गुरू कोण होते त्यांची भेट झाली होती की नव्हती ह्या सर्व पेक्षा त्यांनी काय शिकवलं आपण त्यांच्याकडून काय शिकू शकतो ह्या गोष्टींकडे कडे लक्ष दिलं पाहिजे (जे सध्या होत नाहीये) 🙏🚩
खूपच महत्वपूर्ण माहिती साठी धन्यवाद. 🙏 उगाच खोटी माहिती आणि इतिहास पसरवत आहेत त्यांना जबरदस्त चपराक. छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरू राजमाता जिजाऊ आणि शहाजीराजे हेच 🙏🚩
रामदास स्वामी हे गुरू नव्हते हे सत्यच आहे. पण उत्तरकाळात एक विशेष नातं त्यांच्यात आणि महाराजांमध्ये होतं ही म्हणायला नक्कीच जागा आहे. ह्याच्यात एक मुद्दा राहतोय तो म्हणजे संभाजी महाराजांना सज्जनगडावर पाठवलं जे की अनुपुराण ह्या शंभू महाराजांच्याच सांगण्यावरून लिहिल्या समकालीन ग्रंथावरून सिद्ध होतं. गृहकलह आणि राज्याचं भवितव्य ह्या सारख्या महत्त्वाच्या आणि संवेदनशील बाबतीत रामदास स्वामींच्यावर महाराज विश्वास टाकायला तय्यार होते, म्हणजे त्यांचे नाते (उत्तरकाळात) घनिष्ट होते असे वाटते. इतर संत महाम्यांना कोणता गढ देण्याचा privilege दिल्याची नोंद नाही. परंतु १६७६ सालचं जिजोजी काटकर ह्यांना लिहलेले पत्र हे अस्सल आहे तुम्हाला माहीतच असेल. संभाजी महाराजांना लीहलेल्या पत्रातून अधिकारी वाणी दिसते, आणि त्या पत्रातील मजकुराबाबतीत वाईट न वाटून घेता शंभू राजांनी संप्रदाया कडे विशेष लक्ष दिले मग त्यात अगदी दोन शिष्य ह्यांच्या मधले वाद वैगरे मिटवणे सुद्धा. ही पत्र जयसिंगराव पवार ह्यांच्या स्मारक ग्रंथाच्या शेवटी सापडतात. एवढेच काय, समर्थ साहित्यात कित्येक ठिकाणी स्पष्ट दिसते की रामदास स्वामिंवर किती प्रभाव पडला होता स्वराज्य कार्याबद्दल. ह्यात आनंदवन भुवनी कविता, दासबोधातील उत्तंपुरूष निरूपण समास हे तर स्पष्ट पणे शंभू राजे सज्जनगडावर असताना केलेला उपदेश दिसतो. त्याच्यात ' तुमच्या वर तुळजा भवानीची कृपा आहे ', ' म्लेंच्छ ह्यांचे बंड बहुत माजलेले आहे ' , ' दोन गट पडू देऊ नये' ' सावधान raha' इत्यादी आहे. सारांश, असे वाटते की १६७०-१६८० मध्ये महाराज आणि रामदास स्वामी ह्यांच्या (हातावर मोजण्याइतक्या) भेटी झाल्या असाव्यात आणि परस्पर विश्वास बसला असावा. उत्तर कालीन लेखकांनी ह्या सत्याची अतिशोयक्ती करून दिली आणि त्यांना गुरूपद दिले.
