खूप छान. ... कर्मा हा माझा अतिशय आवडीचा आणि जवळचा विषय आहे...माझा खूप विश्वास आहे कर्मावर आणि मी त्या प्रमाणेच वागते,राहते,बोलते,खाते...मी नेहमीच सगळ्यांच चांगल करते,चांगले चिंतते...माझा आहार सुद्धा असा आहे की त्यात कोणत्याच प्रणीमात्राला हानी पोहचलेली नसेल..म्हणजे आपण एखाद्या प्राण्याला मारून खाण हे सुद्धा पापच आहे..परत प्राण्यांपासून येणारा कोणताही पदार्थ हा त्या प्राण्याला हानी पोहचवल्याशिवाय येत नाही त्यामुळे असा कोणताच पदार्थ किंवा वस्तू वापरत नाही...थोडक्यात सांगायचं तर मी vegan आहे...आणि सगळं मी कर्मच्या भीती पोटी करत नसून प्राण्यांवरच्या प्रेमा पोटी करतेय...
जशी सारख्या पंखांचे पक्षी एकत्र येतात तसेच सारख्या विचारांचे लोक एकत्र येतात. तुमचे विचार ऐकून खूप छान आणि अभिमान वाटला की आजच्या पिढीतील मुलगी इतक्या सुंदर आणी निर्मळ विचारांची आहे. असेच विचार आत्मसात करून जर प्रत्येक पिढी वागली तर शिवबा का पुन्हा आपल्या महाराष्ट्राच्या मातीत जन्म नाही घेणार. संपूर्ण जगावर मराठी माणूस राज्य करू शकेन आणि आपल्या देशाला उच्च स्तरावर नेईल. खूप खूप छान 🎉 अशा authentic व्यक्तींची गरज आहे आपल्या देशाला.
मला एक कळलं नाही, मॅडम असं म्हणाल्या की जी लोक आता सुखी, संपन्न आहेत आणि वाईट कर्म करत आहेत त्यांनी पूर्व जन्मी पुण्य खूप केल आहे त्यामुळे त्यांना ह्या जन्मात वाईट कर्म करूनही सगळं चांगलं मिळत आहे, जर पूर्वजन्मी एवढं पुण्य केलं असेल तर त्या आत्म्याचा संस्कार हा पुण्य कर्म करणाराच बनला पाहिजे तो अचानक ह्या जन्मात एवढा पाप कर्म कसा काय करू लागतो आणि त्याचे मागच्या जन्मीचे संस्कार एवढे कसे काय विरुद्ध बनतात?????
मला जे समजलं ते असं, प्रत्येक आत्मा प्रत्येक जन्मात पाप आणि पुण्य करतच असतो. मागील जन्मात जे पुण्य कर्म केले त्याचे फळ मिळायचे भोगायचे राहिले असेल तर ते चांगले फळ या जन्मात मिळते पण त्याच जोडीला वाईट कर्माचे ही फळ आहेच. ते त्या व्यक्तीला मिळत असतेच. मागील जन्मातील पाप कर्म ही या जन्मातही त्याला पाप करायला भाग पाडतात त्यामुळे तो जास्त वाईट कर्माकडे जातो. यासाठी स्वतःला नामस्मरणात गुरूपाशी लीन करणे महत्त्वाचे असेही त्यांनी सांगितले आहे. आपल्याला फक्त त्याच्याकडे पैसा अडका आहे त्याचं सर्व काही छान चालू आहे असे वाटत असते त्याचा त्रास आपल्याला माहीत नसतो. मागील जन्मातील पुण्यवान व्यक्ती या जन्मात पाप करतात म्हणजे ती व्यक्ती पूर्णपणे पुण्यात्मा झालेली नाही
@atulbhalerao1 आत्म्याचे संस्काराने विवेक जागृत राहतो पण कळीचे माया त्यावर मत करून आपले अधिष्ठान गाजवते म्हणून सत्संगत हवी असते ती जाण येण्यासाठी दिगंबरा
मला असं वाटतं की मागच्या जन्मच कोणालाच काही आठवत नसतं.. म्हणून या जन्मात त्यांना त्या संस्कारांचा विसर पडून ते वाईट कर्म करतात आणि पुन्हा पुढच्या जन्मात नशीबाला दोष देतात
काल्पनिक कथांच्या आधारित मुलाखत दिली आहे.जन्म आणि मृत्यू हेच सत्य आहे.आणी पैसा हा मानसाने बनवला आहे.म्हणुन वाईट मार्गने पैसा मिळवून जो श्रीमंत बनतो कधीच श्रीमंत नसतो. कारण त्याच्या मनात अपराधी पणाची भावना नेहमी च असते.म्हणुन मागील जन्मी पुढील जन्मी ही गोष्टी आहेत ह्या काल्पनिक कथांच्या आधारित आहेत.हया पैक्षा बुद्धांचे विचार स्व कारा.धन्यवाद...
