संत तुकाराम महाराजांचं सदेह वैकुंठगमन - सत्य काय ? #santtukarammaharaj #abhivyakti #अभिव्यक्ती Music Courtesy : Indian Devotional Music No Copyright Vibes
आपण भगवंताला मानतच आहेस तर गोमातातेला न मानणारा माणूस आपण गोमातेचे चुकीचे वक्तव्य यालाच माझाच विरोध आहेस गोमातेचे आभासच करून निर्णय गायी विषयीच पुर्ण आभासच करायलाच तर गाईच नाव घेण्याची आपली पात्राता नाहीस त्याच्यातील वर्म माहीती असेल तर भाष्य करूच नयेत
तुकाराम महाराज जगतगुरू असेच झाले नाहीत समाज कंटकानो त्यांचा इतिहास आणि पांडुरंगाची भक्ती ही आजही आणि चिरंत काल राहील हे ध्यानात ठेवा जय जगतगुरू तुकारामहाराज
माझ्या जीवनात तरी आजच मला संतश्री ते तुकारांमाच्यां देहांता/हत्येचा कट विषयी सत्य ची माझ्या एवजी इतर भारतीयांना हि आपणांनी जाणीव दिली मी आपने आभारी आहे। धन्यवाद, साहेब ।
गतकाळातील वारकरी संप्रदाय, तुकाराम महाराजांना समजुन घेण्यासाठी, अभिव्यक्त होणे गरजेचे आहे. हल्लीचे ह.भ.प.अर्धवटराव आहेत. पुराणातील थोड्याफार प्रमाणातील माहिती करुन, पैसे कमावतात. आपले कार्य अभिनंदनीय आहे.
धन्यवाद साहेब... खरे आहे... खूपच सुंदर शेअरिंग.. मूर्ख लोकांचे नका मनावर घेऊ...समाज सुधारणा होत आहे... अज्ञान अंधश्रद्धा आता दूर होत आहे. उत्तम कार्याबद्दल धन्यवाद.... धन्य ते संत तुकाराम महाराज..नतमस्तक...
सर... खुपच छान आणि परखड मत प्रदर्शित केले आहे आपण.... आपल्या सर्व मतांशी सहमत आहे... संतश्रेष्ठ श्रीतुकाराम यांचा सदेह वैंकुठाला गेले हा एक पद्धतशीरपणे उभा केला गेलेला एक सुंदर असा आभास आहे. कारण पुढील येणारी पिढी ही देखिल यांनी देखिल हेच मानावं की तुकाराम सदेह वैकुंठाला गेले. पण हा एक भ्रमनिरास आहे. तुकारामांचा योजनाबद्ध पद्धतीने घडवून आणलेला एक "खुन" आहे. पण खून करणा-यांना निदान इतक तरी कळल पाहीजे होत.... खून करून माणूस संपवता येतो .... पण त्यांच्या विचारा़च काय ???? ते कसे संपवणार ???? आणि म्हणूनच आजही तुकारामांचे अभंग, गाथा, ओव्या, गायले जातात दाखले दिले जातात. पण त्या दुर्जन बंबाजीच काय ??? कुठ आहे तो ??? कुणीतरी विचारत का त्याला ??? आणि का विचाराव ? का दखल घ्यावी त्याची कुणी ???? तुकारामांचे नाव आदराने घेतल जात.... पण बंबाजी ची साधधी आठवण तरी काढत का ??? आणि जरी आठवण काढली तरी ती फक्त नी फक्त तुकाराम महारांजांमुळेच .... हीच काय त्याची थोडीशी वाट्याला आलेली पुण्याई... आणि आज ही म्हटले जात..... ... ज्ञानदेवे रचिला पाया .... तुका झाला रे कळस आणि म्हणूनच आज अमेरिका, इंग्लंडसारख्या पाश्चात्य देशात देखिल तुकारामांचे अभंग गायले जातात, गाथेवर अभ्यास सुरू आहे...। श्री. राजेश, बोरिवली (प)
अप्रतिम सर संत तुकाराम महाराजांचे अभंग...कमी शब्दात वर्णन केले आहेत तुम्हीं. परंतु काही शिक्षित महाराज लोक चुकीचा अर्थ लोकांना सांगून धंदा करतात.कोणत्या शब्दाने त्यांना सुशिक्षित म्हणावे ...! जय हरी विठ्ठल रखुमाई !
सुशिक्षित लोकांना देखील,,,, कोणत्या ही पीर फकीर दर्गा ख्वाजा मजार चा भारत देशात काही संबंध नाही काही देणे घेणे नाही एवढे सामान्यज्ञान देखील सुशिक्षित लोकांना नाही.
