मी स्वतः एक मुस्लिम आहे माझ्या असे असंख्य बहिणींना मनापासून आशीर्वाद आहे जीवन कठीण आहे पण एक भाऊ म्हणून मी तुमच्या पाठीशी कधीही खम्भीर पणे उभ आहे कारण माझी स्वतः ची बहीण वयाच्या एकवीस वार्षिच विधवा झाली माझे भावजी हार्टअटेक नि ह्या जगाचं निरोप घेतले अत्ता सोळा सतरा वर्ष झाले हे दुःख मी खरंच समजू शकतो म्हणून सर्व माझ्या बहिणीना आपल्या ह्या भावाचं मरे पर्यंत आशीर्वाद आहे व राहणार ताईच प्रवाचन खूप काही सांगून गेलं जय महाराष्ट्र 🙏🙏🙏
@@bharatrasve416 भावा जीवनात फक्त माणुसकी असते जात धर्म नसतंय मला एक आवळ आहे जे धर्मा चे चांगले प्रवचन असतंय ते मी आवर्जून बगतो कारण जीवनात आपण दुसऱ्याच्या सुख दुःखात त्यांची मदत करू हिच शिकवण माझे बाबा. आई. ने दिलं 👍🙏🤝
खरच खूप अवघड आहे विधवा स्त्रीच जगण, मला पन एक मुलगा आहे,, माझ वय फ़क्त २२ वर्ष आहे, माझे मिस्टर पन सोडून गेलेत, विधवा स्त्रीला समाजात खूप कमी समजल जात , तुम्ही माझ्या आई सारख्या आहात , तुमच्या शब्दात जे चार शब्द समाजा समोर ठेवलात त्या बद्दल मनापासून thanks🙏
ह. भ. प. नागेश्वरी झाडे ताई खूप चांगल संदेश तुम्ही समाजाला दिलं मी एक मुस्लिम आहे पण तुम्ही दिलेला संदेश हा हृदयाला स्पर्श केल विधवा पण एक मुलगी. एक पत्नी. एक आई एक बहीण असते समाजात आयुष्य जगणं किती कठीण होत असत हे मी स्वतः आपल्या डोळ्याने पहिले आहे कारण माझी बहीण स्वतः वयाच्या एक्विस वर्ष असताना विधवा झाली व दोन लहानश्या मुलांना घेऊन आज पर्यंत जगत आहे गेले सोळा वर्ष ती संगर्ष करत आहे तरी आम्ही सर्व भाऊ त्याच्या पाठीशी खम्भीर उभे आहात पण त्याच दुःख आम्ही कसं सहन करताव ताई आपण चांगल्या विषयावर प्रवाचन केलं धन्यवाद 🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐
मी माझ्या आईवडिलांनी मला चांगले शिक्षण दिलेल असल्याने आता स्वत: सर्व घर सांभालते .मी शिक्षिका आहे आणि घरी क्लासैस पण घेते .तुमचे मी पहिल्यांदाच हे किर्तन ऐकले पण मनाला स्पर्श करणारे आहे तुमचे शब्द खुप छान.
खुप छान मुद्दा मांडला खरच विधवा स्त्री च जगणं अवघड आहे. तरुणपणी विधवेच जगणं कोणत्याही स्त्रीला येऊ नये. जरी तसं झालं तर नातेवाईकांनी तीला हीन, वाईट नजरेने न पाहता तीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायला पाहिजे. 🙏🙏🙏
खूप छान कीर्तन करता ताई तुम्ही पण जे वेळ माझ्यावर आली ते वेळ कोणावरही येऊ नये कारण जे मी आता जीवन जगतो ते विधावाच खूप अवघड असते हो ताई मी 18 वर्षाची होती तेव्हा माझं 6/5/2015 ला माझं लग्न झाल आणि मला 2016 ला मुलगा झाला आणि 30/4/2018 ला माझ्या मिस्टरचा ॲक्सिजेंट झाला तेव्हा माझं एक बाळ पोटात होत आणि ते 9/5/2018 ला सरले😭 मग 5 दिवसात माझी डिलीव्हरी झाली आणि मुलगी झाली मग मी आई बाबा कडे राहते पण माझ्या बाबांचे 2021 ला निधन झालं आता मला कुणाचा पण आधार नाही मी आणि माझे मुलं कशे जगावे ते कळेना एक तर जगता येत नाही एक तर मरता पण येत नाही मुलं दिसालेत समोर खूप काही आहे पण माझं नशीबच फुटके आहे 😭😭😭😭
खूप छान मेसेज आहे समाजाला, मुलींनी लहानपणापासून खंबीर होयला शिकले पाहिजे, लाईफ मध्ये जर कधी काही काहीं अवचित घडले तर शिक्षणाने स्वतःच्या पायावर उभे राहून स्वावलंबी जीवन जगण्याची जिद्द येते.🙏👍
एकदम बरोबर बोलले ताई तुम्ही खरच आहे बाई च जगण नवरा नसताना खरच खूप कठीण आहे बाई कीतीही चांगली वागली तरी समाज निठ जगु देत नाही हे सत्ये आहे प्रत्येक मुलीच्या आई वडिलांना कळकळीची विनंती आहे मुलींना शिक्षण पूर्ण झाल्यावरच मुलीच्या लग्नाचा विचार करा कारण कोणाच्या नशिबात काय लिहीलय ते सांगता येत नाही म्हणून मुलींना शिक्षण पूर्ण करून स्वाताच्या पायावर उभे राहण्यासाठी मुलींना शिक्षण द्या
खरंच खूप छान सांगितले ताई या जगात जे चाललय तेच तुम्ही सांगता . जगाचा बघण्याचा दृष्टिकोन खूप.वेगळा आहे. तुम्ही जर अशीच कीर्तनातून सगळ्यांना जर सांगितलं तर खरच जगात सगळ्यांचे मनाचे परिवर्तन झालेच पाहिजे. आणि एका स्त्रीला बघण्याचा दृष्टीकोन ही बदलेल.
