माऊलींच्या हरिपाठा नंतर गुरू परंपरेचे अभंग आहेत त्यातील हा पहिला अभंग आहे . सत्य गुरुराये कृपा मज केली l परी नाही घडली सेवा काही ll १ll सापडविले वाटे जाता गंगेस्नाना l मस्तकी तो जाना ठेविला कर ll२ ll भोजना मागती तूप पावशेर l पडीला विसर स्वप्ना माझी ll ३ll काय उपजला अंतराय l म्हणून या काय त्वरा झाली ll४ ll राघव चैतन्य केशव चैतन्य l सांगितली खूण मालिकेची ll५ ll बाबाजी आपले सांगितले नाम l मंत्र दिला राम कृष्ण हरी ll ६ll माघ शुद्ध दशमी पाहुनी गुरुवारl केला अंगीकार तुका म्हणेll ७ll
प्रथम मी जगतगुरु संत तुकाराम महाराजांना नतमस्तक नमस्कार संत तुकाराम महाराजांनी आपल्या सामान्य माणसाला त्यांच्या अभंगातून पूण्याईच्या खजान्याची चावी दिलेली आहे. खरे पुण्य कशात आहे हे अजून सामान्य माणसाला समजले नाही.आज सर्व माणसे पाखंड्याचया विळख्याला बळी पडत आहे.माणुष्य सेवा हिच खरी ईश्वर सेवा आहे. माणसाने आपले सर्व अहंकारव सोडून समाजातील रंजल्या गाजलेल्या लोकांच्या बरोबर माणुसकीने वागले पाहिजे हेच खरे पुण्य आहे. हे तुकाराम महाराजांनी सातशे वर्षांपूर्वी सांगितले आहे. छ.शिवाजी महाराजांनी देणगी दिलेला हिरऱ्या मोत्यांचा खजिना परत केला हि गोष्ट आजच्या प्रदेशी महागड्या गाड्यामधून फिरणारऱ्या पांखडयाना चपराक आहे.जगामध्ये जेवढे प्रसिद्ध तत्त्वज्ञानी झाले. त्यामध्ये संत तुकारामांचे नाव घेतले जाते.हि गोष्ट महाराष्ट्राच्या अभिमानाची आहे. इंजि.दिनेश कांबळे (लोकमत लेख स्पर्धा प्रथम पुरस्कार विजेते . वृत्तपत्र स्तंभलेखक )
अप्रतिम सुंदर..भाग पहिला.. सलग..संदर्भांसह..सविस्तर माहिती..अगदी तुकाराम महाराजांच्या आठव्या पुर्वजांपासून महाराजांच्या मृत्यूपर्यंतची..आज.सरांचे आभार व धन्यवाद..🌹🌹👏🙏😊
खूपच सुंदर सुंदर सरजी मी यापूर्वी वाघ नामक एका लेखकाचे संत तुकोबा हे पुस्तक वाचले त्यामध्ये मला संत तुकोबा कळले. आणि मला असे वाटले की तुकाराम गाथा वाचण्याची गरजच नाही. आणि आता तुम्ही सांगितलेली माहिती ऐकून एक क्षणभर डोळ्यातून अश्रू वाहू लागले धन्य धन्य तुकोबा
ही कथा तर्कबुद्धिला न पटणारी आहे महाभयंकर बारा वर्षांचा दुष्काळ आणि तोही त्या काळात ज्या काळात साक्षात ईश्वर माणसाच्या भेटीला येत असे अनेक गोष्टी संत तुकाराम महाराज क्षत्रिय होते का शूद्र असे अनेक गोष्टी आहेत
सर अतिशय छान व्याख्यान ऐकायला मिळाले. मी अमृत वाणी श्रवण केल्याचा मला आनंद मिळाला. अगदी कमी वेळात गुरुवर्य संत तुकाराम महाराज यांची संपूर्ण माहिती मिळाली. धन्यवाद सर.
