महाराष्ट्रातील किल्ल्यांचा इतिहास पाहिला तर मल्हारगड हा निर्माण झालेला अखेरचा किल्ला. या किल्ल्याची निर्मिती इ. स. 1757 ते इ.स.1760 या काळात झाली. म्हणजे तसा हा अलीकडच्या काळात बांधलेला किल्ला.पायथ्याशी सोनोरी हे गाव असल्यामुळे त्याला सोनोरी किल्ला असेही म्हटले जाते. पेशव्यांचे सरदार पानसे यांनी हा किल्ला बांधला.ल्हारगड त्रिकोणी आकाराचा असून आतील बालेकिल्ल्याला चौकोनी तट आहे. समुद्रसपाटीपासून हा किल्ला 3166 फूट उंचीवर आहे. इतर किल्ल्यांच्या तुलनेत मल्हारगड लहान आहे. केवळ साडेचारते पाच एकर क्षेत्रावर त्याचा विस्तार आहे.
21 июн 2024