ताई जे सांगत आहेत ते बरोबर आहे..मानवी जीवनातील गूढ रहस्य भाग 1 ते 7 वाचा...हिमालयात तप केलेले स्वामी दत्तावधूत हे लेखक असून मानवी जीवन बदलून टाकणारी पुस्तके ❤
काय घोर कलियुग आहे ,आपण खर्या साधूसंतांचे सोडून "नयना मुके" यांचे विचार का ऐकतोय ? कोण आहेत ह्या बाई? यांची अध्यात्मा सारख्या विषयावर बोलण्याची Authenticity काय ? ? बाईंनी " नाम महीमा" जो सांगितलाय तो अगदी खरा आहे 👍👍
खरंच... या सगळ्या गोष्टींची आज खूप गरज आहे. कारण हे आजचं पळत सुटलेलं किंवा धावतं जीवन जगताना ह्या खूप महत्त्वाच्या बाबी आहेत. जे तुम्ही आम्हाला सांगितल्या नक्कीच आम्हला या सगळ्या माहितीचा खूप चांगल्या प्रकारे फायदा होणारचं यात काही शंका नाही. Thank U❤️...Naynah Mukey Such Energetic talk and Thank U..TheOddEngineer❤️🙏🏼
खूपच अप्रतिम ... भन्नाट आणि तितकाच ताकदीचा पॉडकास्ट होता. मज्जा आली. खूप शिकायला मिळालं. पाप पुण्य , कर्म , नामस्मरण अशा अनेक विषयांवर सद्गुरू श्री वामनराव पै यांनी अतिशय सुंदर आणि सोप्प्या शब्दात मार्गदर्शन केलं आहे. ते जरूर ऐका. अजून सगळं क्लिअर होईल.
मी पूर्ण पॉडकास्ट ऐकला खुप छान विषय घेतला आणि खुप छान मार्गदर्शन ही भेटले . पण त्यात प्रश्नांची जरा कमतरता भासली . तुझं संवाद कौशल्य आजुन यापेक्षा चांगल असू शकते . Keep it up 😊
नुसत्या एकमेकांना थापा मारन चालू आहेत..ठरलेले प्रश्न त्यावर विचार करून उत्तर शोधलेले...अरे podcast ह्याला म्हणतात व्हय काही तरी channel चालू केलं , काही तरी episode बनवायचा म्हणून काही ही विषय आणायचे अन् लोकांना दाखवायचे... तस ही सध्या काही ही विकल तर खपत म्हणून काही ही करणार का??
पुण्याचं पारडं जास्त म्हणून दोन नंबरचे काम करणारे आहेत हे विधान एकच नंबर च 😊😊😊 इंजिनिअर साहेब तुम्ही आम्ही पापच पारड जास्त आहे असंच म्हणावं लागेल कारणं हा episode तुम्ही बनवला व आम्ही ऐकला... आयुष्यात अपेक्षा भंग जादा येतं तेव्हाच मनाव आध्यात्मिक कडे वळतो....👍🥳
छान चर्चा झाली. प्रयत्न जरा कमी पडला. कारण मुलाखत देणारी व्यक्ती तेवढी अनुभवी अजिबात नाहीये. कर्म हा विषय खूप व्याप्ती चां आहे. Knowledge त्यांचं पण अर्धवट आहे. त्या सगळ्यांची example देत होत्या उत्तर नाही. अजून खूप चांगले अनुभवी वक्ते बोलवले तर नक्की आवडेल. कीर्तनकार आफळे गुरुजी ना कधी तरी नक्की बोलावा. ह्या आणि श्रीकृष्णा वर ते अप्रतिम सुंदर माहिती देतील.Thanks😊😊👍👍💐💐
आदरणीय मयम... आमच्या बाबा कधीही च कोणत्याही वयक्ति मन दुख दिले नाही... एक ऐश्वर्या संपन्नता जीवन. एक राजा 👑🔱🔱सारख्या जीवन.. होते, पण अचानक.. आई जाते.. सहा वर्षे बाळ
,. Phar Chan adhyma adhik medition che Nate v guru badhal che anusandhan khup gosti shiksla milaly khup khup dhanvad mam v sur krupaya pudil adhyam chy vishayar lakarat lavkar madamcha vedio Kara TQ very much
Be it Swami samartha bhagwan, Shri Gyan dev mauli, das samuday of kannada, all have touched and taught the core of sanatan dharm. So proud to be maratha and kannadiga local.