बोलणारे व तुमच्या बाजुने लढणारेही आहेत पण जे तुमच्या साठी लढतात त्यांना ओळखा व तुम्ही महिला एकत्रित येवुन लढणार्याच्या पाठीशी ठाम पणे उभे राहा तुम्हाला जगण्यासाठी न्याय हवा आहे तुमच्यावर समाजाकडून होणारा अनन्याय अत्याचार थांबायलाच हवा ,विधवा स्त्रीला मान मिळायलाच हवा तीलाही मन आहे भावना आहे इच्छा आहे ,मग तिचं जगणं समजून न घेता तिने कुठपर्यंत असं रडत जगायचं ,समाजाचा दृष्टीकोन चुकीचा आहे विधवा स्त्रीला बघण्याचा,पण तीच मन न समजुन घेता तीला नावं ठेवणारे त्रास देणारेच खुप जास्त आहे,पण तुम्ही आता एकत्र या माऊल्यानो तुम्हाला तुमचा हक्क अधिकार मिळवून देण्यासाठी आम्ही आहेत
ताई स्त्री साठी तुमचं कळकळीची किर्तन मनाला खुप चांगलं समाधान वाटत ताई माझे पती पण मिलट्रीत होते ते ड्युटी वरच शहीद झाले तेव्हा माझं वय चोवीस वर्षे होतं , तुम्ही बोलता तो प्रत्येक शब्द बरोबर आहे माझं लग्न वयाच्या चौदाव्या वर्षी झालं आज माझे पती जाऊन अठरा वर्षं झाली काय करणार सगळी जबाबदारी मुलींचे लग्न शिक्षण सर्व काही करावं लागतं, लोकांच्या नजरा टोमनी सगळं सहन करुन संघर्ष करत आले🙏
कांबले तुम्ही उत्तम वीचार ठेवले आहे जे सत्य आहे, खरोखर आहे ,हे असेच होत आहे मुली लग्न झाल्यावर सासु सासर्या ला जवल राहु देत नाही , हे खरे आहे, म्हन्जे थोड्कयात। संस्कार बरोबर दिले नाही ,आई वडीलाने असेच म्हनावे लागेल।
हे अगदी खर आहे ताई हा समाज जिवंत पणीच मरणाचा अनुभव देत असतो खुप प अवघड असत हे विधवेच जिवन त्या जिवणात जगण्या पेक्षा मरन खुप सोप वाटु लागत. पण नाईलाज असतो जगण्याला कारण एक विचार असा ही असतो आपण गेल्या नंतर आपल्या मुलांच कस होणार?कारण हा समाज खुप विचित्र आहे.
ताई खरंय आपण बोलता ते .विधवास्रीचे जीवन हे खरंच हलाखीचे असते. तिची बीचारीची त्यात काय चूक नवरा अर्ध्यावर सोडून गेला .कोणी कोणाचे मरण पाहिलेले नाही. समाजाने पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे आधार दिला पाहिजे. अशी वेळ कोणावरही येऊ नये.
ताई तुम्ही खूप छान पद्धतीने समाजात वावरताना एका विधवा स्त्री ची सत्यता मांडलात ,मुलींना शिक्षणाची खूप गरज आहे ,आणी मुलींना शिकवले पाहिजे , मुलगी असो वा मुलगा दोघांना ही समान अधिकार आहे, 🙏
आहो किर्तनकार ताई.मुळात विधवा हा शब्द शब्दकोशातला नाही..जर पतीच्या म्रुत्यूनंतर समाज वाकड्या नजरेने पाहत असेल तर..पुनर्विवाह करायला हरकत नाही..आणि हो एक गोष्ट सर्व महिला वर्गाला सागू इच्छितो की..भागवत गीता वाचत बसल्यापेक्शा संविधानाने महिलांना दिलेले अधिकार वाचा..बाबासाहेब आंबेडकर कायदेमंत्री असताना 1935 साली महिलांसाठी एक कायदा हिंदूकोडबीलाच्या माध्यमातून महिला आरक्शण.दिलेले आहे..माझा किर्तनास विरोध नाही.माझा भागवत गीतेस विरोध नाही..माझा विरोध शिक्शित पीढी अशिक्शततेसारखी वागत त्या पीढीस विरोध आहे..शिका संघटीत व्हा संघर्ष करा हा बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला मुलभूत मंत्र.आठवण करा..देशातील एकमेव महिला..म्हणजेच सावित्रिबाई फुले.ज्यांना महिलांच्या शिक्शणासाठी.पुण्यामधे भारतातील पहिली शाळा उघडली त्यांचा आदर्श.डोळ्या समोर ठेवा.....जय शिवराय जय भिम जय संविधान🙏🙏🙏
तुझ्या बापाने कायदा निट लिहला नाही सगळं काँपीपेस्ट आहे संविधान त्या मुळेच आता लोक सुखी नाही आहे कायद्यात सगळ्या पळवाटा आहे माणूस मेला तरी न्याय मिळत नाही काय नाकाने कांदा सोलतो जे अभ्यासात हुशार आहे ते घरी अन जे येडे टोनगे ते मोठ्या पदावर जात पात मानू नका बोलता अन जातीवर अरक्षण दिलं जातं ,खोट्या अँट्रासिटि करून लोकांना त्रास द्यायचा असा कायदा असतो का