ज्या संयतपणे तुकोबारायांनी समाजाचे प्रबोधन केले अगदी त्याच सयंतपणे तुम्ही पण आमचे प्रबोधन करीत आहात त्याबद्दल आपले आभार आता तरी तुकोबारायांना न्याय मिळो
सर,जय जिजाऊ. जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या बहुजनांच्या परिवर्तनकारी कार्याचा वसा घेतल्या बद्दल मराठा सेवा संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीच्या वतीने आपले ॠण व्यक्त करण्यापेक्षा आपल्या ऋणातच राहु इच्छीतो. खरंच सर आपल्ं कार्य न भूतो न भविष्यवती आहे.तूमच्या सडेतोड कार्यास मानाचा मुजरा.
साहेब नमस्कार, ज्या पद्धतीने तुम्ही अगदी सहज सोप्या भाषेत या समाज कंटकांचा बुरखा तुम्ही फाडून जे महान समाजकार्य करत आहात तुमच्या या कार्याला मानाचा मुजरा....
या सनातन्यांनी त्यांचा विचार बहुजनांच्या इतका खोल वर रुजवला आहे की बहुजन समाज ऐकून घेण्याच्या मनस्थितीतच दिसत नाही....त्या साठी अजूनही समाज प्रबोधन किती गरजेचं आहे हे प्रकर्षाने जाणवत आहे....मला देखील असेच काही अनुभवायला मिळत आहे...मी अगदी माझ्या आजूबाजूच्या मित्र परिवाराला देखील समजवायला जातो त्या वेळेस त्यांना काहीही देणे घेणे नाही अश्या आविर्भावात ते दिसत असतात...पण एखादी देव धर्म बाबत गोष्ट आली की लगेच भावनिक होऊन समोरच्याच्या आहारी जातात...हे कधी संपणार कोणास ठाऊक...पण सर तुमच्या सारखी लोक असतील तर ते लवकरच शक्य होईल....❤❤
दादा तुम्ही प्रत्येक शब्दाला तुकाराम महाराज कान्होबा महाराज बहीणाबाई यांच्या अभंगाची जोड दिली त्याबद्दल खूप अभिनंदन तुकोबाराय वैकुंठ गमन सत्य पूर्ण अभंग सागां
@@abhivyakti1965 वैकुंठ गमनाचे अभंग सांगितले तर यांच्या बोलण्याला किंमतच नाही राहणार .म्हणून हे पंडित ही प्रमाणे सांगत नाहीत.असे चॕनेल न पहाणे चांगले .
संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज हे अतिशय विधायक दृष्टिकोन असणारे परखड व सुधारणावादी संत होते. संत कबीरानंतर येवढा बुद्धीप्रामाण्यवाद तुकाराम महराजांनीच समर्थपणे मांडून समाजप्रबोधन केले. आपणही येवढ्या निर्भिकपणे ते विचार समाजात पेरताहात त्याबद्दल आपलं मनापासून कौतुक व आभार! 🙏👍
🙏 सर..अतिशय सोप्या शब्दात तुकोबांची खरी माहिती सांगितली..अंतर्मुख होऊन वीचार करावा असा हा विदियो आहे.त्या काळात अज्ञान होते समाजात पण आज शिक्षीत होऊन ही आर्थिक व वैचारीक हतबलता आहे..असो..आपण फार धाडसाचे काम करत आहे..धन्यवाद..👌👌👍👍
We expect truthful scientific research oriented videos on Spiritual science and philosophy Of Tukaram Maharaj On the basis of Rebirth-Parapsychology, Sadhan Marg, Sadhan padhati, experiences, cosiousness, physical-mental-spiritual state of sadhak,mukti,... Please discuss on above points.
