मराठी भाषाच्या डोक्यावर आज सोनेरी मुकुट 👑 घातला आहे.कुसुमाग्रजांची खंत आज पुसली गेली.हे फक्त मोदी आणि फडणवीस हे करु शकतील अशी अपेक्षा होतीच आणि ती पूर्ण झाली.हे श्रेय फक्त आणि फक्त मोदी फडणवीस यांनाच जाते हे लक्षात ठेवा
उत्तम व्हिडीओ. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा उशिरा का होईना मिळाला, हे छान झाले त्यासाठी मोदी सरकार आणि युती सरकारचे अभिनंदन. इंग्रजी भाषा आंतरराष्ट्रीय महत्व असल्याने ती अवश्य शिकावी, पण आपली मातृभाषा मराठी ही जास्त महत्वाची आहे, आणि तिच्या संवर्धनासाठी आपण सर्वांनी झटले पाहिजे.
या विषयावर व्हिडिओ केल्याबद्दल आपले अभिनंदन...!! केंद्रसरकारचे विषेश अभिनंदन...!! निदान आता तरी राज्यसरकारने तन्मयतेने पुढील काळात योग्य त्या गोष्टी कराव्यात, एवढीच अपेक्षा...!!! 🙏
लाभले आम्हास भाग्य बोलतो " मराठी " जाहलो खरेच धन्य ऐकतो " मराठी " समस्त " मराठी " जनांचे हार्दिक अभिनंदन. व राज्य व केंद्र सरकारचे खुप खुप धन्यवाद ! अनयजी तत्पर व्हि. डी. ओ. बनवण्यासाठी आपलेही आभार.
खरच आजचा दिवस मराठी भाषेसाठी आणि मराठी भाषिक लोकांसाठी आनंदाची बातमी आहे.पण प्रत्येक मराठी माणसांनी मराठी भाषा रोजच्या व्यवहारात बोलली पाहिजे ती उत्तम बोलली पाहिजे पण हल्ली खुपच भाषाभेळ झालेला दिसतो.Engish मध्ये spelling चुकले तर गुण कापले जातात पण मराठी अशुद्ध लिहिली गेली तरी कुणीही आक्षेप घेत नाही ही मराठी भाषेची दुर्देशा आहे.र्हस्व दिर्घ याकडे तर कानाडोळाच केला जातो.प्रसार माध्यमे,दृकश्राव्य माध्यम, रस्त्यावरील पाट्या अशुद्ध मराठीत असतात त्या बघवत नाहीत.आजच्या निमित्ताने यावर भाषाप्रेमी ,भाषातज्ञ विचार करतील का.उत्तम मराठी भाषा शिकणे ही काळाची गरज आहे हे आपल्याला वाटतच नाही.अभिजात आहे तर माझी मराठी भाषा टिकलीच पाहिजे ही प्रत्येक मराठी माणसाची भावना असली पाहिजे.