इतके सगळे दाखले देवून समाधान होत नसेल तर मग कमाल आहे शिवाय सावंत सरांनी जो अभ्यास केलाय तो काही काम नव्हत म्हणून नव्हे एखादया मुद्याला राज्य सरकार पण सरांचा सल्ला घेत
सर तुम्ही फार वस्तुनिष्ठ मांडणी केली. तुमचे सर्वच व्हिडिओ बहुजनांच्या Unlearning आणि Relearning साठी खूप महत्वाचे आहेत. तुकाराम महाराजांच्या बाबतीत असहमातीचा एक मुद्दा मांडतो. तुकाराम महाराज आणि शिवाजी महाराज भेटल्याचे ठोस पुरावे उपलब्ध नसले तरी त्यांची भेट घडली असेल आणि वारंवार घडली असेल असा तर्क देतो येतो की. केळुस्कर गुरुजींच्या शिवचरित्रात मी एक नोंद वाचली होती. शिवाजी बंगळूर वरून पुण्यात आल्या नंतर त्यांनी जहागिरीत एकप्रकारे जनसंपर्क मोहीम राबविली होती. ते लोकांना भेटत, त्यांना प्रेरित करीत. या पार्श्वभूमीवर जे शिवाजी जहागिरीत गावोगावी फिरून अतिशय सामान्य लोकांना भेटतात, त्यांच्याशी ओळख, संवाद रुजवतात, ते शिवाजी, तेव्हा पंचक्रोशीत अफाट प्रसिध्दी पावलेले तुकाराम यांना भेटले नसतील काय? त्यांच्याशी त्यांचा संवाद झाला नसेल? ठीक आहे की महाराजांना आहे तशी लांब दाढी तोवर आली नसेल. पण सादरीकरण त्रुटी पूर्ण झाले म्हणजे तो प्रसंग घडला नसावा असा तर्क काढता येईल?
या ठिकाणी मी सर्व अभ्यासकांना सांगेन की, खरा इतिहास समजायचा असेल तर, आप्पा परब, मेहेंदळे, बलकवडे यांचे व्याख्यान ऐका. गो.नि.दांडेकर, केळुस्कर , निनाद बेडेकर यांचं लेखन वाचलेलं चांगलं. तर्कावरचा ईतिहास ऐकून मनात गोंधळ निर्माण करुन न घेणं केंव्हाही चांगलं.
प्र के घाणेकर याचं पण अभ्यास तितकाच आहे. विशेष म्हणजे निनाद बेडेकर यांच्या बरोबर त्यांची 45 वर्ष मैत्री होती सो बहुतेक वेळा दोघं एकत्र गड किल्ल्यांवर गेल्याच ते स्वतः नमूद करतात .
मुलांना स्वराज्य स्थापन कर म्हणून गुरू होणारी माउली आपल्या पतीला स्वराज्य स्थापन करा अस का बर सांगू शकली नसेल हा प्रश्न इतीहास सांगणार्याना कधी पडत नाही.
Swaraj(rule of local people) idea is old and originated with Shahaji Maharaj when he became powerful in Nijamshai. Problem with this idea of rule of local people was dangerous due to more competitors to take leadership. Everyone wanted to be addressed himself as Rajas of small area now even smaller than Taluka in modern India. Shivaji inherited this idea from his father and was well suited for it. Elder brother of Shivaji Maharaj, Sambhaji remained with his father and joined campaigns. He was a soldier and died young. The situation for Shivaji was different. He and his mother were isolated in Pune where very early if life Shivaji took over ruling his small Jahagir of Pune far away from Bujapur. It was a neglected part of Adilshahi. Everything was in favour of a new rising star. Enemy was not Adilshahi but Jahgirdars around Pune challenging his rule. They were all worked for Bijapur. Shivaji Maharaj showed extraordinary gift and talent to mix with everyone and Scout the correct person for perticular work. He treated everyone the same with friendship which was not seen anywhere else that time. Everyone was rude and arrogant. Shivaji Maharaj had charisma, intelligence and luck on his side. He was not a disciple of anybody and nobody was his Guru. He consulted but did his own way. He showed a leadership in fronting Afzalkhan and killing him. This incidence in his life helped to spread his fame far and wide. He was calculsted risk taker He respected all but his decision was final.His rule was strict and shown in right at the beggining when he ordered to chop the hands and legs of rouge Patil. Next, he orders to his army not to touch women and crop of farmers. He gouged the eyes out of his brother in law, Brother of Sakwarbai Gaekwad his wife, becuase he tried to rape a woman. Shivaji Maharaj was far ahead of his time. He trusted simple people on the fringe of the society. Even after four hundred years and education they still remain at the fringe of the society. He utilised wisdom and experience of educated people of his time, as well as valor, bravery and sacrifice of ordinary army. Shivaji Maharaj's greatness lies in, taking common farmers and making then fighting knights with gift only a skillful sculptor has who from simple clay makes an extraordinary sculptures!
