मित्रा तुझी कोकणाबद्दलची मेहनत खूप कौस्तुकास्पद आहे. पण सध्या कोकणची भूमिगत पाण्याची पातळी खूप कमी होत चालली आहे. ते सुद्धा आपल्या कोकणात खूप पाऊस पडून देखिल. जंगलं तर वाचवायला हवीच पण त्याचबरोबर ( rain water harvesting ) पावसाचं पाणी साठवण्याची व जमिनीत मुरवण्यासाठी माणसांमध्ये जनजागृती करण गरजेचं झालं आहे. त्यासाठी तुम्ही सगळ्या युट्युबर्स नी काहीतरी केलं पाहिजे. आम्ही सर्व कोकणवासी तुमच्या सोबत आहोत ।
@@jaihind6086 सरकारी प्रकल्प होतील तेंव्हा होतील, असे प्रकल्प जाहीर होतात मग ते सुरू करायला व ते पूर्ण व्हायला खूप काळ जातो, त्यात निसर्गाची हानी होणं आलाच, शिवाय प्रकल्पग्रस्तांच पुढे काय होतं ते सगळ्यांना ठाऊक आहेच, आशा प्रकल्पातून नक्की कोणाला फायदा होतो ते ही सर्वांना माहीत आहे, शिवाय असे प्रकल्प काही काळापूरतेच फायदेशीर ठरतात, आशा प्रकल्पांमुळे लोकांचे प्रश्न सुटले असते तर महाराष्ट्रावर आज पाण्याचं दुर्भिक्ष्य आलं नसतं. सरकार त्यांचं काम करणार पण आपण पण स्वतःची जबादारी ओळखून पाउल पुढे टाकलं पाहिजे. म्हणून पाण्याच्या समस्येवर मग शहरात असो वा गावात rain water harvesting हाच एकमेव व कायमस्वरूपी पर्याय आहे.
तुम्हांला भेटणं हे स्वप्न आहे हो दादा माझं.... निसर्ग प्रेमी फक्त्त बोलून नाही होता येत... ह्या निसर्गाशी एकरूप व्हावं लागतं.... समजावं लागतं ह्या निसर्गाला मनापासून जिवा भावाप्रमाणे.... ते तुम्हाला जमत.... 🙏🏻🙏🏻🙏🏻
क्षणीक सुखासाठी अपुल्या, कुणी होतो नितीभ्रष्ट, कुणी त्यागी जीवन अपुले दुःख जगी करण्या नष्ट, देह करी जे जे काही आत्मा भोगितो नंतर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर, क्षणीक सुखासाठी अपुल्या, कुणी होतो नितीभ्रष्ट, कुणी त्यागी जीवन अपुले दुःख जगी करण्या नष्ट, देह करी जे जे काही आत्मा भोगितो नंतर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर, क्षणीक सुखासाठी कोकणवासियानो आपल्या जमिनी विकू नका.
अप्रतिम मेहनतीचे फळ हे नेहमीच चांगले असते आणि ते कष्ट करून बांधलेल्या आणी पाणी लागलेल्या विहिरी कडे पाहून लगेच लक्षात येते प्रसाद चे ह्या जमीनीवरील नंदनवन असे च फुलुन दिसेल हे लक्षात येते आणि माझ्या एव्हढ्याच अपेक्षा कि ह्या जमीनीवर निसर्गसौंदर्य खूप भरभरून दिसेल धन्यवाद
देव तुम्हाला तुमच्या ह्या स्तुत्य उपक्रमात भरघोस यश देवो हीच शुभेच्छा...जे जे तरूण हा व्हिडीओ बघत आहेत त्यांनी प्रेरणा घेऊन कोकणात जाऊन प्रसादजी च्या कार्यात सहभागी व्हावं अशी मी विनंती करते...
खूप छान व्हिडिओ वाटला हा... मीपण माझ्या आयुष्यातील अडीच वर्षे कोंकणात काढली...तिथली लोकं ,तिथली जीवन जगण्याची पद्धत खूप जुनी आहे ... अन् यातच खरं जीवनातलं समाधान आहे...कोकणात वेगेवेगळे ग्रामीण शब्द उच्चारत आहेत..त्यातच एक शब्द जो विहिरीसाठी वापरतात ... तो म्हणजे बाव किंवा बावडी...खरंच तुम्ही आज स्वतःची बाव उभी केलीय तो आनंद काय असेल तो जानू शकतो ...अभिनंदन दादा...
