खरंच , आमच्या लहानपणी म्हणजे 1977 ते जवळपास 1987/88 च्या काळात सकाळी सात साडे सातला काही नात्यासंगीताचा रेडिओवर कार्यक्रम रोज असायचा त्या कार्यक्रमात अशी स्तब्ध करून ठेवणाऱ्या गीतांची मेजवानीच असायची . इतकी सुंदर सकाळ असायची कि आज कल्पना पण करू शकत नाही प्रसन्न वाटायचं एकदम ! 👌🏼👌🏼👌🏼सावरकर विषयी बोलण्याची सुद्धा आमची लायकी नाही . असामान्य व्यक्तिमत्व , दुर्लभ दैवी व्यक्तिमत्व !सनातन वैदिक धर्मावर अनंत उपकार आहेत त्यांचे जे कि त्यातून मुक्त होणेच असंभव !कोटी कोटी नमन या महामानवला !🙏🏼🌹🙏🏼❤️🙏🏼🕉️🚩👌🏼👍🏼
शत जन्म शोधिताना । शत आर्ति व्यर्थ झाल्या । शत सूर्य मालिकांच्या । दीपावली विझाल्या ॥ तेंव्हा पडे प्रियासी । क्षण एक आज गाठी । सुख साधना युगांची । सिद्धीस अंति गाठी ॥ हा हाय जो न जाई । मिठी घालु मी उठोनी । क्षण तो क्षणांत गेला । सखि हातचा सुटोनी ॥
Savarkar was a great intiligent ahead of century.he knows the hindutva and Hindu is the hope of future best world power.thanks pandit karekar and tabalji.jai Hind 🇮🇳
Savarkar had a fascination for universal phenomenon. In fact he considered the theme of Hindutva or nationalism only as a compromise to protect it from enemies. If one reads and understands his poem Jagannathacha Rath this universal theme becomes clear.
This is indeed my all time favorite. I keep listening to this rendering and also from Dr Vasantrao Deshpande as many times as possible. Great. Many thanks.
Sanjaysaheb, you have shared one marvellous song / live concert for us. Song writer is a legendary personality. Pt.Karekar is a well known natyageet singer and a devotee of classical sangeet. Harmonium and Tabla saath is fantastic. Everybody,s contribution has reached a peak. Thanks once again. Dileep Bhave from Ratnagiri (MS)
पहिल्या कडव्याचा स्वतंत्र अर्थ लागत नाही, ते दुसर्या कडव्याशी जोडून घेतले की अर्थ लागतो. शत जन्म शोधिताना । शत आर्ती व्यर्थ झाल्या । शत सूर्य मालिकांच्या । दीपावली विझाल्या ॥ तेंव्हा पडे प्रियासी । क्षण एक आज गाठी । सुख साधना युगांची । सिद्धीस अंती गाठी ॥ : एखादी स्त्री/ गौळण हे गीत गाते आहे असा विचार केला तर, ती म्हणते की मी शतजन्म.. अक्षरशः शतजन्म 'ह्या' ला शोधीत होते, त्यामध्ये शत आर्ती व्यर्थ झाल्या. 'आर्ति व्यर्थ झाल्या' ह्याचा नीटसा अर्थ उमगला नाही पण कदाचित, त्या शोधामध्ये 'आर्ती' म्हणजे दुःखे व्यर्थ ठरली, असा अर्थ असावा. एखादी गोष्ट आपण खूप मन लावून करत असलो की ती करताना आपल्याला थोडं दु:ख्/यातना सोसाव्या लागल्या तरीही त्याची विशेष जाणीव आपल्याला उरत नाही, तसेच काहीसे. शतसूर्यमालिकांच्या दीपावली विझाल्या/निमाल्या- वरच्याच एका प्रतिसादात कुणीतरी पु.लंची वाक्ये लिहिली आहेत, त्यानुसार 'कालाचे विराटरूप' दाखवण्यासाठीचा हा शब्दप्रयोग आहे. एखाद्याची आतुरतेने वाट बघताना, एक एक क्षण सुद्धा सरता सरत नाही. त्यामुळे या गाण्यातल्या नायिकेला 'वाट बघण्याचा' एक एक क्षण हा शतजन्मांइतका मोठा वाटतोय. किंवा तो एक एक क्षण इतका मोठा वाटतोय की त्या एका क्षणात 'शतसूर्यमालिका' विझून जातील. इतका काल वाट पाहिल्यानंतर.. 'तेंव्हा पडे प्रियासी, क्षण एक आज गाठी'- म्हणजे, एवढं सगळं सोसल्यानंतर.. एक क्षणभर मला माझा 'प्रिया' भेटला, अगदी क्षणभरच. की जणू मी युगानुयुगे ज्या सुखाची/ सुखासाठी (अर्थात प्रियाच्या भेटीसाठी) साधना केली, त्या साधनेची आणि सिद्धीची आज गाठ पडली, म्हणजे थोडक्यात ती साधना फळाला आली. हा हाय जो न जाई । मिठी घालू मी उठोनी । क्षण तो क्षणांत गेला । सखी हातचा सुटोनी ॥ ह्या कडव्यामुळेच मला ही विरहिणी वाटते, कारण त्यात ती गौळण 'सखी' ला सांगतेय की, मी उठून त्याला मिठी घालू गेले, पण तोच तो एका क्षणात हातचा सुटोनी गेला. 'कानडाऊ विट्ठलू' गाण्यातही अशाच अर्थाची एक ओवी येते 'पाया पडू गेले तव पाऊलचि न दिसे'. अर्थात ती अध्यात्मिक अर्थाने आहे आणि इथे केवळ अध्यात्मिक अर्थ अपेक्षित नाहिये असेच वाटते.