आपल्या हिंदू संस्कृतीत "गुरू " हे असतात च त्याला अपवाद आपले देव सुद्धा नाहीत . भगवान दत्तात्रेय यांना देवांचे गुरू म्हणून आपण मानतो . आपली आई आणि वडील हे जन्मजात आपले गुरू असतात त्यांना कोणत्याही वेगळ्या पदवीची आवश्यकता नाही . श्री शिवराय हे मनुष्यरुपी एक दिव्य शक्ती होते त्यांना कोणत्या गुरू ची गरज नाही म्हणणं चूक आहे . गुरू ची निवड त्याच्यातल्या गुणांवर आधारित असतात ना की जातीपातींवर, मला वाटतं आपण जसं सांगितला त्यामधे उल्लेख आहे शाहजी राजे नी अनुभवी अशी माणसं शिवरायां सोबत दिली होती तेच त्यांचे त्या त्या विषयातले गुरू असावेत .
Why are we even discussing this? Why is it important who the guru and who is shishya? Both respected each other and contributed to swarajya in their own way.
संत तुकाराम महाराज हे खूप दृष्टे संत होते,पण त्यागी ,विरागी होते,जेव्हा महाराज त्यांना आपले गुरू करण्याची विनंति करावयाला गेले तेव्हा तुकाराम महाराज त्यांना म्हणाले आम्ही विरागी विचाराचे संत आहोत तरी शिवबा आपण राजकारणी,समाजकारणी व जीवन विद्येचे गुरू संत समर्थ रामदास ह्यांना आपले मार्गर्दशक म्हणून स्वीकारावे,ह्यात स्वराज्याचे भले आहे असे निस्वार्थ बुध्दीने कळकळीने सांगितले! छत्रपती शिवाजी महाराजांनी ह्याची मासाहेब जिजाबाई व इतर कारभाऱ्यांन कडून खातरजमा करून घेतली.
Dadoji kondadev was no one and is incorrect history ..Shri Shahaji Maharaj and Shri Jijau mata were the only guru..mostly it was Shri Chatrapati Shivaji Maharaj who highly intelligent and exceptional personality
एकंदरीत इतिहासकारांना कुठल्याही परिस्थितीत हेच म्हणायचंय की शिवाजी महाराज समर्थ रामदासांचे गुरू नव्हतेच! पण कधीतरी त्यांचा संबंध आला आहे हे तरी मान्य करायला हवे.
@@prasadkulkarni4517 पंत आमचे संस्कार नका काढू आम्हाला माहित आहे हो तुम्ही माउलींना आणि संत तुकारामला काय वागणूक दिला आहात..आमच्या साठी रामदास फक्त एक लंगुटधारी आहे...
आपण गुरू या शब्दाचा अतिशयोक्ती मध्ये वापर केला तर चुकीच वाटत पण राजकीय व्यक्ती एखाद्या धार्मिक गूरूंचा आशीर्वाद किंवा मार्गदर्शन घेऊ शकतो.जसे देवेंद्र फडणवीस हे बागेश्वर धाम च दर्शन घेतात काही प्रमाणात मार्गदर्शन पण घेतात तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच असु शकतं.केव्हा तरी महाराजांनी समर्थ रामदासांच आध्यात्मिक मार्गदर्शन घेतल असेल.गुरू या शब्दाचा उगाच बाऊ करण्यात काही अर्थ नाही.
