मी पण परिक्रमा केली आहे मी एकटी होते मला ही असे खूप लोक भेटले काही पुणे येथील लोक तर दोन जण पुढे पाठऊन आश्रमात जागा धरून ठेवणे बादली लपून ठेवणे असे खूप अनुभव आले आपल्याच लोकांकडून सकाळ संध्याकाळ हरी पाठ वाचत कीर्तन प्रवचन वाली माता होती मुंब ई ची काही बाबाजी होते त्याच्या बरोबर काय उपयोग अशी परिक्रमा करून बरे झाले दादा तू हा vdio बनवला नर्मदे हर खूप खूप धन्यवाद,,
दादू तू खूप पोटतिडकीने सांगतो आहेस. तुझा उद्देश चांगला आहे. मराठी माणसानेच नाही तर इतर भाषिक लोकांनी परिक्रमा करायच्या आधी मनाची तयारी करावी. आपल्याला सोयी सुविधा नसताना मैया जसे आपल्याला ठेवेल तसेच आपण राहावे. तुझे शब्द तू खूप जपून वापरतो आहेस. आणि व्यक्तीशः किंवा एक दोन लोकांच्या विकृत मानसिकतेमुळे बाकीचा उल्लेखलेला समाज हि बदनाम होतो आहे.
नर्मदे हर! माझ्याकडून नर्मदा परिक्रमा २०१९ मध्ये घडली. सर्वत्र चांगली वागणूक मिळाली. महाराष्ट्रीय असूनही. ज्यांनी आसरा,अन्न,पाणी व मार्गदर्शन दिले त्यांच्याबाबत कृतज्ञता बाळगुन निरपेक्ष रहाणा-यांना आश्रमातले लोक सन्मानाने वागवतात. नर्मदे हर!
आम्ही पणं 2020ला परिक्रमा केली.त्या वेळी आम्हाला असा काहीही अनुभव आला नाही उलट मराठी माणूस ज्या आश्रमात जाईल तेथे सर्व प्रकारची मदत करतात, आणि कुणीही सुविधा नाही म्हणून आश्रम वाल्यांना बोलत नाही त्या उलट परिक्रमेत जे m p वाल्यांचे ग्रुप येतात आणि आशमात इतकी घान करतात उदाहरणार्थ आंगोलीचा बाथरूम मधे लघवीला जाणे ,जिथे आसन लावतील तिथेच थुंकणे आसे अनेक प्रकार करतात त्याबद्दल व्हिडिओ बनवा त्याला ही जरा सल्ला द्या, मराठी माणसाची बदनामी थांबवा🙏🙏🙏
खरोखर वाईट वाटलं आपल्या लोकांचा उर्मटपणा ऐकून.....हे अगदी बरोबर सांगितलं आहे महाराज तुम्ही..... समूहाचे काम नाहीये तिथं.. आपली आपल्याला ओळख करून घ्यायला सोबत कशाला हवी... दोघे जणं ठीक 🙏🏻म्हणच आहे तिथं एक निरंजन दो सुखी तीन में खटपट चार दुःखी 🙏🏻नर्मदे हर.... हर हर नर्मदे 🙏🏻
नर्मदे हर, प्रमाण बाबाजी.एकदम खरं बोललात. सत्य सांगितले.मी सुद्धा या वर्षी नर्मदा परिक्रमा करणार आहे.एकटी जाणार आहे.सोबत कुणीही नाही.मी मराठी आहे. माझ्याकडून कोणत्याही चुका होणार नाही,या गोष्टींची काळजी घेणार.कुणाचाही अपमान आणि मन दुखावले जाणार याची दक्षता, काळजी घेणार. धन्यवाद बाबाजी.
