मुलगा जेव्हा वडीलांच्या घरी जातो तेव्हा तो आपल्या आपल्या घरी जात असतो पण वडील जेव्हा मुलाकडे जातात तेव्हा ते मुलाच्या घरी जात असतात. (त्यांना ते घर आपलं कधीच वाटत नाही.)
अगदी खरं आहे.. आणि इकडे आपण अवलंबून नसतो.. तिकडे कुठेही जायला गाडी शिवाय पर्याय नाही. इकडे आपण रोजच्या गरजा भागवायला चालत जाऊ शकतो. चालत गेलो कि ओळखीची लोक भेटतात . मस्त गप्पा होतात. आणि चालल्याने तब्बेत पण चांगली राहते.तिकडे आजारी पडल्यावर डॉक्टर ची ऑपयमेन्ट लगेच हवी असेल तर एक्स्ट्रो चार्ज भरायला लागतो. त्यामुळे सगळ्याच दृष्टीने आपलाच देश उ त्त म. 😃
तुमचे सर्वच विचार व निरीक्षण एकदम बरोबर आहे.कारण इथल्या परिसरात व सर्व व्यवहारात, व्यवस्थांमधे आपण रुळलेले असतो.स्वावलंबनाची भावना असते.आणि सर्वात जास्त प्रबळ भावना ही असते की हा आमचा हक्काचा देश आहे.या देशाचे आम्ही सन्माननीय प्रथम नागरीक आहोत..
परदेशामधे गेल्यावर आपल्याच मुलांची लाईफ स्टाईल बदलेली असते. ते तेथील व्यवस्थेप्रमाणे वागायच्या प्रयत्ना मधे असतात कारण त्यांना तेथेच रहायचे असते. आपण पालक त्या वातावरणात फार काळ राहू शकत नाही. आम्ही तर तीन महिन्यांसाठीच २ वर्षा मधून एकदा जातो. असे ५ वेळा गेलो आहोत. ते सुध्दा तेथील हवामान कसे असेल याचा विचार करून.
आपले विचार खूप छान वाटले .पण आपली आर्थिक परिस्थिती चांगली असेल तर त्या व्यक्तीचे म्हातारपण चांगले जाते. कारण तरुणपणात मेडिसिन खर्च कमी असतो, पण वयस्कर व्यक्तीचा मेडिसिन खर्च वाढतो, त्यासाठी प्रत्येकाने आपल्या तरुणपणात अश्या प्रकारे होणारा खर्चाचा विचार करून म्हातारपणाची आर्थिक तरतूद करणे जरुरीचे वाटते. .
मी माझ्या सासर्यांना आल्याच्या दुसर्या दिवशी माझ्या ऑफीसमध्यें नोकरी मिळवून दिली. तीन वर्ष नोकरी केली मग कॅनडांच दोघानीही पेंशन घेतलं. कॅनडांत दहा वर्ष काढली मग भारतांत परत गेले आणी बरीच वर्ष कॅनडाचं बक्कळ पेंशन तिकडे घेतलं. सगळे सुखी.
शेवटी आपल्याला काय सर्वात महत्वाचे आहे त्यावरच सर्व अवलंबून असते. परदेशातील जिवनपद्धीचे विवेचन १००% पटले. मी स्वतः गेले कित्येक वर्ष बोस्टनचे राहात आहे. माझी मुले इकडेच राहातात. रिटायर झाल्यानंतरच अर्थातच कुठे राहावे हा विचार केला. पण नातवंड सर्वात महत्वाची हात निष्कर्ष निघाला. त्यांना पुढे आजी आजोबांसाठी वेळ नसणार हे माहितच आहे पण त्याचवेळी त्यांची प्रगति बघण्यात आनंद मानू! आपण म्हणवलात तसे, परफेक्ट काहीच नाही, पण सगळ्या महत्वाचे काय हे आपण आपले ठरवायचे!
अहो परदेशी काय पण ईथे सुद्धा दुसर्या गावात रहाणारे समजा मुल अगदी मुंबई, पुण्यात असतील तरी जावे वाटत नाही 10/15दिवस पण फार वाटतात, पटत नाही असे नाही पण मुलांच रहाणीमान वेगळे असत,
नवीन घरात राहिला लागले तर ते आपलं वाटायला बरेच दिवस लागतात मग मुलांच्या घरी स्वतःच्या घरी असल्या सारंख कधीच शक्य नाही. Medical treatment अतिशय उत्तम असली तरी भयानक महाग आहे , insurance coverage असले तरी सर्व खर्च केलेले पैसे परत मिळेल कि नाही ह्याचीही खात्री नाही. भारतात डॅाक्टर्स हुषार असले तरी ज्या रितीने पैसे उकळतात ( hospitals सुद्धा) ते डाक्टर्स च्या professional ला लाजवणारे आहे. त्यात senior citizens पूर्ण पणें त्यांच्यावर विश्वास ठेवून अवंलबून असतात.
खूप छान पोस्ट आहे, तुमचे विचार आणि मुद्दे pratical आहेत आउट of India मेडिकल expenses पण खूप महाग आहे आणि technology कितीही पुढे गेली तरी man to man आणि interaction gives lots of energy. धन्यवाद तुमचे पोस्ट मी पहात असतो!!!
कोणीच वृद्ध पालक आपल्या मुलांकडे मुलींकडे कायमचे जात नाहीत, असं नाही. शेकडो जण कायमचे परदेशी सुद्धा जातात. वृद्ध व तरुण यांचे स्वभाव व ते जुळणे हा मुद्दा तेथे महत्त्वाचा ठरतो. तसेच आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबांमध्ये चित्र वेगळे आहे.
हे सर्व ठिक आहे पण मॅडम व्हिसा संबंधित काही अडचणी आहेत का, कारण काही वेळा आसे बोलले जाते की us व्हिसा मिळत नाही त्यामुळे आजारी किंवा वृद्ध आई, वडिलांना मुले बोलावत नाही
Agadi barobar me ha anubhav ghet aahe mhanun tumhi je bolut aahat te 100/. Per cent khare aahe aapala desh to aapala desh yethe baher jayche asel tari mulanvar depend rahave laagte sarvat jast shejarpun ha prakar yethe USA madhe disat naahi jo aapalya deshat disto .Yethe shejari kon rahate he suddha kalat naahi ☹️
आता chi paristithi ashi आहे, pan ti ashich rahili पाहिजे, bhavishyat suddha..but with increased lifespan it becomes very difficult to live alone shevti vridhhashram and assisted living haach paryay आहे.