सर आपलं व्याख्यान अतीव सुंदर आहे. अनेक पदरी संदर्भ आणि दाखले अभ्यासकांसाठी उपयुक्त आहेत. त्याच प्रमाणे तुकोबा जगद्गुरू कसे याच यात स्पष्टीकरणं होते. खूप छान 👌 आपला संपर्क क्रमांक मिळाला तर आनंद होईल. 🙏
बाबाजी चैतन्य राघव चैतन्य l सांगितले खूण मालिकेची l बाबाजी आपले सांगितले नाम l मंत्र दिला राम कृष्ण हरी ll बाबाजी चैतन्य यांचे ग्रुप राघव चैतन्य महाराज होते आता अशी परंपरा आहे आता म्हणा नाही तर राघव चैतन सुद्धा सुखी संत होते चार हे अर्धवट चुकीचे ज्ञान समाजाला पोहोचू नका वारकरी संप्रदायासमोर तुमचा मुद्दा मांडणार आहे..
भालेराव सर जी तुम्ही संत तुकाराम महाराज यांच्या बद्दलची माहिती अत्यंत आत्मीयतेने व सुरेख प्रस्तुत केली आहे. आपले उच्चार स्पष्ट आहेत व आवाज खूप सुरेख आहे.तुम्ही संतवाणी सामान्य माणसाच्या घरी येऊन ओंजलित ,ओटीत टाकीत आहात.संतवाणी घरो घरी पोहचविण्याचे शुभ कार्य करीत आहात.असे वाटते की हे सर्व संत तुमच्या तोंडून अभंग म्हणत आहेत हा भास होतो.अत्यंत तन मन तेने कार्य करीत आहात. शुभेच्छा.दोन तीन दिवसा पूर्वी मनात विचार आला की जनाबाईंच्या बद्दल काही माहिती मिळेल का? काल मी वामन कर्डक यांची माहिती शोधताना संत चोखामेळा यांच्या वरील तुमचा vedio मिळाला आणि त्यानंतर संतवाणी वरील सर्व खजीना मिळाला.धन्यवाद सर.तुम्हाला उदंड आयुष्य लाभो 🙏🌹Great work. Salute to you 🙏👍.माझी आई संत चोखामेळा यांची पुस्तकं वाचायची त्यामुळे खूप दिवसा पासून मनात इच्छा होती ती आज पूर्ण झाली. 🙏.
Aapan Chan mahiti dilit pan musalman sadguru asle hindu siddha vibhutiche te thik aahe kahi gair nahi tyat , pan swapnat sakhshatkar jhala tukoba raya na asa भामचंद्र dongrawar गुहेत कोरून ठेवले 15 दिसामाजी साक्षात्कार झाला ll .. pan swapnat sakshatkar ha prakar itki shreshta ajod bhakti nishchay gheun ubha असणाऱ्या तुकोबा राया साठी सद्गुरू ची छोटी arrangement वाटते , असेल जरी तरी त्या काळच्या देश स्थितीत मुसलमान सद्गुरू तुकोबा रायांचा हा प्रकार थोडा वेगळा वाटतो .. सद्गुरु ( प्रेम) आणि मित्र ह्या दोन गोष्टी आपसूक भेटतात असे खरे आहे तर आंत्यंतिक ईश्वर भेटीची तळमळ असणाऱ्या देहाला सद्गुरू प्रत्यक्ष नाही भेटत हा प्रकार जरा विचित्र वाटतो .. असो तो काळ सगळे लिहून ठेवायचा नव्हता कोण जाणे सद्गुरू भेटून त्यांना सामर्थ्य देऊन पुढे कधी न भेटण्यासाठी निघून गेले असतील .. मला तुकोबा भक्ती चे सर्वोच्च स्थान वाटते ..दे दादा होते ..माझ्या कडे गाथा आहे मी वाचतो प्रेमाने , अंतर्मुख होऊन कधी भामचंद्र वर जाऊन 1 रात्र विरक्त नामस्मरण करत जगुन येतो .. एव्हढा जुना इतिहास आहे तो शेवटी तुकोबा राय मुख्य ..आता कोण सद्गुरू होते आणि कसं त्यांचं पारमार्थिक जीवन घडलं कोण सद्गुरू कुठे अनुग्रह , काय उपासना , काय साधनं दिली हा विचार आता कुणाही साठी गौण आहे
माऊली तुम्ही माहिती छान सांगत होते पण तुकाराम महाराजांचे गुरु हे बाबाजी चैतन्यच होते व ते मराठी होते सूफी संत हे म्हणून तुम्ही इतिहासाला गालबोट लावू नका नीट अभ्यास करा व चूक दुरुस्त करा...