खुप छान,मॉ नर्मदे हर ,मी मागील वर्षी परिक्रमा केली परिक्रमा करताना घाई करु नका निवांत करा,मैया चा सहवास चा आनंद घ्या, जेवढी परिक्रमा एकट्याने कराल तेवढा जास्त मैया लिला दाखवते
नमस्कार श्री प्रशांत जी आपला आजचा व्हिडिओ क्लिप फारच अप्रतिम आहे. आपणं खरंच स्पष्ट शब्दांत सविस्तर सर्व गोष्टी सांगितल्या आहेत. मला ऐकून मनापासून दु:ख झाले. पुढील भाग लवकर येऊ द्या ही नम्र विनंती आहे.धन्यवाद नर्मदे हर नर्मदे हर 🙏🙏🙏🙏🙏🙏
अगदी खरे आहे .माझ्या पती नी आत्ताच परिक्रमा केली आहे त्यांनी पण हेच सागितले महाराष्ट्र माणूस खूप त्रासदायक आहे परिक्रमा मार्गात .तुम्ही जे सागितले ते सगळे अनुभव त्यांनी सागितले .ते स्वतः मिलटरी म्यान आहेत त्यामुळे शिस्त त्यांना हवी असते आपण वास्तव समजून सागितलं परखड विचार मांडले मराठी भाषा तुम्ही अप्रतिम बोलतात
दादा अतिशय सुंदर आणि महत्वपूर्ण माहिती सांगितली. खरोखर वास्तव परिस्थिती तुम्ही कथन केली. आपल्या महाराष्ट्रीयन लोकांच्या बाबतीत अगदी तंतोतंत लागू पडते. हाच फरक आपल्या प्रांतातील आणि बाहेरच्या प्रांतातील लोकांमध्ये आहे. आपल्या इकडील लोकांपेक्षा बाहेरची लोक मनापासून सेवा करतात कृपया क्षमस्व मी माझे खरे मत व्यक्त केले धन्यवाद.
अतिशय महत्वाची माहिती दिल्या बद्दल धन्यवाद 🙏🏻... परंतु सर्व मराठी बांधव असे नसतात... *चितळे मैय्या आणि बाबा* हे आदर्श मराठी परिक्रमावासी असल्याचे उत्तम उदाहरण.
एक नियम पूर्णतः पायदळी तुडवला जातोय, "कुणाला काही मागायचे नाही आणि कुणी काही दिले तर नाही म्हणायचे नाही", आणि साधना तर दूरची गोष्ट आहे, जप, मौन, एक वैराग्य म्हणून परिक्रमा करतच नाही. बाकी मैया त्यांना सद्बुद्धी देवो! नर्मदे हर
नर्मदे हर 🙏 स्वत:तला मी पणा नष्ट करण्यासाठी नर्मदा परिक्रमा करायची असते. परिक्रमेत ज्यावेळी मी पणाचा, अहंकाराचा त्याग कराल, लहान-थोर गरीब-श्रीमंत काळा-गोरा यातला फरक संपवाल आणि फक्त माणूस म्हणून जगायला चालू कराल, प्रत्येक जीवाला आदर आणि प्रेम कराल, त्यांच्याशी नम्र होऊन वागाल, त्यावेळी आई नर्मदा तुमच्यावर नक्की कृपा करते... परिक्रमेत कोणाला शिकवायला जायचं नसतं, तिथे फक्त शिकायला जायचं असतं. ईश्वराशी एकरूप व्हायला जायचं असतं. नर्मदे हर 🚩
आपण सांगितले ते सर्व सत्य आहे, आम्ही कबूल करीत नाही, बरोबर कसे आहो हे ठणकावून सांगणार, आपण म्हणालात दोन जण, मी दोन महिने सात महाराष्ट्रीयन बरोबर होतो, खूपच वाइट अनुभव त्यांना फोन करायची इच्छा होत नाही. सगळे सांगत बसलो तर २५ मिनिट चा v d o कमी वाटेल माझ्या पण चुका झाल्यात, अजून काय सांगणार, नर्मदे हर l
नर्मदे हर बाबाजी मराठी परिक्रमावासी बद्दल जेवढ्या सूचना आपण केल्या त्या खूप बरोबर आहेत मराठी माणसांनी सुद्धा आपल् 11:53 🙏या वागण्यात खूप बदल केले पाहिजेत कारण मी सुद्धा 2021 ते 2022 मध्ये पूर्ण पायी परिक्रमा केली आहे मला सुद्धा हे सेम अनुभव आले तसेच एमपी मधील परिक्रमावासी यांचे यांचे सुद्धा थोडे वाईट अनुभव आले कारण ते सुद्धा गांजा चिल्ली वगैरे ओढत जातात कुठे तरी परिक्रमा वाशी यांनी या वागण्याकडे लक्ष दिलं पाहिजे
खूप खूप धन्यवाद, आपण सत्य समोर मांडले आहे, गर्दी पण खूप केली आहे परिक्रमा ला, परिक्रमा एक साधना आहे सगळे मनातील साठवलेले संस्कार सोंडणे त्यागणे साठी ती परिक्रमा आहे, ती अलीकडे इच्छापूर्ती साठी किंवा पिकनिक म्हणून लोक करू लागले हे चुकीचे सुरू आहे, आपण त्यावर प्रकाश टाकला त्याबद्दल आभार धन्यवाद