please check that, though Sawarkar has wrote this Drama, but these songs were not been written by him. these songs were added by Veer Vamanrao Joshi after it was to be played on stage.
Mr Nagesh it is true indeed that Veer Vamanrao Joshi did add a few songs but not this one. Shatajanma was exquisitely authored by Veer Sawarkar whereas Veer Vamanrao Joshi has written the song ‘Apada Rajpada Bhayada' from Veer Sawarka's play “Randundubhi".
शतजन्म शोधिताना, शत अर्ति व्यर्थ झाल्या शत सूर्यमालिकांच्या, दीपावली विझाल्या ॥ १ ॥ तेव्हां पडे प्रियासी, क्षण एक आज गाठी सुखसाधना युगांची, सिद्धिस अंति गाठी ॥ २ ॥ हा हाय जो न जाई, मिठी घालु मी उठोनी क्षण तो क्षणात गेला, सखि हातचा सुटोनी ॥ ३ ॥
स्वा. सावरकर यांनी लिहिलेल हे एक प्रेमगीत आहे. या गीताचा थोडक्यात अर्थ असा की प्रियकर प्रेयसीला म्हणतोय की तुला शोधायला 100 वर्ष लागली त्यात 100 प्रकारची दुःख भोगली (अर्ती=दुःख) एखादी पणती विझावी तश्या 100 सूर्यमाला विझल्या
+swapnil kharkar Nice. Why not give the meaning in full. There is a grandness in this grief of the lover. Only a poet of caliber of Savarkar can bring such cosmic example to love. Enjoy his Jagannathacha Rath - another poem for such grandness.
Thanks for such good song. Pl tell me the meaning of this poetry by Sawateraveer Sawarkar and meaning in the British raj. I am curious to know for long time . Have u listen the same song by Vasantrao Deshpande.
#शत_जन्म_शोधितांना शत जन्म शोधिताना । शत आर्ति व्यर्थ झाल्या । शत सूर्यमालिकांच्या । दीपावली विझाल्या ॥ तेव्हां पडे प्रियासी । क्षण एक आज गांठी । सुख साधना युगांची । सिद्धीस अंति गाठी ॥ हा हाय जो न जाई । मिठि घालु मी उठोनी । क्षण तो क्षणांत गेला । सखि हातचा सुटोनी ॥ “संन्यस्त खड्ग” ह्या संगीत नाटकांतील हे पद म्हणजे सावरकरांनी लिहिलेल्या अत्त्युच्च पदांमधील एक!! ह्या माणसाच्या प्रतिभेवर साक्षात सरस्वतीने भाळून जावे इतक्या विलक्षण प्रतिभेचा धनी, बौद्धिक संपदा अशी की चक्क कुबेराला आपली पारमार्थिक संपत्ती त्याच्यापुढे फिकी वाटावी, आणि राष्ट्रभक्ती तर अशी की भारतमातेने तिच्या ह्या पुत्राला झालेल्या यातनांनी आसावे गाळावीत तर तिचे अश्रूचं विनायक दामोदर सावरकर ह्या तेजपुंज व्यक्तिमत्वासमोर थिजून जावेत!! स्वातंत्र्यवीर/हिंदूहृदयसम्राट विनायक दामोदर सावरकर म्हणजे अग्निकुंड, अटलजी म्हणायचे तसे सावरकर म्हणजे तितीक्षा, सावरकर म्हणजे तिखट. अशा राष्ट्रपुरुषाला प्रेम काव्य सुचलं तर ते कसे असेल ह्याची दिव्यानुभूती म्हणजे वरील पद!! अंदमानातून सुटका झाल्यावर सावरकरांनी रत्नागिरीत स्थानबद्ध असतांना ”संन्यस्त खड्ग“ लिहिले. ह्या नाटकात पात्रे आहेत बुद्ध, विक्रमसिंग, वल्लभ आणि सुलोचना. सुलोचना ह्या पात्राच्या तोंडी हे गीत आहे. सुलोचना ही वल्लभची पत्नी. त्यांच्या लग्नाला जेमतेम