शिवाजी महाराज आग्र्याहून कसे निसटले? तिथून कोणत्या मार्गाने स्वराज्यात परतले? याची नेमकी माहिती आज तब्बल ३५८ वर्षांनंतरही इतिहासाला माहिती नाही. या प्रवासावर आधारित नितीन थोरात यांनी लिहिलेली ‘साधू’ ही कादंबरी सुद्धा सध्या सर्वमान्य असलेल्या गृहीतकांवरच आधारित आहे. ही सर्वमान्य गृहीतके कोणती? तर शिवाजी महाराज हे शंभूराजांसह मिठाईच्या पेटार्यात बसून निसटले आणि त्यांनी पूर्वेकडे वाराणसी येथे जाऊन तेथून दक्षिणेकडे जात राजगडापर्यंत प्रवास केला. पण यावरच आधारित असे डॉक्टर अजित जोशी यांनी लिहिलेले ‘आग्र्याहून सुटका’ हे संशोधनात्मक पुस्तक मात्र एक वेगळा सिद्धांत मांडत सर्व प्रस्थापित समजुतींना धक्का देते. उपलब्ध ऐतिहासिक कागदपत्रांचा अभ्यास करून अजित जोशी म्हणतात की शिवाजी महाराज हे मिठाईंच्या पेटाऱ्यात बसून नव्हे तर वेशांतर करून निसटले आणि तेही एकटेच. शंभूराजांना मागेच ठेवून. मुघलांना हे पलायन प्रत्यक्षात कळाले त्यांच्या जवळपास एक महिना आधीच शिवाजी महाराज निसटले होते आणि पूर्व पश्चिम दिशेला वगैरे न जाता त्यांनी थेट दक्षिणेला जात स्वराज्याला जाण्याचा मुख्य मार्ग धरला. हा सिद्धांत संपूर्ण समजण्यासाठी हा विडियो पूर्ण पहा.
माझे fb Page - / kille1630
#chatrapatishivajimaharaj #chatrapatishivaji #shivajimaharaj #shivaji #chatrapatisambhajimaharaj #aurangzeb #agra #history #marathi #आग्राभेट #india #mughal
21 сен 2024