मी अश्या बरयाच लोकांना ओळखतो जे पित्राच काहीही करत नाही, पण सर्व बाबतीत सुखी आहेत, देव पूजा पण करत नाही किंवा करायची म्हणून दिवा अगरबत्ती दाखवतात. तरीही घरी समृद्धी, आरोग्य, ऐश्वर्य नांदत आहे. मला तर असा वाटायला लागले आहे की जेवढं देव देव केलं तितका त्रास आणि दुःख वाढत आहेत, सुख तर राहिले दूरच. मी नारायण नागबली, कालसर्प केलं उपयोग शून्य. त्रास जैसे थे. स्वामी महाराजांवर खूप श्रद्धा आहे आणि विश्वास आहे. बरयाच संकटात त्यांनी मला वाचवले, बरेच चमत्कार अनुभवले. पण पण पण घरात आरोग्य समस्या आहेत, आर्थिक कोंडी कायमचीच. असे का मला काही कळत नाही.
@@sayaliingle481 वास्तू नुसार घराचे बांधकाम केले आहे दहा वर्ष झाली आहेत आता जिथे राहतो तिथे. भाड्याच्या घरात राहत होते तशीच परिस्थिती आहे. म्हणून घर बांधताना मुद्दामून वस्तूनुसरच बांधकाम केले. ताई, काय सांगू तुला, प्रत्येक कामात अपयश, लोकांची साथ मिळत नाही, हाता तोंडाशी आलेली कामे एका झटक्यात निसटून जातात. मला कोणतेही व्यसन नाही, कोणाला त्रास देत नाही, कोणाचे वाईट करत नाही, कोणाला शिव्या देत नाही. वय वर्ष ३९ लग्न नाही, संसार नाही, मोठ्या भावाचे आणि लहान बहिणीचे पण लग्न नाही झाले. घरात बाराही महिने आरोग्य समस्या, आर्थिक समस्या. घरात मंगल कार्य नाही, १०, १५ वर्ष लहान असलेल्या चुलत भावा बहिणींच्या लग्न झालीत. स्वामी सेवेत 1998 पासून आहे. आता सांगा देव धर्मात कसे मन रमेल. त्यापेक्षा लोकांना त्रास देणारी आणि लुबाडणारे लोक सुखी आहेत.
ताई मी कधीच जास्त कोणत्या देवाची सेवा केली परंतु मी जसे तुमचे व्हिडिओ पाहायला लागले तसे मला स्वामींची देवाची खुप अवड निर्माण झाली मी तुमच्या व्हिडिओ पाहून स्वामींचे 11 गुरुवार कर्तिये तुमच्या व्हिडिओ ने खुप positivity मिळते ❤