परीवर्तन हाच काळाचा नियम आहे.दशावतार कलेबद्दल लोकांना आवड तर आहेच ती कायम स्वरुपी ठेवायची असेल तर नक्कीच संवाद जुगलबंदी व्हायलाच हवी.त्यामुळे कलाकार आणि लोकांना अभ्यास आणि आवड सुध्दा निर्माण होईल यात शंकाच नाही.त्यामुळे दशावतार आणि डबलबारी ही कोकणची कला संस्कृती परंपरा निरंतर राहील.आणि ग्रामीण भागातील नवीन युवा तरुणांना आपलं करीअर सुध्दा घडवता येईल.