एकंदरीतच महाराष्ट्रातील भाजप ने स्वतः चा, आपल्या धोरणांचा विचका केला आहे. माधव भंडारी... सध्या कुठेच दिसत नाहीत. पण RSS संस्कारांमुळे कधीही नाराजी व्यक्त करणार नाहीत.
@@ckpatekarपण पक्ष फोडण्यात हा पुढे होता ना आणि निचपणाने म्हणतो मी पुन्हा आलो आणि दोन पक्ष फोडून आलो.किती निचपणाचा कळस?अगोदर ह्याला पाडला पाहिजे ह्या वेळेस
काँग्रेस मुक्त भारत करायला चालले होते काँग्रेस युक्त भाजप झालाय😂😂....... BJP च्या कार्यकर्त्यांनी फक्त मतदान करायचं.....नेत्याची गरज पडल्यास ते ED, CBI दाखवून काँग्रेस मधून आयात केले जातील😂😂😂....... वॉशिंग पावडर मोदी
Jay Shree Ram *comment id 630* Real hindu accepted this rules are *10* *Ye comment sirf hinduo ke liye he baki log ignore kare.* Will you follow 10 passive rules? *Rule 1* Shantidoot dharm dekh ke logo ko marate he Tum dharm dekh ke sabji etc kharidi karoge? *Rule 2* Kam se kam khud ke family ki raksha kar sako itana mentally physically prepare hona chalu karoge?
राणे बद्दल बोलायच राहील चार वेळा पक्ष बद्दलून आज बीजेपी मद्ये राहून सत्ता उपभोगत आहेत जे एके काळी rss ला हाफ चड्डी फडणवीस ना वर टीका करत होते आणि आज महाराष्ट्र बीजेपी चा चेहरा बनू पाहत आहेत
@@ulhasguhagarkar6534 अगदीं बरोब्बर बोललात आपण . पण त्यातले काहीं नत-द्रष्ट खांद्यावर बसवले म्हणजे कानात मुत्र विसर्जन करणारच . त्याची मानसिक तैय्यारी असु द्यावी . 🤔🤔🤔🤔🤔🤔
आमच्या कांग्रेस कुटुंबातील मा. राधाकृष्ण विखे पाटील, अशोक चव्हाण, हर्षवर्धन पाटील, उदयनराजे भोसले, शिवेंद्रसिंहराजे, विजयकुमार गावित, बबनराव पाचपुते, राजळे, बोर्डीकर, कोल्हे अशा दोन चार डझन लोकांच राजकारण जिवंत ठेवले बद्दल भाजप चे खुप खुप आभार 🎉🎉🎉
सुरयवंशी भाऊ तुम्ही अगदी योग्य बोललात माझ्या मनातलं ! ही जी उपरी जमात भाजप गोळा करतआहे ते जनतेला पण आवडेल नाही हेच लोक यांची नौका डुबवणार आहेत याना कधी सद्बुद्धी येणार!
भाजप मधील उपरेच ( विखे, अशोक चव्हाण, बोर्डीकर, औशाचा पवार, नवनीतराणा, पदम पाटील व परिवार) या लोकांनी स्वार्थापोटी भाजपत प्रवेश केला.आणि सगळ्यात मोठी घोडचूक अजीत पवार यांना घेऊन केली.
अती तेथे माती होतेच.सैनिकांच्या निवासघोटाळ्याचं मतदारांना दुःख आहे.अशोक चव्हाणांचा पक्षप्रवेश लोकांना रुचला नाही.लोकुसभेत जे झालं ते विधान सभेत होऊ नये.
प्रभाकरजी आपण अगदी योग्य विश्लेषण केलं आहे, एवढं सगळं घडतंय, ज्या गोष्टी सामान्य माणसाच्या लक्षात येत आहेत त्या भाजपच्या वरिष्ठांच्या लक्षात येत नाहीत का असा प्रश्न पडतोय, श्री देवेंद्र फडणवीस ह्यांच्या सारख्या उत्कृष्ट, समर्थ नेत्या बद्दल जे काही घडवलं जातंय, बोललं जातंय ते ऐकून खूप वाईट वाटतय , जे स्वतःच्या पक्षासाठी आत्तापर्यंत झटले आहेत , निष्ठेने काम करत आले आहेत त्यांना पक्षाने दूर करू नये, देव करो आणि भाजपची विस्कळीत झालेली घडी पुन्हा व्यवस्थित बसो ,सगळं काही सुरळीत होवो,🙏
थँक्यू हा विषय उचलल्या बद्दल. अशोक चव्हाणांनी भाजपसाठी लोकसभा निवडणुकीत काही केल्याचे ऐकिवात नाही. अमित शहा आणि देवेंद्र फडणवीसांनी नक्की काय चालवलेय हा आम्हां मतदारांना पडलेला प्रश्न कार्यकर्त्यांच्या मनात आला तर काय नवल⁉️
