भास्कर पेरे पाटील हे पाटोदा गावचे सरपंच आहेत. सरपंच असताना पाटोदा गावाला महाराष्टातील सर्वोत्कृष्ट गावचा पुरस्कार मिळाला. त्यांना आदर्श सरपंच म्हणून ओळखले जाते. त्यांनी गावच्या विकासाची अनेक कामे केली
भास्कर पेरे पाटील यांना त्यांच्या कार्यासाठी मराठवाडा विद्यापीठाकडून आणि अमरावतीच्या राष्ट्र संत तुकडोजी महाराज संस्थानाकडून जीवन गौरव पुरस्कार मिळाला आहे
पेरे सरपंच असताना पाटोदा गावाला दोनवेळा राष्ट्रपती पुरस्कार मिळालेला आहे, प्रथम राष्ट्रपती ए.पी.जे.अब्दुल कलाम आणि दुसऱ्या वेळेला राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हातून. महाराष्ट्र सरकारजढूनही पुरस्कार मिळाला. पाटोदा गाव शंभर टक्के उघड्यावर शौच्यमुक्त आहे. पेरे यांच्या कारकिर्दीत गावामध्ये झाडे लावली गेली आणि गावाला हरित केले गेले. भास्कर पेरे पाटील पाटोदा ग्रामपंचायतींमध्ये वेगवेगळ्या पदांवर राहिलेले आहेत जसे सरपंच, उपसरपंच आणि सदस्य. ते गाव कसे असावे, ग्रामस्वच्छता, स्वच्छ पिण्याचे पाणी अश्या अनेक विषयांबद्दल मार्गदर्शनसुद्धा करतात.
All rights reserved Ⓒ Aamhi Varkari
महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तने /भारुड /गवळणी/ सप्ताह साठी "आम्ही वारकरी" या आमच्या Channel ला Subscribe करा
राम कृष्ण हरी
27 авг 2021