ज्यांनी कधीच मुक्ती मागितली नाही उलट तुका म्हणे गगर्भवासी सुखे घालावे आम्हांसी अशी याचना देवाकडे केली खूप छान प्रबोधन तुम्ही करत आहात ते अखंड चालू ठेवा
तुका आकाशाएवढा , हे सार्थ ठरविणारा हा आपल्या प्रबोधनाचा एक भाग खूप सुंदर आणि सोप्या भाषेत असल्यामुळे तरूण पिढीने ऐकणे महत्वाचे आहे , आपण हे कार्य चालू ठेवावा 👍🏻🌹
अंगावर शहारे आणणारा एपिसोड,भाग्यवान आहात सर तुम्ही सनातनी सैतानच्या घाणेरड्या शिव्या खावून संत तुकाराम यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालू शकण्याची हिम्मत दाखवलीय तुम्ही, राहिली गोष्ट संभाजी भिडे आणि आताचे वारकरी,माळकरी,कीर्तनकार यांच्या बद्दल वैदिकांची गळापडू वृत्ती आहे ती बुद्धांना आठवा की नववा अवतार मानणे काल परवा प्रसिद्ध साहित्यिक सुधामुर्तीची या सभाजी भिडे यांनी जबरदस्ती ने भेट घेण्याचा जो प्रकार केला तो मानवी सभ्यतातेच्या कुठल्या प्रकारात बसतो हे त्यांनाच माहीत आणि आताच्या माळकरी,वारकरी बद्दल बोलायचे तर आमच्या कडे ग्रामीण भागात ज्याच्या गळ्यात माळ आहे आणि माथी जो गंध,टिळक लावतो त्याच्याशी बाकीची माणसे फार सावधगिरीने व्यवहार करतात फसवणुकीची जास्त शक्यता असते यावरून बघा
मेल्यावरती श्राद्ध सतरा,जीवंतपणी ना पुसे पितरा।स्वार्थीजनांचा जमला कचरा,सत्याची ना चाड निलाजरा।आचरणाविण स्तुतीस्तोत्र भारंभारा,संतजीवनाची घेतली धुरा।परि नोहे संत होणे येरागबाळा नरा,संत संथ वाहते गंगामाई सम जीवनधारा।तु का राम ना होसी पामरा,आचार विचार आहार देवासम सात्विक करा।शरण मी बाळ संत तुकाराम ज्ञानेश्वरा,सिद्धदासा अंगिकारावे मज तुम्ही एकचि आसरा।
तत्कालीन सावर्नियांच्या हातात धर्मसत्ता होती आणि सत्तेपुढे शहाणपण चालत नसते, हे सगळं असं असताना आपले विचार रोखठोपणे मांडणे म्हणजे सुळावरची पोळीच. आपल्या या वास्तव व्यक्त करण्याच्या कार्याला शतश नमन.
🌹🙏🌹जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या कार्याला व सम्रूतींना वंदन सर आपन अभ्यासपूर्ण त्यांच्या इतिहासाला उजाळा देत आहात आपन खूप छान काम करत आहात सर आपण सत्य समजाला सांगत आहात सत्य हे पचायला कठीणच मग त्रास तर होणारच आपनास पुढील कार्यासाठी मंगलमय शुभेच्छा धन्यवाद 🌹🙏🌹
खूप छान रविंद्रदादा....तुमचे सगळेच व्हिडिओज खूप छान प्रेरणादायी असतात.बहुजनांवर वर्षानुवर्ष सतत अन्याय होत आला आहे आणि अजूनही ते सत्र चालूच आहे .पूर्ण चुकीचा इतिहाच सांगितला गेलाय वर्षानुवर्ष .सत्याचे अनेक पुरावे उपलब्ध असून देखील जाणीवपूर्वक तो इतिहास दाबला गेलाय.पण तुमचे खूप खूप आभार आणि कौतुक की तुम्ही हिमतीने वास्तव समोर आणण्याचा प्रयत्न करताय. या सत्याच्या लढाई साठी ...हम तुम्हारे साथ हैं...!
देव धर्म ही मानवी संकल्पना आहे . आपल्या खरे संस्कृती मध्ये आपले वडील आजोबा पणजोबा खापर पणजोबा यांच्या बाबत आदर होता , आपल्या पुर्वजांं प्रती आदराची भावना असल्यामुळे रानात त्यांचे मंदिर बांधण्याची पध्दत होती , आपल्या घरात पुर्वी व आजही टाक होते ते आपल्या पुर्वजांचे होते . निसर्ग निर्मित आयुष्यात माणुस जस जसा विकसित होत गेला त्यातुन प्रथा परंपरा सुरु झाल्या त्यातुन पुर्वजांची पुजा अर्चा सुरु झाली , आपल्या समुहातील एखादा सगळ्यात चांगला दुसऱ्या प्रती आत्मियता असणारे व्यक्ती ला पुजनीय मानले गेले तसेच गौतम बुद्ध यांनी समाजाचे प्रबोधन करताना ज्या जातक कथा सांगितल्या त्यातुन पुढे त्याला आपल्या ग्रंथात घेऊन ब्राह्मण वैदिक धर्माच्या लोकांनी देव धर्म संस्कृती ब्राम्हणी पध्दतीने मांडले . संत तुकाराम महाराज यांचा अभंगवाणी समाज प्रबोधन यामुळे छळ केला , वैदिक धर्माच्या कायद्या नुसार शिक्षा दिली , संपत्ती जप्त केली , बायको मुलांना कुटुंबातील व्यक्तींना गावाबाहेर काढले आणि जे दिसले नाही दिसत नव्हते ते दाखवत तुकाराम महाराज यांना संपवले .