पूर्वीच्या वर्तमानपत्रातील लिखाण अतिशय शुद्ध होते पूर्वी सह्याद्री वाहिनीवरील भाषा/लिखाण अतिशय शुद्ध होते आताच्या एकाही वाहिन्यांवरील भाषा/लिखाण शुद्ध राहिलेले नाही बिलकुल नाही
अनयजी, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी आभारी आहे. आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला ही अभिमानास्पद गोष्ट आहे. त्यामुळे जिथे शक्य आहे तिथे मराठीचा सर्वांनी वापर केला पाहिजे. कायम दुसऱ्याकडे बोट दाखवण्यापेक्षा स्वतःच्या खांद्यावर मराठीचा ध्वज घेऊन प्रत्येकाने पुढे चालले पाहिजे. तुमच्या विश्लेषणात हीच बाब सांगितली आहे. धन्यवाद
स्वातंत्रावीर सावरकरांनी त्या काळात वापरल्या जाणाऱ्या काही इंग्रजी शब्ब्दांना मराठी शब्दांचे पर्याय दिले होते अर्थात ते पर्याय त्या काळात वापरल्या जाणाऱ्या भाषेप्रमाणे बऱ्यापैकी जड होते .पण त्यांनी प्रयत्न केला होता .यावरून आपली मराठी भाषा टिकावी म्हणून स्वातंत्रावीर सावरकर किती पुढचा विचार करत होते अस लक्षात येत 🙏🏻
मराठी जनतेचे हार्दिक अभिनंदन. मराठी साहित्या कडे जास्तीत जास्त लक्ष देणे.मराठी लिहिली, बोलली गेली जावी याकरिता साहित्य सामग्री चा वापर होईल. श्री देवेंद्र जी फडणवीस साहेबांचे खूप खूप आभार
नमस्कार अनयजी!मला प्रवासाची आवड आहे. वर्षातून एकदा स्थळदर्शनासाठी बाहेर पडल्यापासून छोट्या छोट्या बरकाव्यासह वर्णन लिहायची सवय आहे. ते शंभर टक्के मराठीतच असलं पाहिजे असा माझा कटाक्ष असतो. तुमची भाऊंची नेने सरांची मराठी ऐकणं आनंददायी असतं. पण बाकी बरेच जण त थ, द ध, क ख, ब भ या शब्दांमध्ये स्पष्ट नसतात.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने खूप काही साध्य होणे संभवनीय आहे. आता केवळ सरकारी पातळीवर काही व्हावं अशी कोणी अपेक्षा ठेवू नये. आपण प्रत्येकाने मराठीचा अभिमान बाळगणे अन् तिचा आवर्जून वापर करणे इथून नव्याने सुरवात करणे आपल्याच हातात आहे.
60 वर्षामध्ये जे काँग्रेसला जमले नाही ते मोदीजीनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देवून मराठी लोकांची मागणी पूर्ण केली. काँग्रेस ने आत्मचिंतन करावे.आतापर्यंत काँग्रेस ने महाराष्ट्राची एकही मागणी पूर्ण केली नाही.याचा अर्थ काँग्रेसच्या मनात असलेला महाराष्ट्राबद्दलचा आकस. नमस्कार धन्यवाद जय श्रीराम
मराठी माध्यमातून शिकलेले व घरात मराठी बोलत असतानाही आजच्या पिढीतील काही जण मुलांना मराठी पासून दूर ठेवतात हे पाहिल्यावर तर खूपच वाईट वाटते. आपल्याच नातेवाईंबरोबर ही मुले बोलू पण शकत नाहीत यात कोणता मोठेपणा समजतात हेच समजत नाही.
अनय जीं नमस्कार...महाराष्ट्र... मुंबई... श्री सिद्धिविनायक मंदिर.. वरळी... कोषाध्यक्ष कोण झाला? काय नाव आहॆ...? भाषा काय घेऊन बसलात. घोषणा झाली आंनदच आहे. पण सत्य भीषण आहॆ. 🙏🏼
आता बेळगाव,बिदर सहित काही जिल्हे चां प्रश्न सुटला पाहिजे. तो लढा चालू आहेच. नाहीतरी कर्नाटक ( काँग्रेस )मधे एक दणका दिला पाहिजे. पण न्यायालयात केस आहे ना.
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा म्हणजे मराठीसाठी काहीही न करता बरेच काही केले असे दाखवून देणे!! सत्ताधारी मतांसाठी किती घायकुतीला आले आहेत हे यावरून दिसून येते.