अतिशय योग्य विश्लेषण सर. जेव्हा प्रवीण दरेकर हे भाजप आणि आरएसएस बद्दल टीव्ही चॅनल्स वर भरभरून बोलत असतात तेव्हा विचित्र वाटते.शिवसेना आणि मनसे मधून आलेले जर असे सांगत असतील तर काय बोलावे. लोकांना हे पटत नाही
नॉर्मली तुम्ही फक्त महायुती ची side मांडता म्हणून मला नाही आवडतं पण आज तुम्ही जो विषय मांडला तो अतिशय योग्य आहे आणि हे फक्त बीजेपी ह्या एका पक्षाकडून अपेक्षित न ठेवता सगळ्या राजकीय पक्षाने ह्यावर विचार केला पाहिजे जे संकट काळात आपल्या बरोबर निष्टेने राहिले त्या सामान्य कार्यकर्त्याला संधी द्या
Bjp ला बाहेरच्या लोकांना पक्षात घेणे हेच जास्त महागात पडणार आहे. अजून सुध्दा यांना लक्षात येत नाही हे दुर्दैव. आता वेळ निघून गेलेली आहे. सत्ता जाणार नक्कीच 😔
खालच्या कार्यकर्त्यांनी फक्त सतरंज उचलायच्या... ज्यांच्या विरोधात खूप काळ काम करावे लागले आज त्यांचाच प्रचार करण्याची वेळ स्थानिक कार्यकर्त्यांवर आली आहे.... पक्षश्रेष्ठी सत्तेत मश्गूल आहेत
असाच असावा परपक्ष प्रवेश , आणी पक्षांतर , अशोक चव्हाणांच्या जाण्यानं कॉंग्रेसचं नुकसान नाही ! आणी भाजपा ला फायदाही नाही ! झाला तो अशोक चव्हांना पश्चाताप.
प्रभाकरजी, आपले विश्लेषण योग्य आहे, फडणवीसांच्या वाटेतील अडथळे दूर करण्यासाठी खडसे, तावडे,शेलार,पंकजा, बावनकुळे, चंद्रकांतदादा, वगैरेनां पध्दतशीर खच्ची केले आहे.धन्यवाद.
सर प्रथम आपण भाजप ने गेल्या काही वर्षात केलेल्या चुका या मोठ्या चूकच होत्या हे अतिशय रोखठोक परखड पणे सांगितले त्याबद्दल अभिनंदन.या उलट आपलेच काही इतर ज्येष्ठ सहकारी राजकीय विश्लेषक याच चुकांना राज्यातील भाजप नेत्यांनी केलेली अतिशय चाणाक्ष मोठी खेळी असे म्हणायचे
एक दिवस भाजपला त्याचेच पारंपरिक मतदार लाथेने तुडवतील त्यात फडणवीसांचा नंबर वरचा असेल भले त्यांना भाजपच्या दील्लीतील अती शहा-ण्यांमुळे हे सर्व करावं लागतं असलं तरी
फडणवीस साहेब खुप मोठी चुक करुन बसलेत आपल्या पक्षाला मोठे करणार्या लोकांना बाजूला सारून पाहुण्यांना कवटाळत बसलेत ते निष्ठावंतांना कसे सहन होईल आता तरी जागे व्हा काय होईल जास्तीतजास्त बिनकामाचे पाहुने नाराज होतील पण पक्षही वाचेल आणि निष्ठावंतही
प्रभाकर आपण पोटतिडकीने पक्षाचे डोळे ऊघडण्याकरीता घसा कोरडा होईपर्यंत सांगण्याचा प्रयत्न करताय पण सदर पक्षाचे डोळे कधी उघडणार की मिटलेले च रहाणार ......
आज भाजपाची अशी अवस्था आहे की पक्षनिष्ठ लोक मैदानाबाहेर बसून सामना बघत आहेत आणि उपरे लोक मैदानात खेळत आहेत......भाजपाचा एक निष्ठावान मतदार म्हणून मला या गोष्टीची खुप खंत वाटते
हे बाकी 100% खर आहे इतर पंक्षातील आयात केलेल्या लोकांना महत्व दिल्याने भाजप च्या निष्ठावंत कार्यकर्ते नाराज होत नाहीत का . आणि तो निर्णय भाजप च्या मतदारांना कितपत पटला असेल?
खूप पवित्र कार्य करून आलेले असल्याने पावित्र्य मध्ये भर पडणार!!...सगळेच साधू आचार्य बाबा महाराज संत युगपुरुष महान कायदेतज्ज्ञ राष्ट्रभक्त नेत्यांच्या लांब च्या लांब रांगा लागल्या आहेत... अयोध्या badrinatghh जागा गेल्या म्हणून काय झाले .विधानसभेच्या निवडणुकीत तुमच्या आशीर्वाद भाऊसाहेब आणि कुलकर्णी साहेब यांच्या अफाट मेहनत मुळे 250 प्लस होतील याची संपूर्ण राज्याला खात्री आहे
या उपऱ्या लोकांनी भाजप ची खरंच वाट लावली. त्यात ही अजित पवार व त्यांचे सहकारी मंत्री मंडळात डेप्युटेशन वर आले आहेत. सामान्य मतदार या मुळे खूप नाराज आहेत व त्यामुळेच लोक मतदाना साठी बाहेर पडत नाहीत. 😮