This is Great Explained by Sir Without Any Fear.true is Always True Any body can't hide for long time .Really All accept Reality of History &Refuse created myths for misguide society from.Last 370 years .&Accept Sant Tukaram Was murdered by Mambagi. taking benefits of That Days.now Bhujan will be Wise for knowing all truths &Avoide wrongly blind following .
आपण आपल्या, पवित्र, आणि गोड, वाणीतून, खरे बोलत, आहात, सत्य, सांगा लोका जरी कडु लागे चाला नाही मागे, आला कोन, बरे बोलणारे बरेच लोक आहेत, पंरतु, खरे बोलणारे विचारवंत कमी आहेत, जय जिजाऊ जय शिवराय जय शाहु फुले आंबेडकर, जय, तुकोबाराय,
अप्रतिम सर, आपण तुकाराम महाराजा ची छान माहिती दिलीत. छत्रपती शिवाजी महाराज व संत तुकाराम महाराज यांची भेट व स्वराज्य निर्मितीस त्यांचे सहाय्य यांची माहिती ची उत्सुकता आहे.....🙏🙏🌹
सर,अतिशय छान माहिती, वारकऱ्यांना न्याय देणारी माहिती आहे. आम्ही आपल्या सोबत आहोत. खुप खुप धन्यवाद. जय हरी विठ्ठल । जय वारकरी ॥ वारकर्यांच्या चरणी नतमस्तक ।
खुप छान छान माननीय, आपण कालवील्या नुसार मी कोदण्ड है पुस्तक बोलविले आहे, कृपया आजुन मार्गदर्शन,, घड़ावनारे, खरी माहिती देणारे , खरा इतहास सांगणारे पुस्तक, असजद आजुन पुढे आपल्या, माहिती मद्ये कळवतील अशी अपेक्षा भगडत, विनंती करतो, धन्यवाद!
सत्य हे सत्यच असते .तुकोबारायांचे वैकुंठगमनाचे अभंग वाचा. वाड वेळ झाली उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावितो आत्म साक्षात्कार झाला म्हणजे जीवदशा संपली जाते.तो अभंग पहा. याजसाठी केला होता अट्टाहास शेवटचा दिस गोड व्हावा आता निश्चींतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेचिया. तुकोबारायांनी मृत्यूला जिंकले होते. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. भगवद्गीतेतील नवव्या अध्यायातील श्लोक पहा.अश्रद्द्धानाः पुरुषा धर्मस्यास्य परंतप । श्रद्धेशिवाय भगवत ज्ञान होतच नाही.ज्याने तुकाराम गाथा ,ज्ञानेश्वरी हे ग्रंथ भक्तीभावाने वाचले आहेत.तो कधीही अशी शंका घेणार नाही
अतीशय उपयुक्त अशी माहिती सांगितली सर,आजच्या काळात सगळे बाबा,संत हे सर्व बिझनेस मेन झाले आहेत,खरा इतिहास बाजूला ठेवून पोटभरू इतिहास सांगितला जातो, धन्यवाद!!!
सर तुमच्यामुळे संत तुकाराम महाराजांकडे बघण्याचा माझा दृष्टीकोन बदलला पहिलं वाटायचं ते देव होते परंतु आत्ता समजले की ते देव नाही तर ते विद्रोहाची एक वास्तविक मशाल होते
🚩जय 🙏 हरी 🚩 अत्यंत अभ्यासूपणे व्यक्त झालात सर . दैदीप्यमान जागतिक कीर्तीच्या व आदर्शाच्या भारतीय सौंस्कृती आणि खंडाचा ऱ्हासच या सनातनी करंट्यांनी केलाय आणि धर्माच्या आड करत आहेत . आपल्या लोकांच्या शरीरावर आपल मस्तक आहे याची जाण विसरून मेंदू गुलाम , लाचार करुन बसलेत . हळू - हळू का होईना आपल्या सारख्यांच्या प्रयत्नास नक्कीच यश प्राप्त होणार . आम्ही सोबत आहोत . खूप खूप अभिनंदन व धन्यवाद 🙏 🚩 जय हरी 🌺🙏🌺