🧡🕉️🙏 तुमची प्रवचने मी अगदी वरचे वर ऐकत असतो. त्याने घालमेल कमी होते. तुम्ही सुद्धा ती प्रवचने परत एकदा मनन करत असालच. तशी स्वतःची स्वतःच्या मनाची चाचपणी करत असालच.
सर अनेकवेळा प्रयत्न केला, मन करा रे प्रसन्न कार्यक्रमावेळी भेटण्याचा, पण योग आलेला नाही. अगदी मनापासून इच्छा आहे, सांगली येथे तुमचा एक छोटा कार्यक्रम आयोजन करण्याची. कृपया कळवावे
आदरणिय सर, लाईट विषयावर आपण नेहमीच खूप छान बोलता पण कठीण अशा अध्यात्मिक विषयावर आपण खूपच छान बोलता. आपणास एक विनंती आहे की कृपया आपण भगवद्गीतेवरील आपली प्रवचने मला कोठे ऐकायला मिळतील ? मला खूप मनापासून ऐकायची आहेत. कृपया नक्की सांगा.
फार कठीण प्रश्न! पण अत्यंत सोप्या भाषेत समजावलं आहे! तरी प्रत्येक उपमा प्रत्येक वाक्य म्हणजे पूर्ण एक अध्याय वाटतोय! प्रत्येक वाक्याच अनेक वेळा पारायण करावं लागेल! विषय कठीण आहे!
संजय भाऊ नमस्कार.तुमच प्रवचन मी ऐकले.गीता उलगडून सांगण्याचा तुमचा प्रयत्न कौतुकास्पद आहे.पण गम्मत अशी आहे कि गीता ही श्रीकृष्णाने सांगीतलीच नाही.ती शिव परमात्म्याने सांगीतली. श्रीकृष्ण हा सत्ययुगात जन्माला आला.सत्ययुगात सर्व देवीदेवता असतात.ते सर्व पवित्र सद्गुणी असतात. निर्विकारी असतात.पूजा, अर्चना, यज्ञ,जप,तप हे सर्व द्वापर आणि कलियुगातच असतात.त्यामुळे त्या काळात गीता सांगण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.मग गीता कोणासाठी सांगीतली जाते तर कलियुगी विकारी मनुष्य आत्म्यांना. परमात्मा शिव ब्रह्माच्या शरीर रुपी रथात प्रवेश करुन गीता सांगतो.गीता ऐकणारे सर्व अर्जुन म्हणजे ज्ञान अर्जन करणारे विद्यार्थी आहेत. ईश्वरीय ज्ञान ऐकणारे, प्राप्त करणारे ते अर्जुन. गीता ही ईश्वरीय बुद्धी(मत) आहे. ब्रह्मा हा श्रीकृष्णाचा शेवटचा कलियुगी जन्म.त्यामुळे सर्व लोकाना वाटल की श्रीकृष्णानेच गीता सांगितली.शेवटच्या जन्मात श्रीकृष्ण हे नाव नसत. पण श्रीकृष्णाचाच आत्मा ब्रह्माच्या शरीरात असल्यामुळे तो पुन्हा पाच हजार वर्षांनंतर गीता ऐकतो.कारण त्याच आत्म्याला कलियगातून सतयुगात येण्यासाठी पुन्हा गीता ऐकावी लागते.गीता ही परमात्मा शिव सांगतो.एका अर्जुनाला नाही तर सर्व कलियुगी पतीत मनुष्य आत्म्याना. परमपिता परमपवित्र परमात्मा सृष्टी वर येऊन जो ज्ञानोपदेश करतो त्यालाच शास्त्रात गीता असे संबोधले आहे.गीता परमात्मा शिव प्रत्येक कलियुगाच्या शेवटच्या 100 वर्षात सांगत असतो.पण सर्वच लोग परमात्म्याच्या उपदेशानुसार चालत नाही. पवित्र बनत नाहीत.विकारांच्याच वशीभूत होत असतात.गीते नंतर महाभारत महायुद्ध होऊन त्यात संपुर्ण जगाचा अंत होतो आणि सतयुग येते. जेव्हा सर्व धर्मांचा विनाश होतो तेव्हा श्रीकृष्ण जन्माला येतो व देवीदेवता या नवीन धर्माचा उदय होतो. प्रत्येक जन्मात नाव बदलत असते.सतयुगात कोणीही भक्ती करीत नसतो कारण सर्वच देवीदेवता असतात.देवताना कलियुगाचे ज्ञान नसते.तेथे कंस अकासुर बकासुर नसतात.ही सगळी कलियुगी लोकांची नावं आहेत.प्रत्येक जन्मात नाव रूप देश काल समय सर्वच बदलत असते.ज्याला आई वडील असतात तो ईश्वर नाही.ज्याला मुलं होतात तो ईश्वर नाही.माखन चोर ईश्वर नाही.ज्याच्या कडे 16108 राण्या होत्या तो ईश्वर नाही.गीता सांगण्याचा हक्क परमात्म्याला आहे. परमात्मा ज्ञानाचा सागर आहे. श्रीकृष्णचाच आत्मा परमात्म्याकडून कलियुगात गीता ऐकतो आणि येणाऱ्या सतयुगात श्रीकृष्ण बनतो. म्हणून गीता भगवान उवाच आहे. श्रीकृष्ण उवाच नाही. श्रीकृष्ण हा दैवी सृष्टीतला मनुष्य आहे.भगवान परमात्मा शिव आहे.महादेव आहे ज्योती बिंदू स्वरूप आहे. सुक्ष्मरूप आहे. रुद्र ज्ञान यज्ञ म्हणतात. श्रीकृष्ण ज्ञान यज्ञ म्हणत नाही. परमात्मा निराकार आहे. श्रीकृष्ण साकार देवता आहे.उपभोगता आहे.परमातमा अभोक्ता आहे. अजन्मा आहे.सतगती दाता आहे. ब्रह्मा विष्णू शंकर या तीन देवतांचा रचैता आहे.तोच कलियुगी विकारी मनुष्य आत्म्याना पावन बनवतो.पाच विकार रूपी रावण दुर्गती करतो. भस्मासुर बनवितो. श्रीकृष्णाचे नाव शामसुंदर का बरे आहे? सुंदर म्हणजे पवित्र सतयुगात व शाम (विकारी) वाममार्गी कलियुगात. दूधाच्या डेरीचे नाव शिवगोपाल असं ठेवतात. म्हणजे शिवाने गोपाल याला गीता ज्ञान देऊन आपलसं केलं.शिवाने पार्वतीला अमरकथा ऐकवली ती ही गीताच होती.सीता हे संबोधन आत्म्यासाठी आहे.रामायण, महाभारत व इतर सर्व कथा या कलियुगातील काळाच्या वर्णनाच्या कथा रचून ठेवलेल्या आहेत.त्याच्याकडे आपण केवळ कथा म्हणूनच पहावे.पण वस्तुस्थिती वेगळीच असते हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. सविस्तर व सखोल माहिती ब्रह्माकुमारीच देऊ शकेल.कारण निकट सतयुगात जन्म घेणारे पवित्र आत्मे म्हणजे ब्रह्माकुमारीज आहेत. ब्रह्माच सृष्टी रचतो असे शास्त्र सांगते.मग ब्रह्माकुमारीना कोणी रचले. ब्रह्माने. ब्रह्माला कोणी रचले? परमात्म्याने. धन्यवाद.