माझी आई सीमा (80) आणि मी आपला शामू (60) धर्माने ज्यू, भायखळा,मुंबईहून चाळीस वर्षांपूर्वी स्थलांतर करून इस्राएल मधील तेल आविव शहरात स्थायिक झालो. तेव्हापासून अजून भारतात येणे झाले नाही मात्र लवकरच येण्याची फार इच्छा आहे. आम्ही आमच्या जीवनातील घटना, सहली, खाणे पिणे वगैरे मराठी भाषेतून आपल्यासमोर सादर करतो. गेल्या वर्षी आईला कॅन्सर झाला होता मात्र आता त्यातून ती सावरत आहे. मुंबईत असताना आई महानगरपालिकेत शिक्षिका म्हणून होती. माझी शाळा बालमोहन विद्यामंदिर दादर आणि कॉलेज दक्षिण मुंबईतील सेंट झेवियर्स. तसा मी आता ठणठण गोपाळ आहे. म्हणजेच घरातील गोष्टी सांभाळण्यासाठी मी गेली आठ वर्षे घरातच आहे. तसा मी ताजातवाना आहे आणि अजून माझे लग्न सुद्धा व्हायचे आहे. चेष्टा मस्करी आणि टिंगल हे माझे आवडते छंद. माझा सर्वात वाईट गुण म्हणजे मला कधी राग येत नाही किंवा कधी चिडत नाही. माझी आई सुद्धा तशीच.आम्ही मराठी बोलत असलो तरी आमची राहणी आणि खाण्यापिण्याच्या सवयी परदेशी आहेत.आठवडा दोन आठवड्यात मी लाईव्ह व्हिडिओ करतो अशावेळी आपणास माझ्याशी संपर्क साधता येईल. NO BUSINESS ENQUIRES ( I sincearly apologize)
ते नरम माती पाहून कुदळ मारणार म्हणजेच ते आपल्या सोबत ही असे करणार ह्याची खात्री आहे. हा माझा अनुभव आहे. पण, सर्वच करतील असे नाही. समाजात कट्टर असतील तर सज्जन देखील असतात. तर काही जण माणुसकी देखील दाखवतील. जर्मनीचा हिटलर जरी चुकीचा वागला असेल तरी जर्मनी काही वाईट नाही. ह्या समाजाला कायमत चे भय अधिक घातले आहे. मृत्यू कधी न कधी येणार पण माणसाचा जन्म का झाला त्याला मेंदू का दिला हा विचार करायला नको! कायमत का दीन आयेगा म्हणून काय तो आजच आणण्याची काय गरज! समाज संपण्याची भीती ह्या टोका पर्यंत गेली आहे की असे करून ते हे निर्माण करतात की " आम्हाला जगात काढीची किंमत नाही. " अन् असे काही झाले की समाजात मेसेज पाठवतात दुनिया आपल्याला संपवणार आहे. मग ती भोळी भाबडी जनता ही राज नेत्यांना साथ देते.
मुलं ज्या वयात आपले नाव सांगू शकत नाही त्या वयात ते आपले शत्रू कोण ते सांगते. अर्थात, जन्म जात मुलावर आपले संस्कार घडविलेले असतात आपला शत्रू कोण. माणूस जिथे माती नरम तिथे कुदळ घालतो. अर्थात गरम व्यक्ती दिसला की आपण तिथून निघून जातो पण नरम दिसला की त्याला सतवत बसतो. माझ्या ही सोबत थोडे असे काही होते. आपण शांत विचार करणारे. सर्वांना सारखाच मान देणारे. पण काही गैर आपल्याला त्रास देतात. का? * शिक्षणाचा अभाव * शिकवण * लालच * संस्कार लढाई केली म्हणजे काही जण ह्याला पुरुषार्थ कमवला असे समजतात. मग ते लेखक काय पुरुष नाहीत का! हे आपण जाणतो की ते पुरुष आहेत कारण आपण आपला मेंदू चालवतो पण हे इतरांच्या संस्काराने चालत असतात. आमचे लोक ह्या समाजाला म्हणतात " रस्त्यावरची बेवारस आवलाद. " पण आम्ही तसे म्हणत नाही. आम्ही काय म्हणतो, " तो खानदानी नाही, त्यांना जमाती शिक्षण आहे. "
माझ्या आजोबांनी एक छान अशी गोष्ट सांगितली होती..... " आई सर्वात जास्त प्रेम करते! " एका प्रयोग शाळेत एक माकड आणि तिचे मूल बंद काचेत ठेवले. त्या भांड्यात हळू हळू पाणी सोडण्यात आले. परीक्षण ह्या गोष्टीचे चालले होते की आई मुलाची रक्षा करते का! ते पाणी जस जसे वर वर येऊ लागले बाळ आईच्या गुढग्या वरून कमरेत मग कमरे वरून खांद्यावर चढले. खांद्यापर्यंत पाणी येताच आईने बाळ डोक्यावर ठेवले. पाणी डोक्यावर पोहचले अन् आई ने आपले मुल पायाखाली घालून स्वतःचा जीव वाचवू लागली. तात्पर्य:- जो पर्यंत परिस्थिती हातात असते तो पर्यंत आपण आपल्यांचा सांभाळ करू शकतो. पण परिस्थिती बाहेर गेली की मात्र आपल्या जिवाच्या बचावा साठी आपण आपल्यांच्या विरोधात देखील उभा राहू शकतो.