मराठी माणसांना पहिल्यांदा सार्वजनिक ठिकाणी मराठीत बोलायला सांगा. कॉसमॉपोलिटन म्हणून दुसऱ्यांची सोय पाहण्यासाठी त्यांच्याशी हिंदीत बोलणं सोडा आता! इतर कुठल्याही प्रांतात इथल्यासारखी परप्रांतीयांची सोय बघत नाहीत. त्यामुळेच आज ते सर्व मराठी माणसांच्या डोक्यावर बसले आहेत. त्याच्या स्वतःच्या प्रांतात त्याला घरे नाकारली जात आहेत. पण आम्ही इतके षंढ झालो आहोत, की त्याविरुद्ध आमचं रक्त पेटूनच उठत नाही. मराठी भाषेला फक्त अभिजात भाषेचा दर्जा मिळून उपयोग नाही,खुद्द मराठी लोकांना आपल्या भाषेचा अभिमान आहे कां? इतर भाषिकांना तो उपजतच असतो त्यामुळे ते लोक आपल्या मातृभाषेचा मान कायम ठेवतात आणि दुसऱ्या कुणालाही तिचा अपमान करू देत नाहीत, जसा तो खुद्द महाराष्ट्रात करण्याची हे बाहेरून आलेले परप्रांतीय मराठी माणसांच्या षंढपणामुळे करू धजतात तरी एकही मराठी माणूस त्याविरुद्ध पेटून उठत नाही इतका मराठी समाज नपूंसक झाला आहे काय? 😡😤👎
गांधी व नेहरू परिवारातील लोकांच्या इंग्रजी धार्जिण्या वृत्तीने प्रादेशिक भाषांमध्ये बोलणाऱरे न्यूनगंडाने पछाडले आणि कॉन्व्हेंटमध्ये मुलं घालण्याची प्रथा पडली
मी तर हल्ली व्यवसायात मध्ये ग्राहकांशी बोलताना त्यांना शेअर्स, म्युच्युअल फंड विषयी महिती देण्यासाठी मराठीचा वापर करायला लागलोय आणि लोक सुद्धा हल्ली तेवढं कमी वाटून घेत नाही त्यांना फक्तं गुंतवणुकी बद्दल माहिती हवी असते. अर्थात ग्राहक शहरी मध्यमवर्गीय आहेत.
*माझा जन्म मराठी , माझा धर्म मराठी* माझं वर्म मराठी , माझं कर्म मराठी माझं मातृत्व मराठी , माझं कर्तृत्व मराठी माझं पितृत्व मराठी , माझं दातृत्व मराठी माझा गुरुर मराठी , माझा हुरुर मराठी माझी शान मराठी , माझी मान मराठी माझी धग मराठी , माझी रग मराठी माझी झेप मराठी , माझी खेप मराठी माझी शौर्यश्री मराठी , माझी विजयश्री मराठी माझी अभिमानश्री मराठी , माझी गौरवांश्री मराठी माझी दृष्टी मराठी , माझी सृष्टि मराठी माझी भक्ती मराठी , माझी शक्ती मराठी माझी वृत्ती मराठी , माझी निर्मिती मराठी माझी स्फुर्ती मराठी , माझी कीर्ती मराठी माझा कण न कण मराठी , माझा क्षण न क्षण मराठी माझा चर न चर मराठी , माझा रग न रग मराठी मी धन्यवान, कारण मी जन्मलो मराठी मी भाग्यवान, कारण मी जाणतो मराठी मी समृध्दवान, कारण मी जगतो मराठी मी अनंतवान, कारण मी मोक्षनार मराठी ####### अनुप ०४-ऑक्टोबर-२०२४ _मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्या बद्धल_
एक पाहणे:रेकॉर्ड,चॅनल ह्यांना मराठी शब्द काय ? इंग्रजी मधून मराठी प्रतिक्रिया देणे, आपण आपल्यापासून जाणीव पूर्वक बदलणार नाही तर आधी होती दासी पट्ट राणी केले तिसी सारखी अवस्था होईल.मंडळांचा आर्थिक विकास निश्चित होईल.मंत्री पदापेक्षा इथे वर्णी लावून अतृप्त हावरे आत्मे शांत केले जातील.