तुझ्या विचारांच्या प्रगल्भतेला खरच सलाम करावासा वाटतो कारण जे बोलतोस ते खरंच खूप विचार करायला भाग पाडतोस तू आणि माणूस म्हणून आपण बरेच शिकायचं आहे असं वाटतं आणि हो मी सुध्दा एका गडावर हॉटेल चालवतो तिथे रस्ता नाही फक्त नैसर्गिक गोष्टी वापरतो जस चुलीवर चे जेवण त्यासाठी मी गोवऱ्या आणि अगदी वाळलेल सरपण वापरतो.तिथे पाण्याची तळे आहेत त्याचा वापर करतो.
दादा लिहून ठेव तु अाज ही मोठा अाहेस पण भविष्यात तु खुप मोठा माणूस होणार. तुला हा निसर्ग खूप देणार एवढं देणार की तुला ते घ्यायला कमी पडणार हा माझा शब्द अाहे. भविष्यातील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
प्रसाद खूप छान वायंगणी शेती दाखवले.किती पाणी पुरवठा योजना करून शेती केली जाते हे व्हिडिओ मुळे आम्ही बघतो.खरच आहे ज्याचा जवळ जमीन आहे ते असे पडून आहे नाहीतर विकत आहे.गाव आता शहर झाले आहे.खूप वाईट वाटते. प्रसाद तुझा व्हिडिओ बघून लोक विचार करतील अशी अपेक्षा आहे. प्रसाद तुला आर्शिवाद.असे माहिती देत रहा. देव तुझ्या कडून संदेश देण्यासाठी तुला बळदेत आहे. धन्यवाद.
खूप सुंदर विडीओ सर मी बीड मराठवाड्यातील शेतकरी आमच्या कडे शेत असणं म्हणजे एक अभिशाप कारण शेतकरी नवरा म्हणलं की शेतकरी मुलगीच त्याला नाकरते भीषण वास्तव आहे बीडचं कोकणा विषयीं आदर वाटतो त्यांनी त्याची संस्कृती जपुन ठेवली
ह्या भाजीची चव खूप सुंदर असते, कारण कोणतेच केमिकल चा उपयोग होत नाही, ह्या शेतीमुळे quantity कमी मिळेल पण quality व चव मात्र अप्रतिम. स्वच्छ पाणी, सुंदर हवा, व नैसर्गिक अन्न खावून हे लोक निरोगी जगतात. हे खरे जगणे आहे.
भावा तुझ्या प्रत्येक व्हिडिओ मधून तो दाखवलेला निसर्ग अगदी मनमोहक आहे असं वाटतं कधीतरी येऊन तुला भेटावं आणि खूप गप्पा माराव्या आणि पूर्ण निसर्ग न्याहाळत निसर्गाशी एकरूप व्हाव कारण कोकणातली मजा वेगळीच आहे
वा खरंच बाळा तुझे बोलणे शंभर टक्के खरे आहे खुप छान सुंदर सुरेख अप्रतिम मस्त असे विचार आहेत तसेच तू स्वर्गाहून सुंदर अशा निसर्ग रम्य अशा वातावरणात जगत आहे खुप छान प्रकारे सरळसोप्या पध्दतीने समजेल असे स्पष्टपणे सादरीकरण करतो आहे खुप आवडले बाळा हे तुझे कोकणातील जीवन खरचं आजच्या नवीन पिढीने तुझे नक्कीच अनुकरण करावे देव तुला भरपूर यश देवो तुझी भरपूर प्रगती होवो व तुझे जीवन या निसर्गाच्या सानिध्यात आनंदी मजेत सुखी व निरोगी दीर्घायुष्य जगो हीच देवाकडे प्रार्थना तुला माझे भरपूर आशीर्वाद व शुभेच्छा देव बरे करो तुला माझा सलाम❤❤❤
अप्रतीम, माझे कोकण पृथ्वी वरील स्वर्ग आहे. धन्यवाद प्रसाद खुपच छान माहिती दिली आहे. तुझं कोकणाबददल असलेल प्रेम,जिव्हाळा, कळकळ पाहून किती कौतुक करावे तेवढे कमी आहे.
प्रसाद मस्तच तु हे सगळं सांगतोस ते पटतं परंतु या वाढलेल्या लोकसंख्येला पुरवण्यासाठी हे शक्य नाही सगळ्या प्रकारचे नैसर्गिक स्त्रोत टिकले पाहिजेत हेही मान्य आहे परंतु आता भूकच एवढी प्रचंड आहे की ती पूर्ण करणे महा कठीण काम शेवटी काय कालाय तस्मै नमः धन्यवाद असेच चालू राहू दे
कोकणी रान माणसा तुझ्या या कार्याला पुन्हा एकदा सलाम ,व्हिडिओ मधील एरिया कोणता आहे कारण आम्ही कालच कोकण सिंधुदुर्ग फिरून आलो आणि काही वेळातच हा व्हिडिओ आला ,आम्ही सुद्धा सातारा भागात नैसर्गिक सेंद्रिय शेती करत आहोत .
दादा एकदम मस्त हिडीयो आहे.तुझे शिक्षण काय आहे.तुमांला शेती किती एकर आहे.तुम्ही खूप छान बोलता.माहिती पण छान देता.मी रात्री उशिरा कामावरून घरी आल्यावर हिडीयो नेहमी पहातो. कैलास उदार . शिक्रापूर.पुणे.
प्रसाद तू ज्या जीवनशैल चे चित्र उभं केलं आहे 11:12 ते पाहून मन भरून येतं . कारण ह्या जीवनशैली चा अनुभव मला आहे .पण आता ही परिस्थिती पुर्णपणे बदलून गेलेली आहे. त्याला अनेक कारणं आहे. असू दे . पण तू जे कार्य हातात घेतलेलं आहे त्या कार्यासाठी तुम्हाला सलाम .
Prasadbhaie.. Yours love nature is from heart to reserve for kokni manus..yours heart is for them..to keep safe like a Abhyarany..for next..justlike a sensitive American man who not count money..only love on Gods gift nature ..and do efforts to save it..U are Ran_Manus ..really..hats of to u....
लहान पणीचि आठवण झाली.तेव्हा बाबा पोरसु करीत.वायंगी,मके,चवळी,टमाटे,गावठी मिरचीचा अवान, भेंडी,लालभाजी करु.बाबा लाटेन पाणी काढीत.आमचे कूनगे खुप नाय पण होते तेच्यात सुखी होतव.गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी ❤❤❤😢
बरोबर आहे साहेब कोण कितीही आकाशात विहार केलान तरी जमिनीवर यावच लागत.माणूस आपल्या जलद सोईस्कर जीवनाच्या मागे व फायद्या साठी स्वतः ची वाट वभविष्यात येणाऱ्या पिढीची भीषण निसर्गाचं आव्हान उभ करत आहे थोडक्यात जगात कितीही तंत्र येऊद्या .पोटाची भूक मती तून च भागणार आहे हे सर्वांना समजलं पाहिजे💙💙💙💙
प्रसाद मी नादणी गवचा रहिवासी आहे. पंचगंगा नदी कोल्हापूर जिल्ह्याची वरदायीणी आहे ; पण प्रगती च्या नावाखाली पंचगंगगेला आम्ही सर्वानी गटारगंगा बनवलेली आहे पंजाब पेक्षा वाईट परिस्थिती इथे आहे सांगली मिरजेतिल सर्व कॅन्सर दवाखान्यात पाय ठेवायला जागा नही 😢😢😢😢