#water_treatment_plant #water_conditioner #electromagnetic_water_filter
Autofill Systems water condtioner experts
water treatment plant
water conditioner
water filter for borewell
वॉटर कंडिशनर मध्ये इलेक्ट्रॉनिक + मॅग्नेटिक अशी दोन्ही तंत्रज्ञान वापरले आहेत.
वॉटर कंडिशनर तंत्रज्ञानाची सुरुवात सर्वप्रथम रशियामध्ये झाली तिथे १९६५ साली चुंबकीय वॉटर कंडिशनर तयार झाले . काळानुसार बदल होत होत नंतर इलेक्ट्रॉनिक वॉटर कंडिशनर तयार झाले .
सर्वप्रथम हे लक्षात घ्या की वॉटर कंडिशनमध्ये क्षार काढले जात नाहीत पण क्षारांचे चिकटण्याचा गुणधर्म शंभर टक्के काढला जातो.त्यामुळे पाण्यामध्ये असून पण क्षार आपल्याला त्रास देत नाहीत.
आज २०२० मध्ये हे तंत्रज्ञान भारतामध्ये आणि संपूर्ण जगामध्ये तावून सुलाखून तयार झाले आहे . सर्व जगामध्ये फक्त पाण्यावर प्रक्रिया करून पांढरा मुऴाऴाची संख्या दुप्पट करणारे हे एकमेव तंत्रज्ञान आहे
घरगुती वापरासाठी वॉटर कंडिशनर वापरता येते ज्यामुळे भांड्यावर डाग , केस चिकट, केस राट , त्वचेला खाज येणे , RO मशीन देखभाल जास्त येणे, लादी खराब होणे , हे सगळे प्रश्न निकाली निघतात. कंडिशनर वापरल्यानंतर कपड्यांची चमक चांगली केस गळण्याचा प्रश्न निकाली.
वॉटर कंडिशनर चा सर्वात मोठा फायदा म्हणजे त्याला कुठल्या प्रकारचा देखभाल खर्च येत नाही देखभाल खर्च येत नाही .
क्षारयुक्त पाण्यामुळे होणारे जमिनीचे व पिकांचे नुकसान व त्यासाठी उपयुक्त वॉटर कंडिशनर तंत्रज्ञान
महाराष्ट्रातील शेतकरी सिंचनासाठी प्रामुख्याने पृष्ठभागावरील पाणी आणि भूजलाचा वापर करत आहेत. पृष्ठभागावरील पाणी म्हणजे नद्या, तलाव हयामधील पाणी जे हलके मानले जाते तर भूजल म्हणजेच विंधनविहिरी (भूगर्भातील पाणी) किंव्हा विहारीमधील पाणी ज्यामधे क्षाराचे प्रमाण अधिक असल्याने ते जड मानले जाते.
परंतु आता मागील काही वर्षांपासून सिंचनासाठी भूजलाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे आणि परिणामी क्षारयुक्त पाण्याच्या अतिरीक्त वापर शेतीमध्ये सिंचनासाठी केला जात आहे. क्षारयुक्त पाण्याचा वापर वाढल्याने त्याचे दुष्परिणाम जमिनीवर व शेतीमधील उत्पादनावर दिसून येत आहेत.
क्षारयुक्त पाणी ठिबक सिंचनाद्वारे वापरल्यास ठिबक सिंचनाची विविध उपकरणे क्षार साठून खराब होत आहेत किंवा त्यांच्या कार्यक्षमतेत घट होत असल्याचे दिसून येत आहे.
पाण्यामधील क्षाराची कारणे:
१. भूजलातील पाण्यामध्ये किती क्षार आहेत हे ठरण्यामागे तेथील भौगोलिक परिस्थिती, मातीतील क्षारांचे प्रमाण, खडकांचा प्रकार असे अनेक घटक कारणीभूत असतात. पावसाचे पाणी किंव्हा पृष्ठभागावरील पाणी जमिनीत मुरताना किंवा झिरपत असताना ते मातीतून, खडकामधून वाहत जात असते. या वेळी मातीतील क्षार पाण्यात विरघळतात.
२. साधारणतः क्लोरीन, बायकार्बोनेट, कॅल्शिअम, मॅग्नेशियम, सोडियम, बोरॉन व लिथियम यासारखे क्षार पाण्यात मिसळले जातात.
क्षारयुक्त पाण्यामुळे होणारे दुष्परिणाम:
१. पिकांना सतत क्षारयुक्त पाणी दिल्यास जमिनीतील क्षारांचे प्रमाण वाढते. मातीवर क्षारांचा पांढरा थर जमा होतो व जमीन क्षारपड होते. यामुळे जमिनीचा पोत बिघडून कस कमी होतो. तसेच क्षारपड झालेल्या जमिनीमध्ये बियाण्याची उगवण देखील कमी होते.
२. सध्या सिंचनासाठी ठिबक सिंचन मोठ्या प्रमाणात वापरले जाते. परंतु ठिबक सिंचनमध्ये क्षारयुक्त पाणी वापरल्याणे ठिबक सिंचन प्रणालीमधील नळ्यांमध्ये आणि छिद्रांमध्ये कॅल्शियम कार्बोनेटचे थर जमा होतात व छिद्रे बुजून जातात त्यामुळे पिकांना पाणी मिळत नाही त्याचसोबत ठिबक सिंचन प्रणालीच्या देखभालीचा खर्च देखील वाढतो.
३. पाण्यातील क्षारांचा पिकाच्या मुळांवर देखील दुष्परिणाम होतो. क्षारांमुळे पिकांच्या मुळांभोवती एक आवरण तयार होते त्यामुळे मुळांची नीट वाढ होत नाही व परिणामी पिकांची वाढ खुंटते व उत्पन्नावर त्याचा परिणाम होतो.
काय आहे " इलेक्ट्रॉनिक वॉटर कंडिशनर" चे तंत्रज्ञान:
1.
२. वॉटर कंडिशनरमध्ये इलेक्ट्रॉनिक आणि मॅग्नेटिक ही दोनही तंत्रज्ञान वापरलि जातात
३. जेव्हा क्षारयुक्त जड पानी ह्या वॉटर कंडिशनरमधून जाते तेव्हा त्या पाण्यावर असंख्य विशिष्ट प्रकारची चुंबकीय कंपने तयार होतात. ही कंपने वारंवार बदलत असल्याने पाण्यात विरघळलेल्या क्षारांचे रूपांतर हे न विरघळणार्या क्षार कणामद्धे होते.
४. हे क्षारकण न विरघळणारे असतात व त्यांचा चिकटण्याचा गुणधर्म संपलेला असतो त्यामुळे हे क्षारकण पाण्यात असूनदेखील पिकांच्या मुळाला व जमिनीला घातक ठरत नाहीत.
५. वॉटर कंडिशनर मध्ये कोणत्याही प्रकारचे रसायन, मीठ अथवा फिल्टर वापरले जात नाही.
६. वॉटर कंडिशनरला कोणत्याही प्रकारचा मेंटनन्स देखील लागत नाही त्यामुळे एकदा हे वॉटर कंडिशनर बसविले की अनेक वर्ष काही बिघाड होत नाही
७. ठिबक सिंचन पद्धतीमध्ये देखील ह्या वॉटर कंडिशनरचा खूप फायदा होत आहे. ठिबक सिंचन प्रणालीमद्धे नळ्यांमध्ये आणि छिद्रांमध्ये क्षार साठून चोकअप होत नाहीत त्यामुळे ठिबक सिंचन प्रणालीचे आयुष्यमान देखील वाढते.
8 сен 2024