काही दिवस झाले असतात. नवीन-नवीन संसाराची आता कुठे वेल फुलायला लागली असते. एकेदिवशी त्यांचा प्रेमळ संवाद सुरु असतांना अचानक राज्यसभेचा निरोप येतो म्हणुन वल्लभ तो प्रेमळ संवाद उमलायच्या आत अर्ध्यावरच सोडून तडक उठून राज्यसभेत निघून जातो. उशिरा केंव्हातरी सैनिक निरोप घेऊन सुलोचनेकडे येतो की सेनापती तर राज्यसभेतूनच थेट रणांगणावर युद्धासाठी गेले आहेत. तेंव्हा सुलोचनेच्या मनात आलेल्या ह्या भावना म्हणजे हे गीत. आता गंमत बघा सुलोचना ही साधी स्त्री नाहीय, ती कर्तृत्ववान आहे त्यामुळे ती फक्त प्रेमळ विरह गीत कसे गाईल?? सावरकरांची विलक्षण प्रतिभा बघा प्रेम विरह गीतात देखील सुलोचनेच्या जाणिवा प्रगल्भ आहेत, तिचे विचार परिपक्व आहेत. अशी दमदार स्त्री जेंव्हा विरह गीत गात असेल ते देखील किती अत्त्युच्च असेल नाही?? शत जन्म शोधिताना । शत आर्ति व्यर्थ झाल्या । शत सूर्यमालिकांच्या । दीपावली विझाल्या ॥ सुलोचना म्हणते माझा प्रियकराचा शोध हा जन्मोजन्मांचा आहे, माझ्या ह्या शोधापुढे ‘शत’ आर्ति (दुःख, पीडा) व्यर्थ आहेत, आणि ह्यात सुलोचनेने कशाची आहुती दिली आहे तर शत सूर्य मालिकांच्या दीपावलीची, म्हणजे सामान्य माणसांप्रमाणे सुलोचनेची दीपावलीची पणती ही मातीची नाहीय तर ती आहे शंभर सूर्यमालिकेची!! कल्पना देखील किती भव्य असावी?? तेव्हां पडे प्रियासी । क्षण एक आज गांठी । सुख साधना युगांची । सिद्धीस अंति गाठी ॥ प्रियकर मिलनाचे सायास तिला (सुलोचना) कष्टप्रद तपश्चर्येसारखे वाटत नाहीत, तिच्यासाठी तर ही आनंदाने केलेली साधना आहे. जिची सिद्धी आता कुठे तिने ’गाठली’ आहे. सावरकरांची शब्दप्रभू संपन्नता बघा गांठी (गाठभेट) आणि गाठी (पोचणे किंवा गाठणे) काय भन्नाट यमक त्यांनी जुळविले आहे!! हा हाय जो न जाई । मिठि घालु मी उठोनी । क्षण तो क्षणांत गेला । सखि हातचा सुटोनी ॥ पुढे सुलोचना म्हणते नुकतीच तर आमची भेट झाली आहे, त्याला (वल्लभाला) मिठी मारायला म्हणुन मी उठले तर, तर तो क्षण एका क्षणात माझ्या हातून सुटून गेला, संपून गेला!! पु.ल.देशपांडे ह्यांनी म्हटल्याप्रमाणे ह्या एका ओळीसाठी सावरकरांना खरोखर साहित्यातील नोबेल पुरस्कार द्यायला हवा. सावरकरांची अनेक रूपं मला आवडतात. विज्ञानाधिष्ठित सावरकर, शब्दप्रभू सावरकर, लढवय्ये सावरकर, कवी सावरकर, लेखक सावरकर, सामाजिक चळवळीचे प्रणेते सावरकर, ब्रिटिशांवर तुटून पडलेले सावरकर, धाडसी सावरकर, राष्ट्रासाठी आपल्या घराची राखरांगोळी केलेले सावरकर. एक मनुष्य त्याच्या सबंध आयुष्यात कदाचित परमेश्वरही घेण्यास धजावणार नाही इतकी जाज्वल्य रूपं घेऊ शकतो?? आणि ह्या प्रतिभावान आत्म्याला आपण करंटे भारतीय एका जातीत तोलून त्याला माफीवीर म्हणतो?? ह्याहून करंटा समाज कुठल्या तरी देशात असेल. सावरकरांच्या त्या जाज्वल्य आयुष्यातील धगधणाऱ्या अग्निकुंडातील एकतरी अग्निशिखा होण्याचे सौभाग्य मिळाले तरी एखाद्याचा जन्म सत्कारणी लागायचा. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर ह्यांना शतशः नमन!! #VeerSavarkar ✍🏻 प्रसाद देशपांडे