नव्या उमेदीने जगायची प्रेरणा देणारी कथा आहे. दुसऱ्यांची वेदना समजून घेणे किती महत्त्वाचे आहे हे लक्षात येते.जिद्दीने कुठलंही काम केले की यशस्वी होता येते. इतरांना प्रकाश देणारा दीप होता आलं पाहिजे.शक्य तेथे आधाराची काठी होता आलं पाहिजे. उशिरा का असेना पण स्विकारलेल्या जबाबदारीची जाणीव झालीच पाहिजे..... स्वताला कधी शंकरच्या ठिकाणी तर कधी संपत च्या ठिकाणी ठेवून कथा ऐकत होतो... सगळे प्रसंग जणू काही माझ्याच बाबतीत घडत आहेत असे वाटत होते... अंतर्मुख करणारी ही कथा आहे. खूप सुंदर सादरीकरण..... प्रत्यक्ष माननीय आप्पा साहेबांच्या जादुई आवाजामध्ये ऐकल्यावर मन आनंदी झाले.🎉 धन्यवाद सर .