आतापर्यंत असं म्हटलं जायचं की शेतकरी केवळ शेतमाल पिकवतो आणि इतर व्यापारी त्याचा भाव ठरवतात. पण सोलापूरचे तरुण शेतकरी संदीप माने यांनी या विचाराला छेद दिला आहे. शेती करत त्यांनी स्वत: केळीचा व्यापार करायला सुरुवात केली, आणि आता ते दरवर्षी लाखो रुपयांची उलाढाल करत आहेत. 10 वर्षांपूर्वी त्यांच्या शेतातली केळी एका व्यापाऱ्याने फार कमी दराने विकत घेतली, म्हणून व्यथित झालेल्या मानेंनी स्वत: केळी विकायला सुरुवात केली. पण हा निर्णय आणि त्यानंतरचा प्रवास सोपा नक्कीच नव्हता.
#Banana #AgriMarketing #ModernAgriculture
___________
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
2 окт 2024