नर्मदे हर 🙏💐 प्रशांत गुरुजी खुप सुंदर मराठीत बोलतात खर आहे नर्मदा माता स्वच्छ ठेवन आपली जिम्मेदारी आहे कर्तव्य आहे यात्रेला जानारे परिक्रमा करनार्यानी सर्व गोष्टी ची खबरदारी घेतली पाहिजे
आपण सांगितलेले खरं आहे एकट्याने जाणे कधीही उत्तम व अनुभव देखील चांगले येतात ,मध्यप्रदेश मधील काही परिक्रमा करणारे लोक सदाव्रत दिले कि गाठोध्यात बांधायचे व पुढील गावात दुकानात जाऊन विकत असतात हे मी स्वतः पाहिले आहे व काही साधक गुटका ,गांजा बिडी सिगारेट हे देखील व्यसने करतात हे बरोबर नाही परिक्रमा हि एक शिकवण आहे साधकाने कसे चालावे ,वागावं सतत नामस्मरण करीत गेले पाहिजे आणि माझ्या अनुभवानुसार नर्मदा माता कोणालाही उपाशी ठेवत नाही मग कशाला दिलेले सदाव्रत गोळा करायचे हे पण महत्वाचे बाकी आपण सांगितले हे उत्तमच केले असो नर्मदे हर
भैया मला पण आसाच आनुभव आला आहे. परीक्रमेत आला आहे. परीक्रमेत जे मिळेल त्यात समाधान माणले पाहिजे साधुसंताना या आश्रमातील शेवा करणारे शेवेकरी आहेत. त्यानां मणालागेल आसं काहीं वागु नका बोलू नका परीक्रमा स्वता साठी करता मला पण आसाचं आनुभव आला आहे नर्मदा परीक्रमा करताना. मडंला या ठिकाणी पुण्याची बाई व तिचे पती होते मि पण आळंदीची आहे. आश्रमात गेल्यावर भोजन आहे. का ते बोलले सदाव्रत देते है बनाओ त्या बाईणे बरोबर द्राक्ष आंगुर आणले होते. ते खाऊन आराम करत बसली नतरं मि व माझ्या सोबत एक माता होती आम्ही दोघीनी सदाव्रत घेतला स्वयंपाठी तयारीला लागलो मि पहीली माता म्हणते चुल पेटवुण द्यायला सांगा त्याबाबाजीला मि तिला सागीतलं बाई आपन त्यानां नौकर ठेवलं नाही मि चुलं पेटवते नतंर बोलली विहीरचं पाणी काढुणं दे मला पाणी काढता येत नाही भाजी साठी त्याच्यां कडे होते ते त्यांनी दिलं एवढं पुरणार नाही आणखी बटाटे आणुनं दे त्या बाबाजी बटाटे विकत आणुन दिले मि बाई एकचं रात्र राहीली पण खुप त्रास दिला. मि व माझ्या सोबत एक माता होती आम्ही दोघी नतंर तिन दिवस त्याचं आश्रमात होतो. बाबाजीनीं विचारलं माताजी भोजनं बणाणेके लिय क्या चाहीए आश्रमात जे आहे ते द्या आलेल्या परीक्रमा वाले आहेत त्यानांच पण आम्ही दोघीनीं भोजण बणवायचं पुढे जायला निघालो तेव्हां आश्रम वाले बाबाजी रोणे लगे माताजी आपणे कुछं भि मांगा नही. ओ बोले सभी महाराष्ट्र वाले ऐसे नही होते. एक करता है सभी का नाम खराब होता है. नर्मदा परीक्रमा करताना जे मिळेल त्यात समाधान माणले पाहिजे साधुसंताना या आश्रमातील शेवा करणारे शेवेकरी आहेत त्यानां मणालागेल आसं काहीं करु नका परीक्रमा स्वता साठी करता याचं महत्व काय आहे ते समजुन घ्या नाही तर परीक्रमेचं पुण्यं पदरात पडणार नाही नर्मदे हर नर्मदे हर
मला तर छान अनुभव आलेत मैय्या ज्याचा जसा भाव तसा च देते ठाव हव ते मैय्याच पुरवते नहलाना खिलाना पीलाना चलाना सुलाना सब मैय्याच करते आपआपला नजरीया चस्मा बदलला तर सर्वच सुंदर आहे.नर्मदे हर जीवनभर
मराठी माणुस आश्रमात गल्यानंतर जे असेल त्यात समाधानी राहातो. आश्रम चालवणारे महाराज सांगतात मराठी माणुस सहकार्य करतो. भोजनप्रसादी झाल्यानंतर पैसे देऊ करतात पण महाराज घेत नाहीत.नंतर घरी गेल्यानंतर त्याना मदत करतात असे आश्रम चालवणारे महाराजच सांगतात
असेही परिक्रमा वाशी असतीलच की, नाही असे नाही, परंतु जे trip,picnic म्हणुन जातात, आश्रम हा आपला हक्क आहे, तेथे सेवा देणारे यांचे सेवा देणे हे कर्तव्य आहे असा attitude ठेवणे अत्यंत चुकीचे आहे, आपण तेथे किती सुशिक्षित आहोत हे दाखविणे गरजेचे नाही.