दादा .... खुप सुंदर अर्थ जीवनाला तू देतो आहेस.... मलाही प्रेरणा मिळाली.... लवकरच येईल workshop साठी.... पैसे जमा झाले की. मी दर्यापूर, जिल्हा - अमरावती येथे राहतो. माझ्याकडे जमीन ही आहे. मी प्रयत्न नक्की करेन slow Life living जगण्याचा.
तुम्ही ह्या निसर्गाला वाचवण्याचा खूप सुंदर प्रयत्न करत आहात माझ्या देवाची माझ्या गुरूची साथ तुमच्या सोबत राहुंदे आणि तुम्ही जीवनात अजून निसर्गाची प्रगती करा हीच प्रार्थना
तुझे काम खूप कौतुकास्पद आहे..काहीही सृजनात्मक करायला गेलो तर किती अडचणी आजच्या काळात येतात याची मला जाणीव आहे..नुसते बोलून दाखविणे आणि जगणे यात खूप फरक आहे
खरंच मित्रा, आपली हि शेवटची पिढी आहे जी "एकमेकां साह्य करू अवघे धरू सुपंथ" या उक्तीप्रमाणे विनामुल्य मदत करणारी❤❤ इथून पुढे प्रत्येक गोष्टीसाठी पैसे मोजावे लागणार 😂😂
प्रसाद भाऊ आमच्या कडे पण जंगल आहे आणि शेती आहे ती टिकवायची आहे पण आम्ही नवी मुंबई एअर पोर्टला जवळ असल्या मुळे डेव्हलपमेंट आमच्या कडे पण येऊ घातली डोळ्या समोर शेती मोडली जाते जंगल नष्ट होत आहे खूप दुःख होतय. पण इलाज नाही.
साहेब तुमचे विचार खुप छान आहे मी पण कोकणी आहे मला पण गावी राहायला खुप आवडते पण आपले चे भावबधी मुळे व जमिनीच्या वादा मुळे गावी राहायला आवडत असून पण राहता येत नाही नवीन जमीन घेण्याला तयारी केली पण भाव माझा बजेटच्या बाहेर आहे कमी मध्ये बघतो आहे आपल्या बघण्यात असल्यास कळवावे ही विनंती
कोकणातील गाय कोकण कपिला अर्थात गिड्डा गाय आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. दूध कमी असल्याने शेतकरी (मुळात कोकणात शेतकरी कमी कमी होत असल्याने) गाई सोडून देतात आणि रानोमाळ फिरत असलेल्या गाई कसायला धार्जिण्या होतात...
Tujhe videos khup pahile. Mala khup avadta tujhi kalpana. Mala Yeun actually rahun samjavun ghyaycha ahe. Kadhi yeu Ani kasa yayacha pls kalav. Samja konta group Mumbai Varun yenar asel tar mala hi kalav
This is what I had in my mind for my farm. Nakki tumch salla gheen & shall keep in touch for both veer ani ghar bandanya saati. Bangalore has gone from being a garden City to pensioners City to educational Centre to IT hub & today it's not more than a concrete jungle. Earth, Air & Water the basic need is lost in most States. It's results is evident because of reckless development even on dried lakes, cutting of age old jungle, over population with air & water pollution due to industrial / sewage affluents. GOD SAVE THE EARTH !
मी एक कोकणकर आहे. मी ज्या घरात राहतो ते मातीचे आहे आणि ते 100 पेक्षा जास्त वर्षांपूर्वीचे आहे. माजा पंजोबानी 1907 मदे घर बांधणी सुरु केली ती 1913 मदे घर बांधून पूर्ण झाले. सहा वर्ष लागली घर बांधायला. मातीचे घर आतून एकदम थंड असते उन्हाळ्यात गरमीचा त्रास होत नाही. आमी घराची थोडी डागडुजी करून घेतली आहे पण घर अजूनही मातीचे आहे.