खूप खूप सुंदर व्हिडिओ...... ❤❤❤ Each nd every word is meaningfull...... God bless u dear ..... God help u in path of spiritual journy which is most beautiful journy....which is ur trying to achive from birth to birth.....may god bless u to achive ur aim ie.krishna lok ❤❤❤most beautiful nd meaningfull video
पुण्याचे डाॅ. प. वि. वर्तक यांचे "पुनर्जन्म" हे पुस्तक वाचा. विवेकानंदांचे साहित्य वाचा. पांडुरंगशास्त्री आठवले यांचे साहित्य वाचा. भारतातच नव्हे तर पाश्चिमात्य साहित्यही वाचा. पुनर्जन्म हे वैज्ञानिक सत्य आहे
Nayyan mukey...आज मी पहिला तुमचं हा vedio...तर त्या ज्या सांगत होत्या खूप सुंदर सांगत होत्या...पण तुझे काही प्रश्न होते ...त्यापैकी तुला एक उत्तर देणे याची इच्छा झाली आहे..आणि तुझे प्रश्न आताच्या सर्व पिढीला पडण्यासारखे च आहेत.आणि ज्या जगात लोक जगत आहेत त्यांना हे असे अचानक कर्म योग एकले तर पडतातच ...आणि ज्याला आवड आहे तो यात पुढे जातो..असो मला तुमच्या प्रश्नाची उत्तरे द्यायला आवडतील.जे तुम्ही 3 प्रश्न विचारला ज्याची उत्तर घेण्याची तुम्हाला खूप आतुरता दिसली.हरी ओम
देवाने पण अशी काय सिस्टीम बनवली काय माहिती....... द्यायचं तर ज्या जन्माचं त्याच जन्मात फळ द्यावं ना...... म्हणजे आपण काय पाप केलेल आहे हे माहिती नाही आणि माणसाला त्याची फळे भोगावे लागतात.. मला असे वाटते की माणूस म्हणून जन्माला येणं हीच एक खूप मोठी शिक्षा आहे कारण त्याचा आयुष्य हे पूर्णपणे जर मागच्या जन्माच्या कर्मांवरतीच आधारित आहे तर त्याने आयुष्याकडे कसं बघावं आणि काय करावं हे त्याला कस काय समजेल...... बरेच असे लोक आहेत ज्यांना जन्म कर्म पुनर्जन्म याबद्दल काही ज्ञान देखील नाहीये. अशा लोकांनी मग काय करावे..... जे आज खूप छान आयुष्य जगतायेत पण हे देखील क्षणिक आहे कारण की पुढचा जन्मतांना कसा मिळतो आणि कसा नाही उदाहरणार्थ शाहरुख खान जो आज बादशहा आहे आज त्याच्याकडे सर्व प्रकारची सुख लोळण घालताय पण हात शाहरुख खान मेल्यानंतर जेव्हा दुसऱ्या शरीरात जन्म घेईल तेव्हा कदाचित तो अतिशय गरीब घरातही जन्माला येऊ शकतो तर या सगळ्या साखळीतून सुटण्याचे नक्की मार्ग काय हे देखील कोणाला माहित नाही
माफ करा, मी पूर्ण निष्ठेने,नम्रपणे आणि प्रामाणिकपणे सांगतो की मी स्वतः माझ्या जीवनाचा शिल्पकार आहे. पुढे असा ही विचार येतो की सुदैवाने ,भगवंतामुळे सर्व काही बर चालू आहे.
खूप छान माहिती दिली मॅडम अजून नामस्मरन कसं कराव कोणती पुस्तक वाचन करायला हंवी ते सांगा माझा मूलगा स्पेशल म्हणजे ऑडिझम आहे म्हणून मला काही माहित नाही पूणॆ वेळ मूलांतच जातो म्हणून मला माहिती हंवी प्लीज सर
बोलताना किती सहजपणे म्हणाली....नेहमी प्रमाणे मुलगी मुलाला धोका देऊन गेली 😮...This is so biased and wrong statement!! How can she be so judgemental? Each breakup has a backstory...how can you say girls always betray???????. Is she talking so by looking at her own past karma??🤔