प्रत्येक व्यक्तीची प्रश्न पत्रिका वेगळी आहे अर्थात प्रत्येक व्यक्ती जवळ कमी जास्त आहे त्यावर त्याची उपजीविका असते. ती म्हण नाही का चणे आहेत पण दात नाहीत अन् दात आहेत पण चणे नाहीत. जगात अनेक वृत्तीचे लोक आहेत. कुत्रा मागे पडला की self defence चे विचार धावतात. आपण कुत्र्यावर दगड उचलला की कुत्र्याच्या मालकाला जीव दया दाखवण्याचे विचार येतात. अर्थात वेळ प्रसंग पाहून विचार बदलत राहतात.
छान वाटले तुम्ही इस्त्रायल ची परिस्थितीवर आम्हास सविस्तर सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न केलाय. दैवाने तुम्ही तिथे आहात. तुमचे नशीब बलवत्तर आहे. आमेन परमेश्वर तुम्हाला भरपूर आशिर्वादीत करो. आम्हाला जीवनात एकदा तरी आपल्या प्रभु येशूच्या गावी इस्त्रायल देशात यायचे आहे.
माझे संस्कार म्हणजे, " प्रत्यक्ष मी जे अनुभवले त्यातून पोष्टिक तत्व शोषून घेतले. " माझ्या ही समोर असे अनेक उदाहरणं येतात जिथे मला ही असे प्रश्न पडतात. की असे का? आणि पण मला थोडा वेगळा प्रश्न पडतो " माझ्या सोबत हे असे का वागतात? " आणि मला उत्तरे मिळत जातात.
असं का झाले? आणि ते आपल्या सोबत ही असे वागतील का? हा प्रश्न साधारण नाही आहे. हा प्रश्न सर्वांना प्रश्नात टाकणारा किंवा सर्वांना हा प्रश्न पडत असणारा प्रश्न आहे. छान प्रश्न आहेत. प्रश्न जेवढा मोठा तेवढेच उत्तर देखील मोठे आहे. युद्ध करून उत्तर एका शब्दात देता येईल पण जगा समोर जर स्पष्टीकरण द्यायचे झाले तर! एका शब्दात उत्तर देणे अवघड आहे.
लई भारी बोलताय राव. इतकी वर्षे महाराष्ट्राबाहेर राहूनही इतकी छान मराठी बोलता. मी हरखून गेलो. इथे महाराष्ट्रात राहूनही बरेचसे लोक एका वाक्यात दोन तीन शब्द री इंग्लिशमधील असतातच. तूम्हालाही कृष्मजन्माष्टमीच्या शुभेच्छा. आईंना निरोगी दीर्घायुष्य लाभो.
मला ही air ticket चे पैसे गेल्याचा अनुभव आहे. मी मुंबई चा पण job ला हैदराबाद ला होतो. पण घाई त air ticket चुकुन mumbai to Hyderabd काढली आणि मी hyderabd ला चे होतो😂😂 त्या time ला घाई केली आणि 1500 rs cancel ticket चे 5 minute मध्ये गेले. असे अनुभव आयुष्यचे धडे देऊन जातात. त्या दिवसा नंतर मी 60-70 वेळा air travel केले पण असी चूक परत केली नाही 😊