडे गुरुजी तेव्हा आम्हालाही कविता शिकवायचे जा सुवासाची कर बरसात जुन्या आठवणी ताज्या होतात खूप काही जुन्या आठवणी येतात सुंदर अशी कविता सुमन कल्याणपूर यांनी स्वरबद्ध केलेली सुंदर अशी कविता मनाला भावेल खूप मोठं काव्य
This poem was in Marathi text book for 7th standard studied in 1977.still remember sketch of that woman singing, sitting on side of verandah ...simple heart touching words by nikumb ji.........
सुमन ताई तुझा तो ओरिजनल आवाज हा नैसर्गिक शहाळ्याचे आल्हाददायक अम्रुत पाच। एक अपेक्षा होती तु"आईची आठवण "व बा नीज गडे नीज नीज माझ्या बाळा बाळा या दोन कविता खुप सुंदर स्वरांत गायल्या असत्या।
एक महिना झाला आज आई ला जाऊन. ती हे गाणं गायची आणि तिच्या बालपणीच्या गोष्टी सांगायची. त्यावेळी तिच्या चेहरयावर एक वेगळच समाधान असायचं. खूप आठवण येते तिची हे गाणं तिच्या आवाजात ऐकते तेव्हा....
खुप सुंदर कविता आहे. मराठी विषय शिकवण्या करीता शेख नवा सर होते घाल घाल पिंगा वारया ..ही कविता सुरेल आवाजात म्हणायचे, त्या वेळी फोन टी.व्ही नव्हते सरांनी म्हटलेली कवीता रस्त्याने पाट करत जावू ऊदया जशी तशी पूर्ण वर्ग म्हणाचा .आज कवितेच्या रूपात सरांना नमन.
ही कविता मला शाळेत पाठ्यपुस्तकात होती.ह्या कवितेत माहेरची ओढ निर्माण होते.आणि डोळे सहज पाणावले जातात. सुमनताईंचा आवाजाने तर या गाण्याला अजरामर केले आहे.
अप्रतिम. प्रत्येक विवाहित स्त्रीच्या मनात असलेली माहेरची ओढ, भावना या गाण्यात व्यक्त झाल्या आहेत. हे गाणे कधीही जुने होणार नाही, 'लाविते मी निरांजन...' हे माणिकताईंचे गाणेही असेच माहेरची आठवण करुन देणारे आहे.
५० वर्षा पूर्वी काेकणात शाळेत शिकत असतांना आमच्या पाठ्य पुस्तकात ही कविता हाेती. त्याकाळी टेलीफोन, मोबाईल फोन तसेच खेड्यापाड्यात वहातुकीची साधने उपलब्ध नसल्याने कित्येक दिवस एकमेकांची खुशाली मिळत नसे. त्यामुळे अनेक महिने माहेरी जावयास न मिळालेली एक विवाहित कन्या माहेरच्या आठवणीने हे गीत गात आहे. सुमनताईंनी नेहमी प्रमाणे अप्रतिमपणे गायिलेले हे गीत ऐकताना गहिवरून येते, हृदय भरुन येते व डोळ्यातील आसवांना वाट मोकळी करून देत हे गाणे पुन्हा पुन्हा एेकत रहावे असे वाटते.
Anant Bedekar This poem was written by Krishnaji Balavant Nukumb.. mostly unknown to many Later the poem converted to Bhavgeet. He was Professor of Marathi in Belgavi.. This is his only contribution to the Marathi world but still memorable
Can't listen to this song without shedding tears anew each time. There are many tear-jerking songs about mothers, but the way this one evokes the persona of a barely adult girl (a mere पोर) married off and pining for her mother's कूस - is oh so melancholy and, at the same time, beautiful. Kudos to all three: गीतकार : कृ.ब.निकुंब, गायिका : सुमन कल्याणपूर, संगीतकार : कमलाकर भागवत - the poet for weaving in so many memes of the childhood of yore - घरातली दुधाची गाय, तिचं “हुंगहुंगून बेजार करणारं” वासरू, त्याच परसातला पारिजात, etc. (Even if the younger, urbanized generation listening to the song may not be intimately familiar with those memes, they can appreciate the song in context.) Also the repetition of घाल-घाल to make वाऱ्याचा पिंगा come alive - the whirlwind that the young protagonist is beseeching to carry the fragrance of her सासर back to her माहेर. - the singer for her mellifluously thin voice evoking a teenager’s plaintive request. (It had to be Kalyanpur or Lata’s thin voice; Asha wouldn’t do as well here.) - and the composer for putting it all together and creating such a memorable song.
आज माझ्या आईला जावून एक वर्ष झालं. हे गाणे ऐकून मन खूप भरून येत.😔😔 आईशिवाय माहेरपण नाही. सुमन कल्याणकर यांनी खूप सुंदर गायलेल आहे. ह्या भावना आई आणि मुलगीच समजू शकते.
किती सुंदर गाणे. आणि गायलंयही किती गोड. पिढ्या आणि समाजरचना कितीही बदलली तरी प्रत्येक मातापिता, विवाहित कन्या आणि माहेरची माणसं, या गीताची कोवळीक आणि तरलता यामुळे नेहमीच भारावून, गहिवरून जातील. हे लोकगीत आहे का? संगीतकार कोण आहेत?
आजच्या काळात ऊसन वारी करुन गोळा केलेल्या प्रेमातुन मदर डे,वुमन डे साजरा केल्या जात असलेल्या संस्कृतीला या आणि अशा काळजाचा ठाव घेणार्या संवेदनशिल गीता पुढे लाख वेळा ओवाळुन टाकाविशी वाटते.
Now even I cry in the memories of my mother while listening this poem. I am missing my mom my sisters my two brothers very badly even some decades of their deaths
आम्ही सर्व मुली वर्गात मिळुन याच चालीवर ही कविता म्हणायचो...अगदी पुर्णपणे पाठ झालेली जे मी अजुन नाही विसरले...आमचा वर्ग अगदी दणानुन जात असे...जुन्या आठवणी जाग्या झाल्या..... हे माझ्या आई चे मनोगत आहे जे मी कमेंट द्वारे बोलले मला पण खुप छान वाटलं एैकुण😊🙏🏻