संकेत कुलकर्णी यांनी लंडन मधून प्रचंड मेहनत घेऊन समर्थ रामदास स्वामी यांची अस्सल पत्र शोधून काढली याचा व्हिडिओ ऐबीपीमाझा वर आलेला आहे परत तंजावूरच्या सर्फोजीराजे भोसले यांच्या सरस्वती महाल या प्रचंड मोठ्या लायब्ररीत बाड क्रमांक सहित सगळी पत्र शिवाजीमहाराज व रामदासस्वामी यांच्या हातची उपलब्ध आहेत संभाजीमहाराज यांनी समर्थ रामदास स्वामी यांची समाधी मंदिर बांधले आहे व सज्जनगडावर ही पत्राची नक्कल आहे बर छत्रपती शिवाजीराजे सगळ्या संताचा आदरच करणारे होते व त्यांनी सगळ्या संताचा सल्ला नक्कीच राजकारणात घेतला असणार हे सत्यआहे शिवाजीमहाराज हे शंभरटक्के हिंदूधर्म संस्कृतीच प्रतीनीत्व करत होते हे नक्कीच शिवाजीमहाराज व रामदास स्वामी कुठेही ऐकमेकाला गुरू शिष्य म्हणताना आढळून येत नाही
संकेत कुलकर्णी यांनी लंडन मध्ये प्रचंड मेहनत घेऊन बनावट पत्र मिळवली आणि बनावट समजतात खुलासा करण्याची मेहनत पण नाही घेतली. असे अर्धवट इतिहासकार आता तयार झाले आहेत
गूरु घराणं बघून नाही, ज्ञान बघून करायचा असतो. श्री दादोजी कोंडदेव प्रथम गुरु होते,प्रभू रामचंद्र, श्री कृष्ण देव अवतार असूनही गुरु होते. कुणीच पुर्णावतारी नसतं, कागदपत्रांची बाब सांगून तुम्ही दिशाभूल करताय. जावळी चं वर्चस्व जावळी पासून बेंगलोर पर्यंत होतं. चाफळ आणि सज्जनगड या प्रांतात होते. बामसेफ विचार आणि पिवळी पुस्तकं प्रसारीत करुन असा भेदाभेद न करावा हे चांगले. ब्राह्मण द्वेष हा एकमेव विडा उचललेले तुम्ही. हेच बोलणार आणि आपलं तेच खरं म्हणाणार. अरे बाबा, रामदास संभाजी राजांना पत्र लिहून शिवछत्रपतींची थोरवी सांगताहेत.जरा अभ्यास करून बोला.गुरु चं गुरुपण समजायला कुवत असावी लागते. निव्वळ फेकाफेक......
पुरावा दे, फेकाड्या, फालतु बाता मारू नको. उलट पोर्तुगीज पाद्र्यांना पिटाळून लावून त्यांचा शिरच्छेद केल्याचा अस्सल पुरावा उपलब्ध आहे. आणि चक्क पोर्तुगीज दस्तऐवज यांवर आंधळे पणाने विश्वास ठेवणारा महान इतिहासकार दिसतोय तू.
तुमचं सगळ खरंय हो पण काही वर्णाच्या लोकांना अस वाटते की शिवराय आमच्या माणसाशिवाय मोठा होऊच शकत नाही म्हणून ते रामदास शिवरायाचे गुरू होते अस ठासून सांगत असतात.
अभ्यासातून आलेले आपले विचार एकदम पटण्यासारखे आहेत जर एखाद्या गोष्टीला इतिहासात काही पुरावे नसतील तर तेच सत्य होते हे समाजाच्या मनावर बिंबिवण्याचा प्रयत्न केला गेला आहे यात दुमत नाही
अशा सर्व चर्चेतून मनांत एका ठराविक जातीविषयी अजूूनसुध्दा किती खदखद आहे तेच दिसून येते.रामदास स्वामीना कधि 'मला शिवाजी महाराजांचा गुरू म्हणा ' असे सांगण्याची गरज भासली नसावी.प्रत्येेकाचे आई वडील त्याचे पहीले गुरू असतातच.यात नविन ते काय सांगितलेत?😢मग कशासाठी त्यांचा एवढा तुच्छतापूर्वक उल्लेख केला जातो. सभ्यता पूर्वक कसे बोलावे यासाठी प्रा.शिवाजीराव भोसले यांचे रामदास स्वामी यांचेवरील भाषण कधि मिळाले तर जरूर ऐकावे.म्हणजे कश्या प्रकारे मते मांडावित ते समजेल.
शिवरायांचा आठवावा प्रताप. हे रामदास स्वामी नी संभाजी महाराजांना पाठवलेल पत्र आहे . कधी कधी अस वाटत की तूम्ही इतिहासकार कमी आणि ऐका विशिष्ट जातीचेच प्रवक्ते वाटतात