मला असं वाटतं दशावतार कलेबद्दल आपुलकी आणि प्रेम कायम टिकून राहण्यासाठी विविध प्रयत्न प्रयोग करत राहिले पाहिजे. आजच्या जगात लोकांना काय वाटते. आणि काय अपेक्षित आहे.या द्रुष्टिने कार्यक्रम आयोजित केले जातात. मला असं वाटतं एखाद्या दशावतार कंपनीचा प्रयोग असेल तर सहसा शाब्दिक चकमक, संवाद जुगलबंदी होत नाही.कारण ते एक कुटुंब म्हणून असतात. नकळत होऊ शकते किंवा लोकांना आकर्षित करण्यासाठी थांबवण्यासाठी ठरवून सुध्दा काही वेळासाठी होऊ शकते. मात्र संयुक्त दशावतार प्रयोग एक वेगळाच रंगमंच आहे. कारण मधल्या काळात दशावतार क्षेत्रातील कलेला वाईट दिवस आले होते.लोक काही प्रतिसाद देत नव्हते. पण खरया अर्थाने दशावतार कलेला दिवस चांगले आलेत ते कुडाळ येथे सारस्वत बँकेच्या माध्यमातून संयुक्त दशावतार रंगमंच स्पर्धा आयोजित झाली. संयुक्त दशावतार रंगमंचावर अशा प्रकारच्या शाब्दिक चकमक, संवाद जुगलबंदी होऊ शकतात.नव्हे तर होतातच कारण प्रत्येक कलाकाराला आपल्या अभ्यासावर आपल्या मेहनीतीवर हा आत्मविश्वास असतोच आणि असायचाच हवा.त्यामुळे विविध कंपन्यांचे कलाकार (क्षेपणास्त्र) आमनेसामने आले की (धडकताच)शाब्दिक चकमक ही होतेच.आणि लोकही त्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत असतात.अर्थात कलाकारला अभ्यास आणि मेहनत खूप घ्यावी लागते.त्यामुळे रसिक आणि कलाकार या दोघांना ही संयुक्त दशावतार रंगमंचकाचा फायदा आहे. 'दशावतार कलेचे महत्वाचे अंग किंवा हदय हे वकृत्व भाषाशैली आहे.' शेवटी एवढंच म्हणेन परीवर्तन हाच निसर्गाचा नियम आहे. आज काळा बरोबर दशावतार सुध्दा विविध प्रयोग करून बदलत आहे म्हणूनच स्वतःच अस्तित्व टिकवून स्वरूप वाढत आहे. धन्यवाद काही चुकल्यास क्षमस्व
Kelela shambhasan baag aahe youtube var... nitin and shanti taak yeil video... kashi public nitin var talya vajavat hoti aani shanti la kale na kai bolava