❤ धन्यवाद, नक्कीच फायदा होईल. योग्य शब्दात वर्णन केले आहे. मराठी माणूस थोडा अहंकारी असतो हे सत्य आहे, पण वेळ पडल्यास खूप उपयोगी पडतो. थोडा नादान समजून माफ करा. आपल्या सूचना नक्कीच लक्षात ठेवीन. 👍
अगदीच बरोबर आहे असे नाही म्हणणार. काही ठराविक लोकांवरून संपूर्ण समुदयाला चुकीच ठरवने बरोबर नाही. चांगली आणी वाईट लोकं सगळीकडेच दिसतील. अध्यात्मिक मार्गावर असताना सकारात्मक विचार करत रहावेत.
दादा तुम्ही अगदी बरोबर बोलले आहे. मराठी माणुस त्यात देव धर्माच्या नावावर नुसते अवडंबर करणारे 80-85% आहेत. उर्वरित 15-20% निर्मळ भक्ती भावाने वारी करणारे असती. यात ही शंका आहे . असो त्याचे काय ते श्री हरी पांडुरंग पाहुन घेईल.
नर्मदे हर आपण स्पष्ट पणे बोललात त्या बद्दल अभिनंदन, मी २४/११/२३ पासून परिक्रमा करत आहे, आम्ही तिघजण एकाच गावात ले आहेत,आमचा ही अनुभव तुमच्या सारखा आहे मराठी माणसांनी छत्रपती च्या महाराष्ट्राची बदनामी केली,करत आहेत याचं खूप मनाला दुःख वाटते तुमचा हा व्हिडिओ बघून ऐकून तरी पुढे परिक्रमा करण्यासाठी येणाऱ्या ना चांगलं वागण्याची बुद्धी होईल.नर्मदे हर
|| Narmade Hara || 🙏 I'm not surprised... Attitude shift is needed; sympathy, empathy, humbleness and kindness can't be learned. It has to come from within.
हो काही प्रमाणात हे खर असल तरी बऱ्याचवेळा ते ठरवून ठेवल आहे काही लोकांनी सगळेच अस करतात असणाही दादा काही लोक महाराष्ट्र बाहेरची होती इतक चुकीच वागण होत पण त्यांच्या बद्दल कोणीच काही बोलल नाही आपली लोक जास्त जातात ते लोकांना पटत नसाव बहुतेक
नर्मदा परिक्रमेत प्रांतवाद जास्त होताना दिसतो मध्य प्रदेशातील लोक महाराष्ट्राच्या लोकांना सारखे हिनवत असतात हा अनुभव आम्ही नुकताच घेतलेला आहे परंतु मराठी माणूस शांत आहे शिस्तीचे पालन करणार आहे उलट मध्यप्रदेशातीलल लोक तोडून मध्ये घुसणे अन्न वाया घालवणे बाकीच्या गोष्टी तर सांगू नका तू हा प्रांतवाद थांबला पाहिजे आणि आपण सारे नर्मदा मयेचे लेकरं आहोत अच्छा वातावरणातून परिक्रमा्हावी म्हणजे तो एक आनंद होईल आम्ही तर हाच प्रयत्न केला
That was absolutely hilarious. :) What is stated is 100% true ... we have these habits without any doubt. :))) and actually not all of these habits can change - because somehow we believe some of these traits as reasonable to have. :))) I liked your perspective and how these common beliefs / behaviours / thoughts that we have are perceived by others. Having said that, your wonderful vlog would undeniably will bring a positive change. Your way of speaking is too good , and amazing. It is least offensive and yet - delivers the message accurately. I found it like a affectionate school teacher telling naughty kids how to behave. 🙏
नर्मदे हरsssखरं असेल तर वाईटच आहे....कुणीच समाधानी होणार नाही....मला वाईट वाटले.आता याच महिन्यात मी जाते आहे.आपल्या सूचना नक्की लक्षात ठेवेन.धन्यवाद !!!नर्मदे हरssssss