सोळाव्या शतकाच्या उत्तरार्धात जन्माला आलेले संत शेख महंमद हे समतेचे तत्वज्ञान महाराष्ट्रभूमीत रुजवणा-या वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू संत होते. मालोजीराजे व शहाजीराजे त्यांना आपले गुरु मानत. मालोजीराजांनी श्रीगोंदे येथे त्यांना बारा बिघे जमीन इनामही दिली होती. तत्कालीन महाराष्ट्रातील अनेक पंथांमध्ये तात्विक सामरस्य निर्माण करत त्यांनी योगसाधनेतही उंची गाठली. महाराष्ट्रावर त्यांच्या तत्वविचारांचा मोठा प्रभाव पडला व तो पुढेही कायम राहिला. नंतरच्या पिढीतील संत तुकाराम व समर्थ रामदास यांच्यावरही तो प्रभाव दिसून येतो. समर्थ रामदास यांनी त्यांच्यावर जी ही आरती लिहिली ती तर एकेकाळी घराघरात गायली जात असे. समर्थ रामदासांचे शिष्य स्वामी जयराम यांनीही शेख महंमद यांच्यावर चरित्रात्मक अभंगही लिहिलेला आहे. शेख महंमद यांनी श्रीगोंदे व वाहिरा येथील आपल्या वास्तव्य काळात 1 ) योगसंग्राम 2) पवन विजय 3) निष्कलंक प्रबोध 4) साठी संवत्सर 5) स्फुट रचना 6) अभंग 7) गायका 8) मदालसा 9) हिंदी कवीता 10) ज्ञान गंगा आदी ग्रंथ त्यांनी लिहीले, त्यात योगसंग्राम हा त्यांचा मुख्य ग्रंथ आहे.
आजच्या उद्रेकी वातावरणात शेख महंमदसारख्या अतुल्य संतावर तेवढ्याच सामर्थ्याच्या समर्थ रामदास यांनी लिहिलेल्या आरतीचे सुरेल सादरीकरण राजेश दातार व त्यांच्या सहका-यांनी सादर करावे आणि ते सरहद म्युझिक सारख्या माणसे जोडण्याची परंपरा जिवंत ठेवणा-या संस्थेने करावे ही अत्यंत प्रेरणादायक बाब आहे. श्रोते ही आरती ऐकून माणसे जोडण्याच्या चिरंतन चळवळीचे आत्मिक हिस्सा होतील याचा विश्वास आहे.
Singer - Rajesh Datar
Lyrics - Shri Samarth Ramdas Swami
Music - Datta Thite
Additional Voice - Madhuri Kasat, Manjusha Narwadkar, Ashish Deshmukh & Sudhendra anagarkar
Keyboard & Arrangement - Madhu Redkar
Clarinet - Madhu Redkar
Sound Engineer - shreyas Dandekar
Mixing and masterin - Ajay Atre
Recorded at Pancham Studios
D.O.P - Nishit Hivarkar
29 июл 2023